शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
2
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
3
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
4
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान
5
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
6
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
7
Ashwin Amavasya 2025:अमावस्या तिथीला अमावस्याच का म्हणतात? वाचा ही रहस्य उलगडणारी कथा
8
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
9
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
10
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
11
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
12
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
13
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)
14
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
15
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!
16
हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
17
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
18
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
19
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
20
Ashwin Amavasya 2025: दिवाळीच्या आनंदात ठेवा पितरांचे स्मरण; त्यांचे नावे पणती लावून करा दीप प्रज्वलन!

धुक्याने वाढवली धाकधूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:20 IST

बदलते हवामान आणि धुक्याचा द्राक्ष फुगवणीवर परिणाम झाला असून, परिसरातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. अवकाळी व परतीच्या पावसातून वाचवलेला हातातोंडाशी आलेला घास हिरावला तर जाणार नाही ना, या प्रश्नाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. पिके वाचविण्यासाठी फवारणी व कीटकनाशकांचा खर्चही वाढल्याने शेतकऱ्यांपुढील आर्थिक संकट गडद झाले आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात

पिंपळगाव बसवंत : बदलते हवामान आणि धुक्याचा द्राक्ष फुगवणीवर परिणाम झाला असून, परिसरातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. अवकाळी व परतीच्या पावसातून वाचवलेला हातातोंडाशी आलेला घास हिरावला तर जाणार नाही ना, या प्रश्नाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. पिके वाचविण्यासाठी फवारणी व कीटकनाशकांचा खर्चही वाढल्याने शेतकऱ्यांपुढील आर्थिक संकट गडद झाले आहे.पावसामुळे अर्धी पिके नष्ट झाली. त्यात बदलते हवामान व दवबिंदूचे दुसरे संकट ओढवले आहे. धुक्यामुळे द्राक्षासह कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने दररोज फवारणी करावी लागत आहे. खर्च वाढत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आॅक्टोबरअखेरपर्यंत मुक्काम ठोकलेल्या पावसाने खरीप हंगामावर अवकृपा केली. या पावसाने हातातोंडाशी आलेली सोयाबीन, टोमॅटो, मका, कांदा आदी पिके सडून गेली. ज्वारी, बाजरी, भात पिकाला कोंब फुटले. या दु:खातून सावरत शेतकºयांनी रब्बी पिके घेतली.मात्र ढगाळ हवामान व धुक्यामुळे तयार द्राक्षमण्यांना तडे जात आहेत. अवकाळीच्या संकटातून शेतकरी सावरत नाही तोच धुक्यामुळे धाकधूक आणखी वाढली आहे. या धुक्यामुळे द्राक्षांवर बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यापासून संरक्षण करण्यासाठी दिवसातून दोन-दोन वेळा बुरशीनाशकांची फवारणी करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. एका फवारणीसाठी एकरी दीड ते दोन हजार रु पयांचा खर्च येतो. त्यामुळे उत्पादन कमी, त्यात खर्चात वाढल्याने शेतकºयाचे कंबरडे मोडले आहे.डाळिंबाला तेल्याचा धोकाद्राक्षासोबत ४० हजार एकरवरील डाळिंबाच्या बागांना ढगाळ हवामानाचा फटका बसत आहे. सध्याचे वातावरण तेल्या रोगासाठी पोषक असल्याने शेतकºयांचा फवारणीचा खर्च वाढला आहे. आधीच गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकºयांना शासकीय मदत मिळालेली नसताना त्यांच्यावर अतिरिक्त फवारणीचा भार पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील डाळिंबाचे उत्पादनही ५० टक्क्यांनी घटणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. धुक्यामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे लाल कांद्याच्याही उत्पादनावर ३० टक्क्यांच्या आसपास परिणाम होणार असल्याचा अंदाज कांदा संशोधन विभागाने व्यक्त केला आहे. सोबतच रब्बीचा गहू, हरबरा आणि मका या पिकांवरही किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे रब्बीची पिकेही धोक्यात आली आहेत. तयार झालेल्या द्राक्षांच्या मण्यांना तडे गेले तर ते द्राक्ष मण्यांच्या दरातसुद्धा जात नाही. यामुळे द्राक्षशेती जोखमीची झाली असल्याची प्रतिक्रिया शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

धुक्यामुळे लाल कांद्याच्या पातीवर करपा येत आहे. त्यावरही फवारणी करण्याची वेळ आली आहे. टमाट्याची पानेही करपून गेली असून, त्यावरही औषधांचा खर्च वाढला आहे. गव्हावरही तांबेरा रोगाची शक्यता बळावली आहे. कोथिंबिर, शेपू वगैरे भाज्यांनाही हे धुके त्रासदायक आहे. पावसामुळे आधीच शेतकºयाचे कंबरडे मोडले आहे. आता धुक्यामुळे द्राक्षशेतीवर बुरशीजन्य आजारांची शक्यता बळावली असून, दररोज फवारणी करून त्याला आटोक्यात आणणे गरजेचे आहे.- राकेश सोनवणे, कर्मचारी, द्राक्ष कांदा संशोधन केंद्र

पावसाबरोबरच धुके दहीवर यांचाही पीकविम्यात समावेश करावा. बदलत्या हवामानामुळे बागांचे नुकसान होते. त्यामुळे पीकविम्याचा विचार करताना पावसाचाही विचार करायला हवा.- सुनील गवळी, शेती सल्लागार

अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे द्राक्ष, डाळिंबासह रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. आता बदललेल्या हवामानाचाही फटका पिकांना बसतो आहे. औषध फवारणीचा खर्च वाढला आहे.- अक्षय विधाते, द्राक्ष उत्पादक

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती