शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उन्हाळी ऐवजी लाल रंगडा कांदा लागवडीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 17:16 IST

खामखेडा : विहिरींना पाणी कमी असल्याने खामखेडा परिसरातील शेतकरी उन्हाळी कांदा ऐवजी लाल रांगडा कांदा लागवडीकडे कल दिसून येत आहे.

ठळक मुद्देरंगडा कांद्याची लागवड करण्याच्या तयारी शेतकरी दिसून येत आहे.

खामखेडा : विहिरींना पाणी कमी असल्याने खामखेडा परिसरातील शेतकरी उन्हाळी कांदा ऐवजी लाल रांगडा कांदा लागवडीकडे कल दिसून येत आहे.नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यात कसमादे परिसरातील गिरणा काठावरील खामखेडा, सावकी विठेवाडी, भऊर, पिळकोस, बगडू बेज, भादवन, विसापूर, बिजोरे आदी गावांमघ्ये मोठया प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. उन्हाळी कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. या भागातील सर्वसाधारण शेतकरी तीनशे ते चारशे क्विंटल कांदा चाळीत साठवितो. परंतु चालू वर्षी पाहिजेत्या प्रमाणात पाऊस पडला नाही, त्यामुळे या वर्षी विहिरींनी तळ गाडला आहे. त्यामुळे यापुढे उन्हाळी कांद्याच्या ऐवजी रांगडा लाल कांदा लागवड करण्याचा विचारात आहे.या वर्षी अल्पशा पावसामुळे धरणे, नालाबंडिंग याचा पाणी न आल्यामुळे पाण्याची साठवणूक झाली नाही. त्यामुळे जमिनीच्या भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. परिणामी विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. ज्या काही शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी आहे, असे शेतकरी या वर्षी उन्हाळी कांद्या ऐवजी रंगडा लाल कांद्याची लागवड करण्याचा तयारीत आहेत. कारण लाल रांगडा कांदा हा उन्हाळी कांद्यापेक्षा एक ते दीड महिना आधी तयार होतो. रंगडा कांद्याला जरी थोड्याफार प्रमाणात पाण्याचा तुटवडा झाला तरी त्याची थोडया फार प्रमाणात गळती होते. तसे उन्हाळी कांद्याला जर पाण्याचा तुटवडा झाली तर त्याची गळती होत नाही. तेव्हा पुढे पाणी राहणार नाही म्हणून रंगडा कांद्याची लागवड करण्याच्या तयारी शेतकरी दिसून येत आहे.सद्या रंगडा कांद्याच्या रोपांचा तुटवडा दिसून येते आहे. तेव्हा कोठे रंगडा कांद्याचे रोप कोठे मिळते का याची विचारांना करताता दिसून येत आहे. पुढे परतीचा पाऊस पडेल आणि विहिरींना पाणी उतरेल आशा आशेवर काही शेतकºयांनी रंगडा कांद्याचे बियाणे टाकले होते. आणि परतीच्या पाऊसाने पाठ फिरविली शिवाय विहिरींना पाणी उतरले नाही. आशा शेतकºयांना कांद्याचे रोपे विकल्याशिवाय पर्यत नाही. त्यामुळे आता रोपांचा भाव वाढला आहे. हे रोपे चढत्या किमतीत विकली जात आहेत. सद्या उन्हाळी कांद्यासह लालकांद्याच्या भावामघ्ये चांगली भाववाढ झाल्याने पुढे पाण्याअभावी कांद्याला चागला भाव मिळेल या अपेक्षेने मिळेल त्या ठिकाणी आणि मिळेल त्या किमतीत शेतकरी रोपांची खरेदी करून रंगडा कांद्याच्या लागवडीवर भर देत आहे.