शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

फेब्रुवारीतही धरणांमध्ये ८४ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 20:34 IST

दोन वर्षांपूर्वी जेमतेम पावसाने हजेरी लावल्याने दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या जिल्हावासीयांवर गेल्या पावसाळ्यात वरुण राजाने कृपादृष्टी केली. काहीसे उशिराने का होईना परंतु दमदार कोसळेल्या पावसाने आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा दीडशे

ठळक मुद्देटंचाईचे मळभ दूर : पाणीपुरवठा योजनांना जीवदान जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये ५५,३९५ दशलक्ष घनफूट इतका जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : एरव्ही डिसेंबर महिन्यापासून पाणीटंचाईची ओरड होऊन ग्रामीण भागात टॅँकरची मागणी केली जात असताना यंदा मात्र फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये ८४ टक्के जलसाठा असल्यामुळे टंचाईचे संकट लांबले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सध्याचा जलसाठा दुपटीने असून, त्यामुळे ग्रामीण भागात उन्हाळ्यातही फारशी टंचाई भासण्याची शक्यता दिसत नाही.

दोन वर्षांपूर्वी जेमतेम पावसाने हजेरी लावल्याने दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या जिल्हावासीयांवर गेल्या पावसाळ्यात वरुण राजाने कृपादृष्टी केली. काहीसे उशिराने का होईना परंतु दमदार कोसळेल्या पावसाने आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा दीडशे टक्क्याने अधिक बरसला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरडीठाक पडलेली धरणे ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले. परिणामी नद्या, नाल्यांना महापूर आला. आॅक्टोबर महिन्यात एकाच वेळी जिल्ह्यातील तेरा धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आल्याने नगर, मराठवाडा, जळगाव जिल्ह्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली तर नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरल्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न सुटला. दरवर्षी डिसेंबर महिन्यापासूनच जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण होऊन ग्रामस्थांकडून पाण्याची मागणी केली जात, त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागत असे. यंदा मात्र फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये ५५,३९५ दशलक्ष घनफूट इतका म्हणजे ८४ टक्के जलसाठा शिल्लक असून, त्याचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अवघा ४२ टक्के जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे मार्च ते जून महिन्यांपर्यंत पिण्याचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन जनतेला केले गेले होते. यंदा मात्र परिस्थिती बदलली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेले पाणी व शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी अजूनही तुडुंब असल्यामुळे यंदा टॅँकरची संख्या कमी होईल, असा अंदाज पाटबंधारे खात्याच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात ८२ टक्के पाणी असून, एकट्या गंगापूर धरणामध्ये ७७ टक्के जलसाठा आहे. तर दारणा धरणात ८६ टक्के जलसाठा असून, पालखेडमध्येच कमी म्हणजे ४१ टक्के पाणी आहे. ओझरखेड धरणात ८५ टक्के तर चणकापूरमध्ये ९८, हरणबारीत ८३ व गिरणा धरणात ८४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. धरणातील पाण्यामुळे या पाण्यांवर कार्यरत असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांद्वारे ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक