शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ कांद्याची लागवड अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 15:32 IST

देवळा : डिसेंबर महिन्यात विक्र मी प्रतिक्विंटल ११ हजार रूपयांचा टप्पा पार केलेल्या कांद्याचा दर आता तीन हजार रु पयांपर्यंत कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

देवळा : डिसेंबर महिन्यात विक्रमी प्रतिक्विंटल ११ हजार रूपयांचा टप्पा पार केलेल्या कांद्याचा दर आता तीन हजार रु पयांपर्यंत कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांदा शेतकऱ्यांना चिंता मुक्त करणार असे चित्र निर्माण होत असतांनाच कांद्याने सर्वांना पुन्हा चिंताग्रस्त केलेले आहे. देवळा तालुक्यात उन्हाळी कांद्याची लागवड सुरु असुन आता ही लागवड अंतिम टप्प्यात आहे. कांदा रोपांच्या टंचाईनंतरही उन्हाळी कांद्याचे विक्र मी लागवड होण्याची चिन्हे दिसत आहेत.चालूवर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्यानंतर दुष्काळाच्या गर्तेतून बाहेर येत शेतकºयांंनी मोठया आशेने पोळ कांद्याची लागवड केली. या कांद्याचे चांगले उत्पादन मिळेल या अपेक्षेत शेतकरी होते. परंतु अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकºयांच्या आशेवर पाणी फेरले. कांद्याच्या रोपांनाही याचा फटका बसल्यामुळे शेतकºयांना तीन टप्यात कांदा बियाणे शेतात टाकावे लागले. सुरूवातीला दोन वेळा टाकलेले बियाणे पावसामुळे नुकसान झाले. पाण्याची सर्वत्र उपलब्धता असल्याने उत्पादन देणारे पिक म्हणुन शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवडीकडे वळले असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड सुरु झाली. यामुळे मजुरांचा भाव वधारला.गावागावात मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने शेजारील गावातुन मजुर मागविले जात आहेत. गावातील स्थानिक मजुर आठवडाभर काम केल्यानंतर रविवारी मजुरीचे पैसे शेतकर्यांकडुन घेण्याची पद्धत आजही टिकून आहे.परंतु बाहेरगावाहून येणार्या मजुरांना दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी बांधावरच मजुरीचे पैसे द्यावे लागतात.यामुळे शेतकर्यांना पैशांची जमवाजमव करतांना चांगलीच धावपळ करावी लागते. मजूर टंचाईवर मात करण्यासाठी शेतकरी विविध उपाय योजना करत आहे. कांदा लागवड करतांना ठिबक, व तुषार सिंचन पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. यामुळे पीकाला पाणी देण्यासाठी मजुराची गरज लागणार नाही, तसेच हा ठिबक संच आगामी पीकांनाही उपयोगी पडणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक