शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

राजदेरवाडीला दुष्काळमुक्त होण्यासाठी मदत करणाºया जलरत्नाचा सत्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 16:28 IST

चांदवड - चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीने पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेत पहिला क्रमांक ,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा जिल्हयाचा दुसरा पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त अभियांनाचा विशेष पुरस्कार व स्मार्ट व्हिलेज असे अनेक पुरस्कार मिळविले ते फक्त गावाच्या व गावकºयांच्या एकीमुळेच मिळाले असून पाणी फांऊडेशनचे श्रमदानाचे काम सुरु असतांना भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथ्था या गावात पहाटे सहा वाजता आले तेव्हा या गावकºयांनी भल्या पहाटे उपस्थिती दाखवून हातात पाट्या, फावडे घेऊन त्यांच्याबरोबर श्रमदान केले

ठळक मुद्दे भल्या पहाटे उपस्थिती दाखवून हातात पाट्या, फावडे घेऊन त्यांच्याबरोबर श्रमदान केले

चांदवड - चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीने पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेत पहिला क्रमांक ,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा जिल्हयाचा दुसरा पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त अभियांनाचा विशेष पुरस्कार व स्मार्ट व्हिलेज असे अनेक पुरस्कार मिळविले ते फक्त गावाच्या व गावकºयांच्या एकीमुळेच मिळाले असून पाणी फांऊडेशनचे श्रमदानाचे काम सुरु असतांना भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथ्था या गावात पहाटे सहा वाजता आले तेव्हा या गावकºयांनी भल्या पहाटे उपस्थिती दाखवून हातात पाट्या, फावडे घेऊन त्यांच्याबरोबर श्रमदान केले त्यामुळे चांदवड तालुका दुष्काळी असतांनासुध्दा येथील पाझरतलावाला आजही दुष्काळात पाणी आहे ते गावाच्या एकजुटीची व कामाची फलश्रृती असल्याचे प्रतिपादन चांदवड -देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल अहेर यांनी व्यक्त केले. तर बºयाच गावामध्ये दोन तट गट असतात हे मात्र या गावात दिसून येत नाही पाणी फाऊंडेशनचे काम सुरु असतांना बºयाच गावामध्ये जाणाºयाचा योग आला मात्र तेथील नागरीक व तरुण गावातील पारावर बसून असत मात्र त्यांनी श्रमदान केले नाही त्या उलट या गावाने एकी करुन रात्री पहाटे श्रमदान केल्याने हे काम उभे राहु शकले असेही अहेर म्हणाले.राजदेरवाडी येथे विविध विकास कामाचे उदघाटन, भूमिपूजन व जलपूजन तसेच गाव दुष्काळमुक्त होण्यासाठी मदत करणाºया जलरत्नांचा सत्कार सोहळा आमदार डॉ राहुल अहेर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे, पाणी फाउंडेशनचे हेमंत पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश देवरे,उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, विलास ढोमसे, तालुकाध्यक्ष सुनील शेलार, सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, बाळासाहेब वाघ, सरपंच सखुबाई माळी, उपसरपंच मनोज शिंदे, भारतीय जैन संघटनेचे प्रमोद गोेळेचा, प्रशांत ठाकरे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र साळुंके, वनअधिकारी संजय पवार,नांदुरटेकचे सरपंच प्रभाकर ठाकरे , सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता मोरे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा. मनोहर यशवंते यांनी केले.आभार ग्रामसेवक बी.पी. सोनवणे यांनी मानले.स्वागत नंदराज जाधव, दीपक जाधव, सखुबाई माळी, जगन यशवंते, बापु अहेर, तानाजी शिंदे यांनी केले.तर अनेक जलरत्नांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविकांत उपसरपंच मनोज शिंदे यांनी सांगीतले की,धरणाची खोली व माती बांध व इतर कामे केल्याने दुष्काळमुक्त राजदेरवाडी हे होऊ शकले तर आमदार डॉ.अहेर यांनी बरीच विकास कामे या गावाला दिल्याने आम्ही प्रत्येक पुरस्कार जिंकू शकलो . तर राजदेरवाडी किल्ला व परिसरात पर्यटनासाठी शासनाने मदत दिल्यास या आदिवासी गावाचा विकास होऊ शकतो असे शिंदे यांनी सांगीतले . तर आमदार डॉ. राहुल अहेर यांनी राजदेरवाडी किल्ला, कोळधर, इंद्रायणी किल्ला पर्यटन विकासासाठी १७ कोटीचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला असून येथील नवयुवकांना याचा नक्कीच लाभ होईल असे ते म्हणाले तर पुर्वीच्या काळी फक्त दुधदुभते व खव्यासाठी प्रसिध्द असलेले राजदेरवाडी हे गाव आता कुठे या पाझरतलावामुळे शेती व उद्योगात प्रगती गाठत आहे. जलयुक्तची कामे झाल्यास राजदेरवाडी सारखे इतर गावांनी त्याचा आदर्श घ्यावा यासाठी लवकरच तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांची या गावाची पाहणी व मेळावा घ्यावा अशी सुचना त्यांनी केली यावेळी नंदराज जाधव, हेमंत पाटील, भुषण कासलीवाल,प्रांत सिध्दार्थ भंडारे, डॉ. नितीन गांगुर्डे यांची भाषणे झालीत.कार्यक्रमास विजय धाकराव, वर्धमान पांडे, ज्ञानेश्वर सपकाळे,योगेश ढोमसे, नंदु जोंधळे, साईनाथ कोल्हे, जगदीश कोल्हे, शरद पाटील, अण्णासाहेब शिंदे, नाना जाधव, सुरेश जाधव, भीका जाधव, जगन जाधव, विक्रम जाधव, बाळु जाधव, निवृत्ती जाधव आदिसह राजदेरवाडीचे ग्रामस्थ , अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.