शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

फेरीगणिक वाढत गेला युतीचा जल्लोष निकाल : राष्ट्रवादीचा काढता पाय; मनसेना गायब

By admin | Updated: May 17, 2014 00:17 IST

नाशिक : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणार्‍या नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम ठेवली. प्रत्येक फेरीगणिक आघाडी मिळत गेल्यामुळे महायुतीचा जल्लोष वाढत गेला.

नाशिक : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणार्‍या नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम ठेवली. प्रत्येक फेरीगणिक आघाडी मिळत गेल्यामुळे महायुतीचा जल्लोष वाढत गेला. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीत अटीतटीची निवडणूक झाल्याने खरोखरीच अंदाज बांधणे कठीण झाले होते. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराला आव्हान दिले जाऊ शकते यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता; परंतु मतमोजणीत पहिल्या फेरीत हेमंत गोडसे यांनी ७ हजार १०९ मतांची आघाडी घेतली आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला. दुसर्‍या फेरीत आणखी सहा हजार मतांची आघाडी गोडसे यांनी घेतली. तथापि, गोडसे यांनी पन्नास हजारांचे मताधिक्य पार करेपर्यंत महायुतीच्या कार्यकर्त्यांना साशंकता होती. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनादेखील सुरुवातीला मिळालेले मताधिक्य अपेक्षित वाटत होते. सुरुवातीला ज्या मतदान केंद्रावरील मतांची मोजणी झाली ते भाजपाला अनुकूल असल्याचे सांगितले जात होते. भुजबळ यांच्या सोयीच्या मतदान केंद्रांची मोजणी सुरू झाली म्हणजे मताधिक्यावर ते मात करतील, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. परंतु तशी वेळ आली नाही. प्रत्येक फेरीगणिक गोडसे यांचे मताधिक्य वाढत गेले आणि कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला. मतमोजणीच्या ठिकाणी आणि केंद्राच्या बाहेरही प्रत्येक फेरीगणिक कार्यकर्त्यांचा जल्लोष वाढत गेला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शहराध्यक्ष अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, मनपातील विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांच्यासह अन्य पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.एकीकडे ही अवस्था असताना, दुसरीकडे मात्र कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अस्वस्थ होत होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास नाना महाले, शहराध्यक्ष शरद कोशिरे, दिलीप खैरे, समाधान जाधव, विनायक खैरे यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी विजयाची आशा सोडून दिली आणि मतदान केंद्र सोडले. सुनील बागुल आणि त्यांचे कायर्कर्ते विलंबाने बाहेर गेले. या सर्व धावपळीत मनसेचे आमदार वसंत गिते किंवा अन्य आमदार, पदाधिकारी कोणीही मतमोजणी केंद्राकडे फिरकले नाहीत. त्यामुळे ते निकाल अगोदरच जाणून होते की काय, अशी शंका व्यक्त केली जात होती. अन्य अनेक पक्षांचे पदाधिकारीदेखील मतदान केंद्रांकडे फिरकले नाहीत.