शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

फेब्रुवारीतही धरणांमध्ये ८४ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 20:34 IST

दोन वर्षांपूर्वी जेमतेम पावसाने हजेरी लावल्याने दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या जिल्हावासीयांवर गेल्या पावसाळ्यात वरुण राजाने कृपादृष्टी केली. काहीसे उशिराने का होईना परंतु दमदार कोसळेल्या पावसाने आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा दीडशे

ठळक मुद्देटंचाईचे मळभ दूर : पाणीपुरवठा योजनांना जीवदान जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये ५५,३९५ दशलक्ष घनफूट इतका जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : एरव्ही डिसेंबर महिन्यापासून पाणीटंचाईची ओरड होऊन ग्रामीण भागात टॅँकरची मागणी केली जात असताना यंदा मात्र फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये ८४ टक्के जलसाठा असल्यामुळे टंचाईचे संकट लांबले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सध्याचा जलसाठा दुपटीने असून, त्यामुळे ग्रामीण भागात उन्हाळ्यातही फारशी टंचाई भासण्याची शक्यता दिसत नाही.

दोन वर्षांपूर्वी जेमतेम पावसाने हजेरी लावल्याने दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या जिल्हावासीयांवर गेल्या पावसाळ्यात वरुण राजाने कृपादृष्टी केली. काहीसे उशिराने का होईना परंतु दमदार कोसळेल्या पावसाने आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा दीडशे टक्क्याने अधिक बरसला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरडीठाक पडलेली धरणे ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले. परिणामी नद्या, नाल्यांना महापूर आला. आॅक्टोबर महिन्यात एकाच वेळी जिल्ह्यातील तेरा धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आल्याने नगर, मराठवाडा, जळगाव जिल्ह्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली तर नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरल्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न सुटला. दरवर्षी डिसेंबर महिन्यापासूनच जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण होऊन ग्रामस्थांकडून पाण्याची मागणी केली जात, त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागत असे. यंदा मात्र फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये ५५,३९५ दशलक्ष घनफूट इतका म्हणजे ८४ टक्के जलसाठा शिल्लक असून, त्याचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अवघा ४२ टक्के जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे मार्च ते जून महिन्यांपर्यंत पिण्याचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन जनतेला केले गेले होते. यंदा मात्र परिस्थिती बदलली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेले पाणी व शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी अजूनही तुडुंब असल्यामुळे यंदा टॅँकरची संख्या कमी होईल, असा अंदाज पाटबंधारे खात्याच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात ८२ टक्के पाणी असून, एकट्या गंगापूर धरणामध्ये ७७ टक्के जलसाठा आहे. तर दारणा धरणात ८६ टक्के जलसाठा असून, पालखेडमध्येच कमी म्हणजे ४१ टक्के पाणी आहे. ओझरखेड धरणात ८५ टक्के तर चणकापूरमध्ये ९८, हरणबारीत ८३ व गिरणा धरणात ८४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. धरणातील पाण्यामुळे या पाण्यांवर कार्यरत असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांद्वारे ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक