शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

भाम धरणग्रस्तांना घरांसाठी आर्थिक मदत

By admin | Updated: May 9, 2017 02:18 IST

नाशिक : भाम धरणाच्या घळ भरणीत पुनर्वसनसाठी ४८० कुटुंबांना घर बांधण्यासाठी पावणे दोन लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने घेतला

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या अकरा वर्षांपासून पूर्णत्वास येऊ पाहणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाच्या घळ भरणीत पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे अडथळा आणणाऱ्या ४८० कुटुंबांना घर बांधण्यासाठी प्रत्येकी पावणे दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने घेतला असून, त्यामुळे पाच गावांतील कुटुंबीयांनी स्थलांतरित होण्यास सहमती दर्शविल्याने पुढच्या वर्षांपासून भाम धरणात पाणी साठवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. डोंगर, दऱ्यांनी व्यापलेल्या इगतपुरी तालुक्यातील भरवद, काळुस्ते, तिरफण शिवारातील पाचशे हेक्टर क्षेत्रावर भाम धरणाचे काम सन २००६ मध्ये हाती घेण्यात आले, मात्र स्थानिक नागरिकांचा असलेला विरोध लक्षात घेता धरणासाठी जमीन संपादित करण्यात येऊनही जागामालकांनी स्थलांतरित होण्यास नकार दिला. ३५० कोटी रुपये खर्चाच्या व नाशिक, नगर व औरंगाबाद या तीन जिल्ह्णांसाठी जवळपास २.६० टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता ठेवणाऱ्या भाम धरणाच्या कामाने २०११ मध्ये खरी गती घेतली, त्यासाठी धरणात जागा जाणाऱ्या नागरिकांसाठी पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी भरवद, काळुस्ते शिवारात जागामालकांना राहण्यासाठी प्लॉट देण्यात येऊन त्याठिकाणी शाळा, रस्ते, पाणीपुरवठा, विजेची सोय करण्यात आली. याशिवाय जागामालकांना हेक्टरी ७ लाख ९० हजार रुपयांचा मोबदलाही अदा करण्यात आला. मात्र तरीही, भरवद, तिरफण, सारूकरेवाडी, बोरवाडी, दऱ्हेवाडी येथील ग्रामस्थांनी स्थलांतरीत होण्यास नकार दिला. गेल्या सात वर्षांपासून जागामालकांना स्थलांतरित करण्यासाठी अनेक वेळा बैठका व पाठपुरावा करण्यात येऊनही त्यांचा नकार कायम राहिला. याचदरम्यान धरणाचे जवळपास ७० टक्केकाम पूर्ण झाले झाले आहे. गेल्या वर्षीच पाटबंधारे खात्याने धरणाच्या घळभरणीचा मुहूर्तही ठरविला, परंतु ग्रामस्थांच्या विरोधामुळे तो लांबणीवर टाकावा लागला. धरणात जमिनी गेलेल्या जागामालकांना नवीन घरे बांधण्यासाठी शासनाच्या वतीने प्लॉट उपलब्ध करून देण्यात आलेले असले तरी, त्या जागेवर घर बांधण्यासाठी पैसे नसल्याचे कारण पुढे करून त्यांनी स्थलांतरीत होण्यास नकार देत असल्याची बाब जलसंपदामंत्री तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर मंत्रालयात वेळोवेळी बैठका होऊन अखेर ४८० कुटुंबांना घर बांधणीसाठी प्रत्येकी एक लाख, ७४ हजार, ७६३ रुपये देण्याचे ठरविण्यात आले. पाटबंधारे खात्याने त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, राज्यात हा पहिलाच प्रयोग असल्याचे पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.