शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

नायगाव खोऱ्यातील शेतकरी आर्थिक संकटात

By admin | Updated: November 25, 2015 22:54 IST

पिकांचे नुकसान : बेमोसमी पाऊस व ढगाळ हवामानाचा फटका

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात बेमोसमी पाऊस व ढगाळ हवामानामुळे खरीप व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सततच्या दुष्काळी परिस्थितीने नायगाव खोऱ्यातील शेतकरी आधीच आर्थिक विवंचनेत आहे. या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसाच्या भरवशावर घेतलेल्या पिकांवर बेमोसमी पाऊस व ढगाळ हवामानामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे खरीप व रब्बीच्या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्यांमध्ये भर पडत आहे. खरिपातील लाल कांदा, कोबी, फ्लॉवर, तुरीसह रब्बीतील उन्हाळ कांदा, टमाटे, कोबी, फ्लॉवर, गहू या पिकांची बेमोसमी पावसाने वाताहत होत आहे. याशिवाय दरम्यान निर्माण होणाऱ्या ढगाळ हवामानामुळे या सर्वच पिकांवर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे. ही पिके वाचविण्यासाठी महागड्या किटकनाशकांची फवारणी करावी लागत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.परिसरातील पाण्याची पातळी खालावत असताना धोक्यात आलेली पिके कशीबशी जगवण्याच्या धडपडीला बेमोसमी पावसाने हात दिला आहे. मात्र, ढगाळ हवामानामुळे या सर्वांवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन-तीन दिवसांपासून धुक्याचे प्रमाण वाढत असल्याने शेतातील पिके पिवळी पडून खराब होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. धुक्याचे प्रमाण असेच राहिले तर शेतातील सर्वच पिके भुईसपाट होण्याची चिन्हे आहेत. शेतीसाठी पाणी असूनही पिके हातातून जाण्याच्या शक्यतेने या वर्षीचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांना आर्थिक तोटा देणारा ठरणार असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)