शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

खरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकऱ्यांना खत दरवाढीचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:13 IST

सायखेडा : कोरोनाचे संकट, सततचा लॉकडाऊन, पडलेले बाजार भाव नैसर्गिक आपत्ती, बेमोसमी पाऊस यामुळे शेती अगोदर ...

सायखेडा : कोरोनाचे संकट, सततचा लॉकडाऊन, पडलेले बाजार भाव नैसर्गिक आपत्ती, बेमोसमी पाऊस यामुळे शेती अगोदर तोट्यात असताना, रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतीने बळीराजाला शॉकच बसला आहे. रासायनिक खतांचा वापर केला नाही, तर पीक जोमात येणार नसल्याची भीतीही आहे, तर शासनाने रासायनिक खत आणि त्या संदर्भातील कंपन्या यांच्यावरील शासन अनुदान काढून घेतल्यामुळे किमती वाढल्याचे बोलले जात आहे.

लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. शेतीच्या मशागतीची कामे सुरू झाली आहेत. काही दिवसांत मृग नक्षत्र येणार आहे, मृग नक्षत्र सुरू झाले की, खरीप हंगामातील नगदी पिकांची लागवड सुरू होते. पीक जोमाने वाढावे, यासाठी लागवडीनंतर अवघ्या चार दिवसांत रासायनिक खतांची मात्रा द्यावी लागते. सुरुवातीपासून रासायनिक खत दिल्यावर पीक जोमात वाढायला सुरुवात होते. खत नसेल तर पीक जमीन सोडत नाही, त्यामुळे खत महत्त्वाचे असते. खतांच्या वाढलेल्या किंमत आणि डिझेलचे वाढलेले दर यामुळे शेतीची मशागत आणि पिकासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांचे डोकेदुखी ठरत आहे. भरघोस पीक घेण्यासाठी येणारा खर्च वाढून त्या तुलनेत बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पादन दुप्पट करणार असलेले सरकार शेतकऱ्यांचा खर्च मात्र दुप्पट करत आहे. शेती आणि शेतकरी समृद्ध होण्यासाठी शेती उपयोगी साधने यांच्यावरील कर कमी करून शेतकऱ्यांना सवलत द्यावी, अशी मागणी होत आहे.

--------------------

अशी झाली दरवाढ

खताचा प्रकार जुने दर नवीन दर

डीएपी १२०० १९००

पोटॅश ८५० १०००

१०:२६:२६ १२५० १७७५

१०:२६:१६ ११८५ १८००

१६:१६:१६ ११७५ १४००

---------------

खरीप हंगामाच्या सुरुवातीला रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती पिकांचा खर्च वाढवणार आहे.

वाढलेल्या खर्चाच्या तुलनेत मालाला भाव मिळत नाही, त्यामुळे शेती तोट्यात जात आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा एकही निर्णय केंद्र सरकार घेत नाही.

- रामा राजोळे, अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना निफाड

--------------

डिझेलचे भाव गगनाला भिडले, त्यामुळे मशागतीचा खर्च वाढला आणि आत्ता रासायनिक खतांच्या किमती प्रचंड वाढवून शेतकऱ्यांना शेतात पीक उभे करताच आले नाही पाहिजे, असा बंदोबस्त सरकार करत आहे.

शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याऐवजी खर्च मात्र काही पट वाढविला आहे.

- गणेश पोटे, शेतकरी, भुसे