शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

उन्हाळी ऐवजी लाल रंगडा कांदा लागवडीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 17:16 IST

खामखेडा : विहिरींना पाणी कमी असल्याने खामखेडा परिसरातील शेतकरी उन्हाळी कांदा ऐवजी लाल रांगडा कांदा लागवडीकडे कल दिसून येत आहे.

ठळक मुद्देरंगडा कांद्याची लागवड करण्याच्या तयारी शेतकरी दिसून येत आहे.

खामखेडा : विहिरींना पाणी कमी असल्याने खामखेडा परिसरातील शेतकरी उन्हाळी कांदा ऐवजी लाल रांगडा कांदा लागवडीकडे कल दिसून येत आहे.नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यात कसमादे परिसरातील गिरणा काठावरील खामखेडा, सावकी विठेवाडी, भऊर, पिळकोस, बगडू बेज, भादवन, विसापूर, बिजोरे आदी गावांमघ्ये मोठया प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. उन्हाळी कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. या भागातील सर्वसाधारण शेतकरी तीनशे ते चारशे क्विंटल कांदा चाळीत साठवितो. परंतु चालू वर्षी पाहिजेत्या प्रमाणात पाऊस पडला नाही, त्यामुळे या वर्षी विहिरींनी तळ गाडला आहे. त्यामुळे यापुढे उन्हाळी कांद्याच्या ऐवजी रांगडा लाल कांदा लागवड करण्याचा विचारात आहे.या वर्षी अल्पशा पावसामुळे धरणे, नालाबंडिंग याचा पाणी न आल्यामुळे पाण्याची साठवणूक झाली नाही. त्यामुळे जमिनीच्या भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. परिणामी विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. ज्या काही शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी आहे, असे शेतकरी या वर्षी उन्हाळी कांद्या ऐवजी रंगडा लाल कांद्याची लागवड करण्याचा तयारीत आहेत. कारण लाल रांगडा कांदा हा उन्हाळी कांद्यापेक्षा एक ते दीड महिना आधी तयार होतो. रंगडा कांद्याला जरी थोड्याफार प्रमाणात पाण्याचा तुटवडा झाला तरी त्याची थोडया फार प्रमाणात गळती होते. तसे उन्हाळी कांद्याला जर पाण्याचा तुटवडा झाली तर त्याची गळती होत नाही. तेव्हा पुढे पाणी राहणार नाही म्हणून रंगडा कांद्याची लागवड करण्याच्या तयारी शेतकरी दिसून येत आहे.सद्या रंगडा कांद्याच्या रोपांचा तुटवडा दिसून येते आहे. तेव्हा कोठे रंगडा कांद्याचे रोप कोठे मिळते का याची विचारांना करताता दिसून येत आहे. पुढे परतीचा पाऊस पडेल आणि विहिरींना पाणी उतरेल आशा आशेवर काही शेतकºयांनी रंगडा कांद्याचे बियाणे टाकले होते. आणि परतीच्या पाऊसाने पाठ फिरविली शिवाय विहिरींना पाणी उतरले नाही. आशा शेतकºयांना कांद्याचे रोपे विकल्याशिवाय पर्यत नाही. त्यामुळे आता रोपांचा भाव वाढला आहे. हे रोपे चढत्या किमतीत विकली जात आहेत. सद्या उन्हाळी कांद्यासह लालकांद्याच्या भावामघ्ये चांगली भाववाढ झाल्याने पुढे पाण्याअभावी कांद्याला चागला भाव मिळेल या अपेक्षेने मिळेल त्या ठिकाणी आणि मिळेल त्या किमतीत शेतकरी रोपांची खरेदी करून रंगडा कांद्याच्या लागवडीवर भर देत आहे.