शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण...
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
4
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
5
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
6
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
7
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
8
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
9
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
10
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
11
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
12
"मी पंकज कपूर यांचा मुलगा आहे, पण इंडस्ट्रीत एकटा लढलो", शाहिद कपूर स्पष्टच बोलला
13
हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर
14
सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?
15
केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
16
न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विक्रीला निघाले;  २०१६ मध्ये ट्रम्प यांना आठवण झालेली...
17
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
18
स्कूटी घेऊन जाताना कोसळला, २७ वर्षीय विनीतचा हार्ट अटॅकने मृत्यू; धडकी भरवणारा Video
19
पाकिस्तानमध्ये 'एचआयव्ही'चा कहर! १५ वर्षांत रुग्णसंख्या तिपटीने वाढली; लहान मुलांनाही संसर्ग! 
20
भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची पन्नाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:39 IST

नाशिक : कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, आजवर ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवर केले जाणारे प्रयत्न फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरू झाल्याने शेतकºयांसाठी पेरणीयोग्य हंगाम असतानाच शेतकरी आत्महत्या करीत असल्याची बाब अधिक गंभीर मानली जात ...

ठळक मुद्दे मालेगावी सर्वाधिक : निफाड, सिन्नर, दिंडोरीही अग्रेसर

नाशिक : कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, आजवर ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवर केले जाणारे प्रयत्न फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरू झाल्याने शेतकºयांसाठी पेरणीयोग्य हंगाम असतानाच शेतकरी आत्महत्या करीत असल्याची बाब अधिक गंभीर मानली जात आहे.निफाड तालुक्यातील चांदोरी येथील खंडेराव मुरलीधर आहेर (७०) यांनी शुक्रवारी रात्री कुटुंबासमवेत जेवण केल्यानंतर थोड्याच वेळात विष प्राशन केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नावे गट नंबर ८३१ व ५५९ मध्ये १ हेक्टर ५२ आर इतके क्षेत्र असून, त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. सधन समजल्या जाणाºया निफाड तालुक्यात ही सातवी शेतकºयाची आत्महत्या आहे. राज्य शासनाने गेल्या वर्षी शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केल्यानंतर आत्महत्यांच्या घटनांना रोख लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु गेल्या वर्षाच्या शेतकºयांच्या आत्महत्येचे लोण यंदाही कायम असून, जानेवारी महिन्यापासून दरमहा कमीत कमी सहा ते सात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सर्वाधिक आत्महत्या मालेगाव तालुक्यात (९) झाल्या असून, त्याखालोखाल सिन्नर, दिंडोरी येथे प्रत्येकी ७ शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. पेठ, सुरगाणा व कळवण या आदिवासी तालुक्यांमध्ये मात्र एकाही शेतकºयाने आत्महत्या केलेली नाही, तर बागलाण (५), नाशिक, देवळा, त्र्यंबकेश्वर प्रत्येकी ३, चांदवड, येवला येथे २ व इगतपुरी, नांदगाव येथे प्रत्येकी एक शेतकºयाने आत्महत्या केली आहे.आत्महत्या करणाºया शेतकºयाच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत दिली जात असल्याने ३४ प्रकरणांवर जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत चर्चा होऊन त्यातील फक्त १३ शेतकरी कुटुंब आर्थिक मदतीसाठी पात्र ठरले असून, २१ प्रकरणांमध्ये शेतकरी आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे झाली नसल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे, तर १६ प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.