शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

भाम धरणग्रस्तांना घरांसाठी आर्थिक मदत

By admin | Updated: May 9, 2017 02:18 IST

नाशिक : भाम धरणाच्या घळ भरणीत पुनर्वसनसाठी ४८० कुटुंबांना घर बांधण्यासाठी पावणे दोन लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने घेतला

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या अकरा वर्षांपासून पूर्णत्वास येऊ पाहणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाच्या घळ भरणीत पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे अडथळा आणणाऱ्या ४८० कुटुंबांना घर बांधण्यासाठी प्रत्येकी पावणे दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने घेतला असून, त्यामुळे पाच गावांतील कुटुंबीयांनी स्थलांतरित होण्यास सहमती दर्शविल्याने पुढच्या वर्षांपासून भाम धरणात पाणी साठवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. डोंगर, दऱ्यांनी व्यापलेल्या इगतपुरी तालुक्यातील भरवद, काळुस्ते, तिरफण शिवारातील पाचशे हेक्टर क्षेत्रावर भाम धरणाचे काम सन २००६ मध्ये हाती घेण्यात आले, मात्र स्थानिक नागरिकांचा असलेला विरोध लक्षात घेता धरणासाठी जमीन संपादित करण्यात येऊनही जागामालकांनी स्थलांतरित होण्यास नकार दिला. ३५० कोटी रुपये खर्चाच्या व नाशिक, नगर व औरंगाबाद या तीन जिल्ह्णांसाठी जवळपास २.६० टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता ठेवणाऱ्या भाम धरणाच्या कामाने २०११ मध्ये खरी गती घेतली, त्यासाठी धरणात जागा जाणाऱ्या नागरिकांसाठी पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी भरवद, काळुस्ते शिवारात जागामालकांना राहण्यासाठी प्लॉट देण्यात येऊन त्याठिकाणी शाळा, रस्ते, पाणीपुरवठा, विजेची सोय करण्यात आली. याशिवाय जागामालकांना हेक्टरी ७ लाख ९० हजार रुपयांचा मोबदलाही अदा करण्यात आला. मात्र तरीही, भरवद, तिरफण, सारूकरेवाडी, बोरवाडी, दऱ्हेवाडी येथील ग्रामस्थांनी स्थलांतरीत होण्यास नकार दिला. गेल्या सात वर्षांपासून जागामालकांना स्थलांतरित करण्यासाठी अनेक वेळा बैठका व पाठपुरावा करण्यात येऊनही त्यांचा नकार कायम राहिला. याचदरम्यान धरणाचे जवळपास ७० टक्केकाम पूर्ण झाले झाले आहे. गेल्या वर्षीच पाटबंधारे खात्याने धरणाच्या घळभरणीचा मुहूर्तही ठरविला, परंतु ग्रामस्थांच्या विरोधामुळे तो लांबणीवर टाकावा लागला. धरणात जमिनी गेलेल्या जागामालकांना नवीन घरे बांधण्यासाठी शासनाच्या वतीने प्लॉट उपलब्ध करून देण्यात आलेले असले तरी, त्या जागेवर घर बांधण्यासाठी पैसे नसल्याचे कारण पुढे करून त्यांनी स्थलांतरीत होण्यास नकार देत असल्याची बाब जलसंपदामंत्री तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर मंत्रालयात वेळोवेळी बैठका होऊन अखेर ४८० कुटुंबांना घर बांधणीसाठी प्रत्येकी एक लाख, ७४ हजार, ७६३ रुपये देण्याचे ठरविण्यात आले. पाटबंधारे खात्याने त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, राज्यात हा पहिलाच प्रयोग असल्याचे पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.