शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

राजदेरवाडीला दुष्काळमुक्त होण्यासाठी मदत करणाºया जलरत्नाचा सत्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 16:28 IST

चांदवड - चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीने पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेत पहिला क्रमांक ,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा जिल्हयाचा दुसरा पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त अभियांनाचा विशेष पुरस्कार व स्मार्ट व्हिलेज असे अनेक पुरस्कार मिळविले ते फक्त गावाच्या व गावकºयांच्या एकीमुळेच मिळाले असून पाणी फांऊडेशनचे श्रमदानाचे काम सुरु असतांना भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथ्था या गावात पहाटे सहा वाजता आले तेव्हा या गावकºयांनी भल्या पहाटे उपस्थिती दाखवून हातात पाट्या, फावडे घेऊन त्यांच्याबरोबर श्रमदान केले

ठळक मुद्दे भल्या पहाटे उपस्थिती दाखवून हातात पाट्या, फावडे घेऊन त्यांच्याबरोबर श्रमदान केले

चांदवड - चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीने पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेत पहिला क्रमांक ,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा जिल्हयाचा दुसरा पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त अभियांनाचा विशेष पुरस्कार व स्मार्ट व्हिलेज असे अनेक पुरस्कार मिळविले ते फक्त गावाच्या व गावकºयांच्या एकीमुळेच मिळाले असून पाणी फांऊडेशनचे श्रमदानाचे काम सुरु असतांना भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथ्था या गावात पहाटे सहा वाजता आले तेव्हा या गावकºयांनी भल्या पहाटे उपस्थिती दाखवून हातात पाट्या, फावडे घेऊन त्यांच्याबरोबर श्रमदान केले त्यामुळे चांदवड तालुका दुष्काळी असतांनासुध्दा येथील पाझरतलावाला आजही दुष्काळात पाणी आहे ते गावाच्या एकजुटीची व कामाची फलश्रृती असल्याचे प्रतिपादन चांदवड -देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल अहेर यांनी व्यक्त केले. तर बºयाच गावामध्ये दोन तट गट असतात हे मात्र या गावात दिसून येत नाही पाणी फाऊंडेशनचे काम सुरु असतांना बºयाच गावामध्ये जाणाºयाचा योग आला मात्र तेथील नागरीक व तरुण गावातील पारावर बसून असत मात्र त्यांनी श्रमदान केले नाही त्या उलट या गावाने एकी करुन रात्री पहाटे श्रमदान केल्याने हे काम उभे राहु शकले असेही अहेर म्हणाले.राजदेरवाडी येथे विविध विकास कामाचे उदघाटन, भूमिपूजन व जलपूजन तसेच गाव दुष्काळमुक्त होण्यासाठी मदत करणाºया जलरत्नांचा सत्कार सोहळा आमदार डॉ राहुल अहेर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे, पाणी फाउंडेशनचे हेमंत पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश देवरे,उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, विलास ढोमसे, तालुकाध्यक्ष सुनील शेलार, सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, बाळासाहेब वाघ, सरपंच सखुबाई माळी, उपसरपंच मनोज शिंदे, भारतीय जैन संघटनेचे प्रमोद गोेळेचा, प्रशांत ठाकरे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र साळुंके, वनअधिकारी संजय पवार,नांदुरटेकचे सरपंच प्रभाकर ठाकरे , सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता मोरे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा. मनोहर यशवंते यांनी केले.आभार ग्रामसेवक बी.पी. सोनवणे यांनी मानले.स्वागत नंदराज जाधव, दीपक जाधव, सखुबाई माळी, जगन यशवंते, बापु अहेर, तानाजी शिंदे यांनी केले.तर अनेक जलरत्नांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविकांत उपसरपंच मनोज शिंदे यांनी सांगीतले की,धरणाची खोली व माती बांध व इतर कामे केल्याने दुष्काळमुक्त राजदेरवाडी हे होऊ शकले तर आमदार डॉ.अहेर यांनी बरीच विकास कामे या गावाला दिल्याने आम्ही प्रत्येक पुरस्कार जिंकू शकलो . तर राजदेरवाडी किल्ला व परिसरात पर्यटनासाठी शासनाने मदत दिल्यास या आदिवासी गावाचा विकास होऊ शकतो असे शिंदे यांनी सांगीतले . तर आमदार डॉ. राहुल अहेर यांनी राजदेरवाडी किल्ला, कोळधर, इंद्रायणी किल्ला पर्यटन विकासासाठी १७ कोटीचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला असून येथील नवयुवकांना याचा नक्कीच लाभ होईल असे ते म्हणाले तर पुर्वीच्या काळी फक्त दुधदुभते व खव्यासाठी प्रसिध्द असलेले राजदेरवाडी हे गाव आता कुठे या पाझरतलावामुळे शेती व उद्योगात प्रगती गाठत आहे. जलयुक्तची कामे झाल्यास राजदेरवाडी सारखे इतर गावांनी त्याचा आदर्श घ्यावा यासाठी लवकरच तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांची या गावाची पाहणी व मेळावा घ्यावा अशी सुचना त्यांनी केली यावेळी नंदराज जाधव, हेमंत पाटील, भुषण कासलीवाल,प्रांत सिध्दार्थ भंडारे, डॉ. नितीन गांगुर्डे यांची भाषणे झालीत.कार्यक्रमास विजय धाकराव, वर्धमान पांडे, ज्ञानेश्वर सपकाळे,योगेश ढोमसे, नंदु जोंधळे, साईनाथ कोल्हे, जगदीश कोल्हे, शरद पाटील, अण्णासाहेब शिंदे, नाना जाधव, सुरेश जाधव, भीका जाधव, जगन जाधव, विक्रम जाधव, बाळु जाधव, निवृत्ती जाधव आदिसह राजदेरवाडीचे ग्रामस्थ , अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.