शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

रहिवाशांमध्ये तीव्र संताप

By admin | Updated: July 31, 2016 00:54 IST

पवारवाडी, गुलाबवाडीतून बंदी असूनही अवजड वाहतूक सुरूच

 नाशिक : दोन दिवसांपूर्वी नाशिकरोड येथील पवारवाडी येथे अवजड वाहनाखाली सापडून एका तीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर पवारवाडी आणि गुलाबवाडीतील नागरिक सुन्न झाले आहेत. अत्यंत विदारक आणि भयानक अशा या अपघाताच्या घटनेमुळे रहिवासी क्षेत्रातून होणाऱ्या अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. विशेष म्हणजे रहिवासी क्षेत्रातून अवजड वाहनांना बंदी असतानाही राजकीय वरदहस्त आणि ट्रान्सपोर्ट मालकांच्या मनमानी कारभारामुळे भर वस्तीतून अवजड वाहतूक सुरू आहे. नागरिकांच्या जीवाशी हा खेळ गेली कित्येक वर्षे सुरू आहे. आता मात्र नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला असून, शुक्रवारच्या घटनेनंतर रहिवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. रहिवासी क्षेत्रातील अवजड वाहतूक बंद न झाल्यास कायदा हातात घेण्याची भाषा येथील नागरिक करू लागले आहेत.गुलाबवाडी, पवारवाडी आणि राजवाडा येथून रेल्वे मालधक्क्याची अवजड वाहतूक सातत्याने सुरू असते. नागरिकांच्या अगदी घराजवळून अवजड वाहने जात असल्याने नागरिकांना घराच्या बाहेर पडणेही जिकरीचे वाटू लागले आहे. या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली असता नागरिक जीवन-मृत्यूशी रोजच झगडत असल्याचे चित्र समोर येते. जियाउद्दीन डेपो येथे अवजड वाहनांसाठी असलेला वजनकाटा त्वरित हलवावा, अशी मागणी येथील नागरिकांची आहे. या परिसरात आतापर्यंत मालट्रकने आठ ते दहा जणांचा बळी घेतला आहे. एकट्या पवारवाडी परिसरात सहा वर्षांत सात जणांचा बळी गेला आहे. रेल्वे मालधक्का मार्गावर झालेल्या अनेक अपघातांमध्ये काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे. कित्येक निष्पाप बळी गेले आहेत. मात्र पैशाच्या जोरावर येथील ट्रान्सपोर्ट मालकांकडून प्रकरणावर पडदा पाडला जात असल्याने येथील वाहतूक बिनबोभाट सुरू असल्याचा आरोप परिसरातील संतप्त नागरिक करीत आहे. या घटनेनंतर तरी आता प्रशासनाला जाग येईल का? असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. (प्रतिनिधी)