शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

‘निपाह’ची भीती; जिल्हा रुग्णालय यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:24 IST

केरळ येथे निपाह विषाणू आजाराचा उद्रेक झाला असून, आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे़ सद्यस्थितीत या आजाराचा महाराष्ट्राला धोका नसला तरी खबरदारी घेणे गरजेचे असून, निपाहसदृश आजाराचे सर्वेक्षण तसेच प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा रुग्णालय सज्ज आहे़

नाशिक : केरळ येथे निपाह विषाणू आजाराचा उद्रेक झाला असून, आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे़ सद्यस्थितीत या आजाराचा महाराष्ट्राला धोका नसला तरी खबरदारी घेणे गरजेचे असून, निपाहसदृश आजाराचे सर्वेक्षण तसेच प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा रुग्णालय सज्ज आहे़  आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा रुग्णालयातील बंद असलेल्या स्वाइन फ्लू कक्षात संशयित रुग्णांवर उपचार करता यावे यासाठी सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉग़जानन होले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ त्यामुळे काळजीचे कारण नाही.निपाह विषाणूचा प्रसारया विषाणूचा प्रसार हा मुख्यत्त्वे फळांवर जगणाऱ्या वटवाघळांच्या (फ्रूट बेट्स) मार्फत होतो़ वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्ल्याने हा आजार होतो़ डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांनादेखील याची बाधा होऊ शकते़ १९९८ च्या मलेशियातील उद्रेकात वराह पालन करणारे शेतकरी मुख्यत्त्वे बाधित झाले होते़ निपाह विषाणूची लागण माणसापासून माणसास होऊ शकते़ रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांना लागण होऊ शकते़ वटवाघळाच्या स्त्रावामुळे दूषित झालेला खजुराच्या झाडाचा रस पिल्यानेदेखील या विषाणूचा प्रसार होतो़ याचा कालावधी हा ५ ते १४ दिवस इतका असतो़संशयित  निपाह रुग्णताप, डोके दुखी, झोपाळलेपण, मानसिक गोंधळ उडणे, शुद्ध हरपणे अशी लक्षणे असणारा कोणताही रुग्ण आणि रुग्ण जपानी मेंदूज्वर अथवा इतर मेंदूज्वराकरिता निगेटिव्ह असणे आणि मागील  तीन आठवड्यात केरळमधील कोझिकोडे परिसरात, ईशान्य भारतात अथवा बांगलादेश सीमेलगतच्या भागातप्रवासाचा इतिहास आहे़  अशा वर्णनाचा कोणत्याही रुग्णास निपाह विषाणू रुग्ण म्हणून गृहीत धरून त्यास विलगीकरण कक्षात भरती करावे तसेच त्याचा  नमुना एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत़

टॅग्स :hospitalहॉस्पिटल