शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची पन्नाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:39 IST

नाशिक : कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, आजवर ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवर केले जाणारे प्रयत्न फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरू झाल्याने शेतकºयांसाठी पेरणीयोग्य हंगाम असतानाच शेतकरी आत्महत्या करीत असल्याची बाब अधिक गंभीर मानली जात ...

ठळक मुद्दे मालेगावी सर्वाधिक : निफाड, सिन्नर, दिंडोरीही अग्रेसर

नाशिक : कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, आजवर ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवर केले जाणारे प्रयत्न फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरू झाल्याने शेतकºयांसाठी पेरणीयोग्य हंगाम असतानाच शेतकरी आत्महत्या करीत असल्याची बाब अधिक गंभीर मानली जात आहे.निफाड तालुक्यातील चांदोरी येथील खंडेराव मुरलीधर आहेर (७०) यांनी शुक्रवारी रात्री कुटुंबासमवेत जेवण केल्यानंतर थोड्याच वेळात विष प्राशन केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नावे गट नंबर ८३१ व ५५९ मध्ये १ हेक्टर ५२ आर इतके क्षेत्र असून, त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. सधन समजल्या जाणाºया निफाड तालुक्यात ही सातवी शेतकºयाची आत्महत्या आहे. राज्य शासनाने गेल्या वर्षी शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केल्यानंतर आत्महत्यांच्या घटनांना रोख लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु गेल्या वर्षाच्या शेतकºयांच्या आत्महत्येचे लोण यंदाही कायम असून, जानेवारी महिन्यापासून दरमहा कमीत कमी सहा ते सात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सर्वाधिक आत्महत्या मालेगाव तालुक्यात (९) झाल्या असून, त्याखालोखाल सिन्नर, दिंडोरी येथे प्रत्येकी ७ शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. पेठ, सुरगाणा व कळवण या आदिवासी तालुक्यांमध्ये मात्र एकाही शेतकºयाने आत्महत्या केलेली नाही, तर बागलाण (५), नाशिक, देवळा, त्र्यंबकेश्वर प्रत्येकी ३, चांदवड, येवला येथे २ व इगतपुरी, नांदगाव येथे प्रत्येकी एक शेतकºयाने आत्महत्या केली आहे.आत्महत्या करणाºया शेतकºयाच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत दिली जात असल्याने ३४ प्रकरणांवर जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत चर्चा होऊन त्यातील फक्त १३ शेतकरी कुटुंब आर्थिक मदतीसाठी पात्र ठरले असून, २१ प्रकरणांमध्ये शेतकरी आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे झाली नसल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे, तर १६ प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.