शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कुसुमाग्रजांच्या काव्यातून उलगडल्या स्त्री भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 00:22 IST

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या काव्यातील स्त्री पात्रांच्या भावभावनांचा आविष्कार काव्यातून उलगडत गेला आणि उपस्थित रसिकांना कुसुमाग्रजांच्या त्या कविता जणू नवा अनुभव देऊन गेल्या. संस्कार भारतीच्या साहित्य कट्टातर्फे ‘सहेली’ या कार्यक्रमाला रसिकांनी दाद दिली.

नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या काव्यातील स्त्री पात्रांच्या भावभावनांचा आविष्कार काव्यातून उलगडत गेला आणि उपस्थित रसिकांना कुसुमाग्रजांच्या त्या कविता जणू नवा अनुभव देऊन गेल्या. संस्कार भारतीच्या साहित्य कट्टातर्फे ‘सहेली’ या कार्यक्रमाला रसिकांनी दाद दिली.कविता जेव्हा एखाद्या सिद्धहस्त कवीच्या हातून उतरलेली असते, तेव्हा तिला अनेक कंगोरे असतात. प्रत्येकवेळी ते काव्य वाचताना नवीन अर्थ उलगडत जातो. हाच धागा पकडून विजय निपाणेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सहेली’ या कार्यक्रमात उपस्थित काव्यप्रेमींसमोर स्त्री प्रतिमा असलेल्या कुसुमाग्रजांच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले. त्यात रहस्य, रद्दी, भान, स्वस्त, पाणी, जोगीण, देणं, बंदीवान, वादळवेडी, अभिसारिका आणि थांब सहेली या कवितांचे वाचन करण्यात आले.प्रारंभी संस्कारभारतीचे ध्येय गीत सादर झाले. त्यानंतर अनघा धोडपकर, नीता देशकर, प्राची कुलकर्णी, गौरी कोरडे यांनी काव्य सादरीकरण केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि काव्यांना जोडणारे शब्दांकन सोनाली तेलंग यांनी केले. प्रास्ताविक मेघना बेडेकर यांनी, तर आभार प्रशांत कुलकर्णी यांनी मानले. स्नेहा बेहरे, स्नेहल येवलेकर, रवींद्र बेडेकर आणि स्वाती राजाध्यक्ष यांच्यासह संस्कार भारतीचे पदाधिकारी उपस्थित होते.कुसुमाग्रजांच्या काव्यातील स्त्री कधी प्रश्न उपस्थित करते, तर कधी स्वत:च त्या प्रश्नांवर तोडगा काढते. स्त्री जीवनातील वेगवेगळ्या नात्यांचे पदर उलगडून दाखवत जाणारे हे काव्यवाचन हा अनोखा अनुभव होता. व्यावहारिकतेत मातृत्वाचाही बळी देणारी स्त्री भानमधून, तर पाण्यासाठी जिवाला मुकणारी आणि मनाला चटका लावून जाणारी माता स्वस्तमधून उलगडते, असे विलक्षण अनुभव देणाऱ्या काव्यांना रसिकांनी दाद दिली.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक