शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

कुसुमाग्रजांच्या काव्यातून उलगडल्या स्त्री भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 00:22 IST

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या काव्यातील स्त्री पात्रांच्या भावभावनांचा आविष्कार काव्यातून उलगडत गेला आणि उपस्थित रसिकांना कुसुमाग्रजांच्या त्या कविता जणू नवा अनुभव देऊन गेल्या. संस्कार भारतीच्या साहित्य कट्टातर्फे ‘सहेली’ या कार्यक्रमाला रसिकांनी दाद दिली.

नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या काव्यातील स्त्री पात्रांच्या भावभावनांचा आविष्कार काव्यातून उलगडत गेला आणि उपस्थित रसिकांना कुसुमाग्रजांच्या त्या कविता जणू नवा अनुभव देऊन गेल्या. संस्कार भारतीच्या साहित्य कट्टातर्फे ‘सहेली’ या कार्यक्रमाला रसिकांनी दाद दिली.कविता जेव्हा एखाद्या सिद्धहस्त कवीच्या हातून उतरलेली असते, तेव्हा तिला अनेक कंगोरे असतात. प्रत्येकवेळी ते काव्य वाचताना नवीन अर्थ उलगडत जातो. हाच धागा पकडून विजय निपाणेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सहेली’ या कार्यक्रमात उपस्थित काव्यप्रेमींसमोर स्त्री प्रतिमा असलेल्या कुसुमाग्रजांच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले. त्यात रहस्य, रद्दी, भान, स्वस्त, पाणी, जोगीण, देणं, बंदीवान, वादळवेडी, अभिसारिका आणि थांब सहेली या कवितांचे वाचन करण्यात आले.प्रारंभी संस्कारभारतीचे ध्येय गीत सादर झाले. त्यानंतर अनघा धोडपकर, नीता देशकर, प्राची कुलकर्णी, गौरी कोरडे यांनी काव्य सादरीकरण केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि काव्यांना जोडणारे शब्दांकन सोनाली तेलंग यांनी केले. प्रास्ताविक मेघना बेडेकर यांनी, तर आभार प्रशांत कुलकर्णी यांनी मानले. स्नेहा बेहरे, स्नेहल येवलेकर, रवींद्र बेडेकर आणि स्वाती राजाध्यक्ष यांच्यासह संस्कार भारतीचे पदाधिकारी उपस्थित होते.कुसुमाग्रजांच्या काव्यातील स्त्री कधी प्रश्न उपस्थित करते, तर कधी स्वत:च त्या प्रश्नांवर तोडगा काढते. स्त्री जीवनातील वेगवेगळ्या नात्यांचे पदर उलगडून दाखवत जाणारे हे काव्यवाचन हा अनोखा अनुभव होता. व्यावहारिकतेत मातृत्वाचाही बळी देणारी स्त्री भानमधून, तर पाण्यासाठी जिवाला मुकणारी आणि मनाला चटका लावून जाणारी माता स्वस्तमधून उलगडते, असे विलक्षण अनुभव देणाऱ्या काव्यांना रसिकांनी दाद दिली.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक