शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गरिबांच्या प्रश्नांसाठी लढा उभारावा लागेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:22 IST

स्थानिकांना स्थानिक रोजगार मिळाला पाहिजे, पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. या व अशा अनेक मागण्यांसाठी शासनाकडून गरिबांचे व आदिवासींचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी मोठा लढा उभारावा लागेल, असे आवाहन रविवारी हरसूल येथील आयोजित किसान सभेच्या जाहीर सभेत माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी केले.

ठळक मुद्देजे. पी. गावित : हरसूल किसान सभेच्या वतीने सभा

त्र्यंबकेश्वर : जंगल, जमिनी आदिवासींच्या असून, सरकार वनदावे देताना अवास्तव कागदपत्रांची मागणी करून गरिबांची हेळसांड करीत आहे. आदिवासींच्या शिक्षणाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करीत आहे. घरकुलांचे बांधकाम झालेले असताना घरकुल हप्ते मिळत नाहीत. स्थानिकांना स्थानिक रोजगार मिळाला पाहिजे, पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. या व अशा अनेक मागण्यांसाठी शासनाकडून गरिबांचे व आदिवासींचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी मोठा लढा उभारावा लागेल, असे आवाहन रविवारी हरसूल येथील आयोजित किसान सभेच्या जाहीर सभेत माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी केले. सभेचे आयोजन किसान सभेचे सेक्रेटरी इरफान शेख यांनी केले होते.गावित यांनी सांगितले की, सरकारला भरणाऱ्या कराच्या तुलनेत गरिबांना सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत. दिवसेंदिवस महागाई वाढत असून, शासन महागाई रोखण्यात कमी पडत आहे. गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किमती खूप वाढत आहे. गरिबांना आपल्या रोजगार व हक्कांसाठी मोठा लढा उभा करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले.हरसूल येथील आयोजित सभेत शेतकरी व आदिवासींच्या विविध प्रश्नांवर विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. आदिवासींचा निधी आदिवासींसाठी पूर्णपणे वापरला पाहिजे. आदिवासींचे वनदावे मंजूर केले पाहिजे, असे मत किसान सभेचे सेक्रेटरी इरफान शेख यांनी व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर सभेच्या अध्यक्षस्थानी रमेश बरफ (जि. प. सदस्य, ठाणापाडा गट) यांच्या समवेत सावळीराम पवार, इरफान शेख, सभापती ज्योती राऊत, देवराम मौळे, जावेद जहागीरदार, शाफिक शेख, नामदेव मोहोंडकर, महेश टोपले आदींसह अनेक मान्यवर वशेकडो किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणJ.P. Gavitजे.पी. गावित