शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मविप्र संस्थेत " ठाकरे राजवटी " चा अखेर उदय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2022 00:25 IST

रयत शिक्षण संस्थेनंतर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या नाशिकच्या मविप्र संस्थेत लोकशाही मार्गाने सत्तांतर झाले. दोन दशके ह्यपवार युगाह्णचा करिष्मा होता. डॉ. वसंतराव पवार यांनी आठ वर्षे तर डॉ.नीलिमा पवार यांनी १२ वर्षे या संस्थेची धुरा सांभाळली. अध्यक्षपदाचा उमेदवार वगळता पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलचे सर्व २० उमेदवार पराभूत झाले. गेल्या निवडणुकीत अल्पशा मताने पराभूत झालेल्या ॲड. नितीन ठाकरे यांच्या परिवर्तन पॅनलने देदीप्यमान यश मिळविले. जय पराजयाटी कारणमीमांसा दोन्ही गटांकडून केली जाईल. त्यात प्रस्थापितांविषयी असलेली नाराजी प्रामुख्याने होती. पॅनलचे गणित जुळविताना सत्ताधारी गटाला सर्वाधिक कसरत करावी लागते. ती प्रगती पॅनलला करावी लागली आणि त्याचा फटका बसला. परिवर्तन पॅनलने विरोधक या नात्याने आक्रमक प्रचार करीत गैरव्यवहार, भ्रष्टाचार, सभासदांना अपमानास्पद वागणूक अशी आरोपांची राळ उठवली. त्याला प्रत्युत्तर देण्यात प्रगती पॅनल कमी पडले.

ठळक मुद्देदोन दशकांच्या ह्यपवार युगाह्णचा धक्कादायक अस्त; पक्षीय किनार लाभल्याने राजकीय क्षेत्रावर दूरगामी परिणामठाकरेंच्या रणनीतीला कमालीचे यशपवार गटाची रणनीती असफलपवारांच्या आशीर्वादाचे गुपित उघडपॅनल पडले; ढिकले एकटे जिंकलेराजकारणावर परिणाम करणारा निकाल

मिलिंद कुलकर्णी रयत शिक्षण संस्थेनंतर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या नाशिकच्या मविप्र संस्थेत लोकशाही मार्गाने सत्तांतर झाले. दोन दशके ह्यपवार युगाह्णचा करिष्मा होता. डॉ. वसंतराव पवार यांनी आठ वर्षे तर डॉ.नीलिमा पवार यांनी १२ वर्षे या संस्थेची धुरा सांभाळली. अध्यक्षपदाचा उमेदवार वगळता पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलचे सर्व २० उमेदवार पराभूत झाले. गेल्या निवडणुकीत अल्पशा मताने पराभूत झालेल्या ॲड. नितीन ठाकरे यांच्या परिवर्तन पॅनलने देदीप्यमान यश मिळविले. जय पराजयाटी कारणमीमांसा दोन्ही गटांकडून केली जाईल. त्यात प्रस्थापितांविषयी असलेली नाराजी प्रामुख्याने होती. पॅनलचे गणित जुळविताना सत्ताधारी गटाला सर्वाधिक कसरत करावी लागते. ती प्रगती पॅनलला करावी लागली आणि त्याचा फटका बसला. परिवर्तन पॅनलने विरोधक या नात्याने आक्रमक प्रचार करीत गैरव्यवहार, भ्रष्टाचार, सभासदांना अपमानास्पद वागणूक अशी आरोपांची राळ उठवली. त्याला प्रत्युत्तर देण्यात प्रगती पॅनल कमी पडले.ठाकरेंच्या रणनीतीला कमालीचे यशअल्पशा मताने पराभव होऊनही नव्या जोमाने, उत्साहाने पुढील निवडणुकीच्या तयारीला लागण्याची ॲड. नितीन ठाकरे यांची कार्यशैली त्यांना या मोठ्या विजयाप्रत घेऊन गेली. पाच वर्षे वार्षिक सभा, विविध मंचाद्वारे संस्थेच्या कारभाराविरुद्ध त्यांनी सातत्याने आवाज उठविला. त्यातूनच निवडणुकीसाठी मातब्बरांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केले. नात्या-गोत्याचे राजकारण आणि प्रादेशिक संतुलन हे दोन महत्त्वाचे मुद्दे या निवडणुकीत प्रभावी ठरतात, हे लक्षात घेऊन स्वत: चांदवडचे असले तरी ४० टक्के मतदार असलेल्या निफाड तालुक्यातील सहा उमेदवारांना पॅनलमध्ये संधी दिली. ही खेळी यशस्वी ठरली. निफाड तालुक्याबाहेर सरचिटणीसपद गेले तरी सहा संचालक या तालुक्यातील असल्याचा आनंद या तालुक्याला वाटला. एकीकडे नीलीमाताई, त्यांची मुले प्रणव व अमृता यांच्या हस्तक्षेपाविषयी टीका करीत असतानाच पवार कुटुंबातील डी.बी. मोगल यांना पॅनलमध्ये स्थान देऊन वेगळा संदेश दिला.

पवार गटाची रणनीती असफलप्रस्थापितांना सत्ता राखणे मोठे कठीण असते. शिक्षण संस्थेत तर आणखी अवघड काम असते. नीलिमाताई पवार यांच्या गटाने संस्थेची प्रगती केली, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. आकडेवारी आणि वस्तुस्थिती त्याचे निदर्शक आहे. मात्र सत्ता राबविताना होणाऱ्या चुका टाळणे, खूप महत्त्वाचे असते. संस्थेत पदे असली तरी निर्णय सामूहिकपणे झाले तर ते गुणवत्तापूर्ण होतात. कोरोना काळाचा फटका या गटाला बसला. वैद्यकीय महाविद्यालयाचा या काळातील कारभार प्रचाराचा मुद्दा ठरला. अनेक महाविद्यालय, शाळांच्या नवीन इमारती, नामकरण हे कोरोना काळात करता न आल्याने निवडणुकीच्या दोन महिने आधी ती झाली, त्याकडे निवडणूक स्टंट असेच बघितले गेले. मतदारांशी संवाद आणि संपर्क त्यातून साधला गेला नाही. वारस सभासद नोंदणी, जिल्ह्याबाहेरील व्यक्तींना सभासदत्व हे मुद्दे देखील परिणामकारक ठरले. पाच वर्षांत केलेल्या प्रगतीचे गुणगान करीत असताना विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तरे देण्याऐवजी दुर्लक्ष करणे अंगलट आले.

पवारांच्या आशीर्वादाचे गुपित उघडनिवडणूक जाहीर होण्याच्या दोन दिवस आधी शरद पवार यांचा नाशिक मुक्काम या संस्थेच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. दोन्ही गटांनी पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला. श्रीराम शेटे यांच्या सरचिटणीसपदाच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चेवरून पवार यांनी प्रगती पॅनलच्या सूत्रधार नीलिमाताई पवार यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याची चर्चा पसरली. मात्र स्वत: शेटे यांनी प्रगती पॅनलच्या प्रचारात सहभागी होऊन या चर्चेतील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शरद पवार यांची राजकीय कार्यशैली ठाऊक असलेल्या मंडळींना योग्य संदेश यातून गेलाच. त्याचा परिणाम निकालात दिसून आला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात शरद पवार यांचा वावर आहे. या क्षेत्रातील मंडळींशी सातत्यपूर्ण संपर्क आणि संवाद असतो. त्यामुळे कोणत्या संस्थेत काय चालू आहे, याची बित्तंबातमी त्यांना असते. योग्यवेळी अचूक संदेश देण्याचे कसब त्यांनी अनेकदा दाखविले आहे. त्याचा पुन्हा प्रत्यय आला.

पॅनल पडले; ढिकले एकटे जिंकलेॲड. नितीन ठाकरे यांना मविप्रमध्ये संपूर्ण परिवर्तन घडवून आणताना केवळ अध्यक्षपदाचा अपवाद ठरला. आक्रमक नेते म्हणून परिचित असलेल्या माणिकराव कोकाटे यांचा पराभव करून डॉ. सुनील ढिकले हे विजयी झाले. प्रगती पॅनलचे एकमेव विजयी ठरलेले उमेदवार म्हणून त्यांची नोंद झाली. आश्चर्याचा धक्का देणारा हा निकाल होता. मुळात अध्यक्षपदावरून प्रगती पॅनलमध्ये नाट्य रंगले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा असताना डॉ. सुनील ढिकले यांना बढती देण्यात आली. उत्तमराव ढिकले यांची पुण्याई आणि आमदार राहुल ढिकले यांचे प्रयत्न कामी आले आणि यश मिळाले. याउलट कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे याच काळात विरोधात उभे ठाकल्याचे दिसले. सर्व पॅनल विजयी झाले आणि केवळ कोकाटे कसे पडले? सर्व पॅनल पराभूत झाले आणि केवळ ढिकले कसे विजयी झाले? या प्रश्नांचे कोडे लवकर उलगडणार नाही. मतदानाच्या पद्धतीनुसारदेखील हे आश्चर्यकारक आहे. यथावकाश कारण पुढे येईल.

राजकारणावर परिणाम करणारा निकालशिक्षण संस्थेची निवडणूक असली तरी राजकीय शिलेदारांच्या सहभागाने ही निवडणूक गाजली. निकालानंतर त्याचे परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर तसेच पुढे होणाऱ्या निवडणुकांवर निश्चितच होणार आहेत. लोकसभा निवडणुकीला अवघे २० महिने शिल्लक आहेत. त्याची चर्चा या निवडणुकीदरम्यान सुरू झाली. हेमंत गोडसे यांनी शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने अनेक इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. माणिकराव कोकाटे यांची इच्छा आहे. त्याच सोबत त्यांचा पराभव केलेल्या डॉ. सुनील ढिकले यांचे बंधू आमदार राहुल ढिकले यांनाही लोकसभा निवडणूक लढवायची आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कोकाटे आणि ढिकले यांनी मतदारसंघात चाचपणी करून पाहिली. भाजपमध्ये दिनकर पाटील हेदेखील प्रयत्नशील आहेत. या समीकरणांचा प्रभाव निवडणुकीवर राहिला, असा होरा राजकीय तज्ज्ञांचा आहे. त्यानंतर विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकांची समीकरणेदेखील या निवडणुकीत जुळविण्याचा प्रयत्न झाला.

टॅग्स :PoliticsराजकारणmarathaमराठाElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस