शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

खरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकऱ्यांना खत दरवाढीचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:13 IST

सायखेडा : कोरोनाचे संकट, सततचा लॉकडाऊन, पडलेले बाजार भाव नैसर्गिक आपत्ती, बेमोसमी पाऊस यामुळे शेती अगोदर ...

सायखेडा : कोरोनाचे संकट, सततचा लॉकडाऊन, पडलेले बाजार भाव नैसर्गिक आपत्ती, बेमोसमी पाऊस यामुळे शेती अगोदर तोट्यात असताना, रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतीने बळीराजाला शॉकच बसला आहे. रासायनिक खतांचा वापर केला नाही, तर पीक जोमात येणार नसल्याची भीतीही आहे, तर शासनाने रासायनिक खत आणि त्या संदर्भातील कंपन्या यांच्यावरील शासन अनुदान काढून घेतल्यामुळे किमती वाढल्याचे बोलले जात आहे.

लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. शेतीच्या मशागतीची कामे सुरू झाली आहेत. काही दिवसांत मृग नक्षत्र येणार आहे, मृग नक्षत्र सुरू झाले की, खरीप हंगामातील नगदी पिकांची लागवड सुरू होते. पीक जोमाने वाढावे, यासाठी लागवडीनंतर अवघ्या चार दिवसांत रासायनिक खतांची मात्रा द्यावी लागते. सुरुवातीपासून रासायनिक खत दिल्यावर पीक जोमात वाढायला सुरुवात होते. खत नसेल तर पीक जमीन सोडत नाही, त्यामुळे खत महत्त्वाचे असते. खतांच्या वाढलेल्या किंमत आणि डिझेलचे वाढलेले दर यामुळे शेतीची मशागत आणि पिकासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांचे डोकेदुखी ठरत आहे. भरघोस पीक घेण्यासाठी येणारा खर्च वाढून त्या तुलनेत बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पादन दुप्पट करणार असलेले सरकार शेतकऱ्यांचा खर्च मात्र दुप्पट करत आहे. शेती आणि शेतकरी समृद्ध होण्यासाठी शेती उपयोगी साधने यांच्यावरील कर कमी करून शेतकऱ्यांना सवलत द्यावी, अशी मागणी होत आहे.

--------------------

अशी झाली दरवाढ

खताचा प्रकार जुने दर नवीन दर

डीएपी १२०० १९००

पोटॅश ८५० १०००

१०:२६:२६ १२५० १७७५

१०:२६:१६ ११८५ १८००

१६:१६:१६ ११७५ १४००

---------------

खरीप हंगामाच्या सुरुवातीला रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती पिकांचा खर्च वाढवणार आहे.

वाढलेल्या खर्चाच्या तुलनेत मालाला भाव मिळत नाही, त्यामुळे शेती तोट्यात जात आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा एकही निर्णय केंद्र सरकार घेत नाही.

- रामा राजोळे, अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना निफाड

--------------

डिझेलचे भाव गगनाला भिडले, त्यामुळे मशागतीचा खर्च वाढला आणि आत्ता रासायनिक खतांच्या किमती प्रचंड वाढवून शेतकऱ्यांना शेतात पीक उभे करताच आले नाही पाहिजे, असा बंदोबस्त सरकार करत आहे.

शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याऐवजी खर्च मात्र काही पट वाढविला आहे.

- गणेश पोटे, शेतकरी, भुसे