शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

नाशिकमध्ये पन्नास टक्के उद्योग क्षेत्राला दिलासा : शशिकांत जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 17:15 IST

नाशिक- कोरोनामुळे देशभरात संचारबंदी लागु करण्यात आले. त्याच बरोबर संचारबंदी लागु करण्यात आली आहे. नाशिक मधील उद्योग क्षेत्र त्यामुळे बंद असल्याने सुमारे दोन हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. तथापि, आता येत्या सोमवारपासून (दि.२०) नाशिकमधील ग्रामीण भागातील उद्योग सुरू होणार असल्याने नाशिकमधील किमान पन्नास टक्के उद्योगांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी दिली.

ठळक मुद्देमनपा क्षेत्रातील उद्योग बंदच राहणारलॉक डाऊनमुळे दोन हजार कोटींचे नुकसान

नाशिक- कोरोनामुळे देशभरात संचारबंदी लागु करण्यात आले. त्याच बरोबर संचारबंदी लागु करण्यात आली आहे. नाशिक मधील उद्योग क्षेत्र त्यामुळे बंद असल्याने सुमारे दोन हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. तथापि, आता येत्या सोमवारपासून (दि.२०) नाशिकमधील ग्रामीण भागातील उद्योग सुरू होणार असल्याने नाशिकमधील किमान पन्नास टक्के उद्योगांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी दिली.प्रश्न- लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकच्या उद्योग क्षेत्राला दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु त्यात यश मिळाले नाही.जाधव : नाािशक जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधीत रूग्ण मालेगावमध्ये आढळले. त्यामुळे कोरोनाबाधीत रूग्ण संख्येच्या आधारे रेड आणि आॅरेंज झोन मध्ये नाशिकचा समावेश करू नये त्या ऐवजी मालेगावला हॉट स्पॉट घोषीत करून अवघे चार ते पाच रूग्ण असलेल्या नाशिकला आॅरेंज झोनमध्ये सामाविष्ट करून त्यातील उद्योग सुरू करावे अशी मागणी निमाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. शासनाने महापालिका हद्द वगळून उद्योग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.प्रश्न: नाशिकमधील औद्योगिक वसाहतीला त्यामुळे किती दिलासा मिळेल?जाधव: २० एप्रिल पासून काही उदयोग व्यवसाय सुरू करता येतील हे पंतप्रधानांनी अगोदरच जाहिर केले होते. त्यामुळे राज्याच्या उद्योग मंत्र्यांकडे निमाने पाठपुरावा करून नाशिक जिल्ह्यातील सर्वच उद्योग सुरू करण्यासाठी मागणी केली होती. मात्र, सद्य स्थितीत केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसारच राज्य शासनाने भूमिका घेतली आहे. त्यानुसार मालेगाव आणि नाशिक महापालिका क्षेत्र वगळून उद्योग सुरू करण्यास मान्यता देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरी, वाडीवºहे यांच्यासह ग्रामीण भागातील उद्योग सुरू झाल्याने किमान नाशिकमधील ५० टक्के उद्योग सुरू होतील. तेथील कामगारांच्या रोजीरोटीची सोय होईल.प्रश्न: लॉकडाऊनमुळे उद्योग क्षेत्राचे खूपच नुकसान झाले आहे..जाधव : होय नाशिकमधील उद्योग क्षेत्राचे किमान दोन हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. आज नाशिकमधील किमान पन्नास टक्के उद्योग सोमवारपासून सुरू होतील. त्यातील सर्वच उद्योजकांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना आणि नियमांचे पालन करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. ते आवश्यकही आहे. मात्र, ३ मे नंतर सर्व उद्योग सुरू होतील अशी अपेक्षा आहे.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याMIDCएमआयडीसी