शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
2
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
3
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मृत मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
5
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
6
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
9
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
10
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
11
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."
12
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
13
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
14
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
15
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
16
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी
17
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
18
Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या
19
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
20
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची पन्नाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:39 IST

नाशिक : कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, आजवर ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवर केले जाणारे प्रयत्न फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरू झाल्याने शेतकºयांसाठी पेरणीयोग्य हंगाम असतानाच शेतकरी आत्महत्या करीत असल्याची बाब अधिक गंभीर मानली जात ...

ठळक मुद्दे मालेगावी सर्वाधिक : निफाड, सिन्नर, दिंडोरीही अग्रेसर

नाशिक : कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, आजवर ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवर केले जाणारे प्रयत्न फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरू झाल्याने शेतकºयांसाठी पेरणीयोग्य हंगाम असतानाच शेतकरी आत्महत्या करीत असल्याची बाब अधिक गंभीर मानली जात आहे.निफाड तालुक्यातील चांदोरी येथील खंडेराव मुरलीधर आहेर (७०) यांनी शुक्रवारी रात्री कुटुंबासमवेत जेवण केल्यानंतर थोड्याच वेळात विष प्राशन केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नावे गट नंबर ८३१ व ५५९ मध्ये १ हेक्टर ५२ आर इतके क्षेत्र असून, त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. सधन समजल्या जाणाºया निफाड तालुक्यात ही सातवी शेतकºयाची आत्महत्या आहे. राज्य शासनाने गेल्या वर्षी शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केल्यानंतर आत्महत्यांच्या घटनांना रोख लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु गेल्या वर्षाच्या शेतकºयांच्या आत्महत्येचे लोण यंदाही कायम असून, जानेवारी महिन्यापासून दरमहा कमीत कमी सहा ते सात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सर्वाधिक आत्महत्या मालेगाव तालुक्यात (९) झाल्या असून, त्याखालोखाल सिन्नर, दिंडोरी येथे प्रत्येकी ७ शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. पेठ, सुरगाणा व कळवण या आदिवासी तालुक्यांमध्ये मात्र एकाही शेतकºयाने आत्महत्या केलेली नाही, तर बागलाण (५), नाशिक, देवळा, त्र्यंबकेश्वर प्रत्येकी ३, चांदवड, येवला येथे २ व इगतपुरी, नांदगाव येथे प्रत्येकी एक शेतकºयाने आत्महत्या केली आहे.आत्महत्या करणाºया शेतकºयाच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत दिली जात असल्याने ३४ प्रकरणांवर जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत चर्चा होऊन त्यातील फक्त १३ शेतकरी कुटुंब आर्थिक मदतीसाठी पात्र ठरले असून, २१ प्रकरणांमध्ये शेतकरी आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे झाली नसल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे, तर १६ प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.