शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धुक्याने वाढवली धाकधूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:20 IST

बदलते हवामान आणि धुक्याचा द्राक्ष फुगवणीवर परिणाम झाला असून, परिसरातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. अवकाळी व परतीच्या पावसातून वाचवलेला हातातोंडाशी आलेला घास हिरावला तर जाणार नाही ना, या प्रश्नाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. पिके वाचविण्यासाठी फवारणी व कीटकनाशकांचा खर्चही वाढल्याने शेतकऱ्यांपुढील आर्थिक संकट गडद झाले आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात

पिंपळगाव बसवंत : बदलते हवामान आणि धुक्याचा द्राक्ष फुगवणीवर परिणाम झाला असून, परिसरातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. अवकाळी व परतीच्या पावसातून वाचवलेला हातातोंडाशी आलेला घास हिरावला तर जाणार नाही ना, या प्रश्नाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. पिके वाचविण्यासाठी फवारणी व कीटकनाशकांचा खर्चही वाढल्याने शेतकऱ्यांपुढील आर्थिक संकट गडद झाले आहे.पावसामुळे अर्धी पिके नष्ट झाली. त्यात बदलते हवामान व दवबिंदूचे दुसरे संकट ओढवले आहे. धुक्यामुळे द्राक्षासह कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने दररोज फवारणी करावी लागत आहे. खर्च वाढत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आॅक्टोबरअखेरपर्यंत मुक्काम ठोकलेल्या पावसाने खरीप हंगामावर अवकृपा केली. या पावसाने हातातोंडाशी आलेली सोयाबीन, टोमॅटो, मका, कांदा आदी पिके सडून गेली. ज्वारी, बाजरी, भात पिकाला कोंब फुटले. या दु:खातून सावरत शेतकºयांनी रब्बी पिके घेतली.मात्र ढगाळ हवामान व धुक्यामुळे तयार द्राक्षमण्यांना तडे जात आहेत. अवकाळीच्या संकटातून शेतकरी सावरत नाही तोच धुक्यामुळे धाकधूक आणखी वाढली आहे. या धुक्यामुळे द्राक्षांवर बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यापासून संरक्षण करण्यासाठी दिवसातून दोन-दोन वेळा बुरशीनाशकांची फवारणी करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. एका फवारणीसाठी एकरी दीड ते दोन हजार रु पयांचा खर्च येतो. त्यामुळे उत्पादन कमी, त्यात खर्चात वाढल्याने शेतकºयाचे कंबरडे मोडले आहे.डाळिंबाला तेल्याचा धोकाद्राक्षासोबत ४० हजार एकरवरील डाळिंबाच्या बागांना ढगाळ हवामानाचा फटका बसत आहे. सध्याचे वातावरण तेल्या रोगासाठी पोषक असल्याने शेतकºयांचा फवारणीचा खर्च वाढला आहे. आधीच गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकºयांना शासकीय मदत मिळालेली नसताना त्यांच्यावर अतिरिक्त फवारणीचा भार पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील डाळिंबाचे उत्पादनही ५० टक्क्यांनी घटणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. धुक्यामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे लाल कांद्याच्याही उत्पादनावर ३० टक्क्यांच्या आसपास परिणाम होणार असल्याचा अंदाज कांदा संशोधन विभागाने व्यक्त केला आहे. सोबतच रब्बीचा गहू, हरबरा आणि मका या पिकांवरही किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे रब्बीची पिकेही धोक्यात आली आहेत. तयार झालेल्या द्राक्षांच्या मण्यांना तडे गेले तर ते द्राक्ष मण्यांच्या दरातसुद्धा जात नाही. यामुळे द्राक्षशेती जोखमीची झाली असल्याची प्रतिक्रिया शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

धुक्यामुळे लाल कांद्याच्या पातीवर करपा येत आहे. त्यावरही फवारणी करण्याची वेळ आली आहे. टमाट्याची पानेही करपून गेली असून, त्यावरही औषधांचा खर्च वाढला आहे. गव्हावरही तांबेरा रोगाची शक्यता बळावली आहे. कोथिंबिर, शेपू वगैरे भाज्यांनाही हे धुके त्रासदायक आहे. पावसामुळे आधीच शेतकºयाचे कंबरडे मोडले आहे. आता धुक्यामुळे द्राक्षशेतीवर बुरशीजन्य आजारांची शक्यता बळावली असून, दररोज फवारणी करून त्याला आटोक्यात आणणे गरजेचे आहे.- राकेश सोनवणे, कर्मचारी, द्राक्ष कांदा संशोधन केंद्र

पावसाबरोबरच धुके दहीवर यांचाही पीकविम्यात समावेश करावा. बदलत्या हवामानामुळे बागांचे नुकसान होते. त्यामुळे पीकविम्याचा विचार करताना पावसाचाही विचार करायला हवा.- सुनील गवळी, शेती सल्लागार

अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे द्राक्ष, डाळिंबासह रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. आता बदललेल्या हवामानाचाही फटका पिकांना बसतो आहे. औषध फवारणीचा खर्च वाढला आहे.- अक्षय विधाते, द्राक्ष उत्पादक

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती