शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

नायगाव खोऱ्यातील शेतकरी आर्थिक संकटात

By admin | Updated: November 25, 2015 22:54 IST

पिकांचे नुकसान : बेमोसमी पाऊस व ढगाळ हवामानाचा फटका

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात बेमोसमी पाऊस व ढगाळ हवामानामुळे खरीप व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सततच्या दुष्काळी परिस्थितीने नायगाव खोऱ्यातील शेतकरी आधीच आर्थिक विवंचनेत आहे. या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसाच्या भरवशावर घेतलेल्या पिकांवर बेमोसमी पाऊस व ढगाळ हवामानामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे खरीप व रब्बीच्या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्यांमध्ये भर पडत आहे. खरिपातील लाल कांदा, कोबी, फ्लॉवर, तुरीसह रब्बीतील उन्हाळ कांदा, टमाटे, कोबी, फ्लॉवर, गहू या पिकांची बेमोसमी पावसाने वाताहत होत आहे. याशिवाय दरम्यान निर्माण होणाऱ्या ढगाळ हवामानामुळे या सर्वच पिकांवर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे. ही पिके वाचविण्यासाठी महागड्या किटकनाशकांची फवारणी करावी लागत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.परिसरातील पाण्याची पातळी खालावत असताना धोक्यात आलेली पिके कशीबशी जगवण्याच्या धडपडीला बेमोसमी पावसाने हात दिला आहे. मात्र, ढगाळ हवामानामुळे या सर्वांवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन-तीन दिवसांपासून धुक्याचे प्रमाण वाढत असल्याने शेतातील पिके पिवळी पडून खराब होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. धुक्याचे प्रमाण असेच राहिले तर शेतातील सर्वच पिके भुईसपाट होण्याची चिन्हे आहेत. शेतीसाठी पाणी असूनही पिके हातातून जाण्याच्या शक्यतेने या वर्षीचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांना आर्थिक तोटा देणारा ठरणार असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)