शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

By admin | Updated: July 16, 2014 00:36 IST

पाणीपुरवठा योजनेत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

घोटी : धरणांचा तालुका अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी मुबलक साठा असतानाही केवळ पाणीपुरवठा समिती, तांत्रिक सल्लागार, अधिकारी आणि स्थानिक राजकारण यांच्यामुळे अनेक योजना अपूर्णावस्थेत आहेत. या योजना पूर्ण कराव्यात यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आलेत, मात्र या प्रयत्नाला अद्यापही यश आले नाही. या योजना मात्र ‘जैसे थे’च असल्याने योजना मंजूर झालेल्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे ही तालुक्याची शोकांतिका आहे. या योजना अपूर्ण राहण्यास कारणीभूत असलले संबधित अधिकारी, पाणीपुरवठा समिती यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश आमदार निर्मला गावित यांनी बैठकीत दिले.तालुक्यातील अपूर्ण पाणीपुरवठा योजना व विद्यमान पाणीपुरवठ्याची स्थिती याचा आढावा घेण्यासाठी आज खंबाळे येथे आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस आमदार गावित यांच्यासह अर्थ व बांधकाम सभापती तथा पंचायत समितीच्या प्रभारी सभापती अलका जाधव, जिल्हा परिषद सदस्य बेबीताई माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी, पंचायत समिती सदस्य लहानू हिंदोळे, तहसीलदार महेंद्र पवार गटविकास अधिकारी किरण कोवे, पाणीपुरवठा योजनेचे उपअभियंता आर. टी. चित्ते यांच्यासह कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष कचरू डुकरे, पांडुरंग शिंदे, संपतराव काळे, भरत आरोटे आदि उपस्थित होते. या बैठकीत आमदार गावित यांनी उपस्थित सरपंच, उपसरपंच यांच्या पाणीपुरवठ्याबाबतच्या व्यथा जाणून घेत पाणीपुरवठा योजनांची माहिती घेतली. यात तालुक्यातील उंबरकोण, धारगाव, बलायदुरी, आडवण, पिंपळगावमोर, निनावी अधरवड, दौंडत, देवळे, साकूर, सांजेगाव, मुकणे आदि गावांत पाणीपुरवठा योजना मंजूर करूनही ही कामे अपूर्ण राहिली असल्याची बाब उपस्थितांनी मांडली. या योजना स्थानिक राजकारण, तांत्रिक सल्लगार आणि अधिकाऱ्यांची उदासीनता यामुळे अपूर्ण राहिल्या असल्याची बाब स्पष्ट झाली. यावर आमदार गावित यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरीत या योजना तत्काळ पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत किंवा योजनेत अडसर ठरणाऱ्या संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट केले. दरम्यान, यावेळी आमदार गावित यांनी मराठा आणि मुस्लीम समाजाला आदिवासी तालुक्यात आरक्षण मिळणे गरजेचे असून, परिणामी या मागणीसाठी आपण रस्त्यावर उतरू आणि जनआंदोलन करू असा इशारा दिला. (* वार्ताहर)