शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

यंदा खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 00:25 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सर्वच शेतकरीवर्ग खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. पण कोरोनामुळे सर्व ठिकाणी शेतकामांच्या बाबतीत कामांची गती मंदावली असल्याने यंदा खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठळक मुद्देकोरोनाने कामांची गती मंदावली; शेतकऱ्यांत चिंता

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सर्वच शेतकरीवर्ग खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. पण कोरोनामुळे सर्व ठिकाणी शेतकामांच्या बाबतीत कामांची गती मंदावली असल्याने यंदा खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कोरोनामुळे शेतीव्यवसाय अडचणीत आल्यामुळे या हंगामातही बळीराजावर काळजीचे ढग आहेत. दोन हंगामापासून शेती कशी करावी या विवंचनेत शेतकरीवर्ग सापडला आहे. कारण कोरोनामुळे सर्वच ठिकाणी लॉकडाऊनची स्थिती, वाहतुकीचा अडथळा, बाजार समिती बंद, स्थानिक परिसरातील आठवडे बाजार बंद अशा अनेक संकटांमुळे आपल्या शेतातील मोठ्या कष्टाने व असंख्य स्वरूपाचे भांडवल खर्च करून पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे उत्पन्न कमी व उत्पादन खर्च जास्त हे समीकरण निर्माण झाल्याने आता येणारा खरीप हंगाम कसा घ्यावा याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

प्रत्येक हंगामात पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. जवळचे भांडवल संपल्यामुळे, शेतीसाठी घेतलेले कर्ज अजून फिटले नसताना आता खरीप हंगामासाठी भांडवल कसे उभे करायचे या आर्थिक संकटात सध्या दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्ग सापडला आहे.मागील हंगामापासून अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल, अस्मानी - सुलतानी संकटे यामुळे शेतकरीवर्ग बेजार असताना त्यात भर पडली ती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना रब्बी हंगामाचा शेवट कसा तरी केला; पण आता रुग्णसंख्येच्या वाढीमुळे खरीप हंगामाच्या कामासाठी सध्या मजूर टंचाई मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्याने खरीप हंगामातील कामांची गती मंदावली असल्याचे चित्र तालुक्यातील सर्वच भागात पहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील उत्पादनांवर यांचा विपरीत परिणाम तर होणार नाही ना याची भीती शेतकरीवर्गाला वाटू लागली आहे.खतांच्या वाढत्या किमतीचा फटकासध्या सर्वत्र खरीप हंगामाची सुरुवात होत असताना रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे. अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरीवर्गाला खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शासनाने जोरदार झटका दिल्याने आता खरीप हंगाम कसा घ्यावा या विवंचनेत तालुक्यातील बळीराजा सापडला आहे.मागील खरीप हंगामात सोयाबीन पिकाने विक्रमी पातळी गाठली. साधारणपणे मागील वर्षी सोयाबीन सर्वसाधारण क्षेत्र होते ४५७१.०० व एकूण पेरणी क्षेत्र झाले ६६२३.८५ तर पेरणीची टक्केवारी होती १४४.९१ टक्के. तसेच बाकीच्या पिकांची आकडेवारी याप्रमाणे आहे.पीक हेक्टरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारीतृणधान्य १०२८५.६० ९६४१.५५ ९३-७४कडधान्य ४३७५.८० २१९९.७५, ६१-८९अन्नधान्य १४६६१.८० ११८४१.३० ८०-७७गळीतधान्य ८०४५-०० १०६३०-६३ १३२.१४एकूण खरीप क्षेत्र २२७०६.४० २२४७१.९३ ९८.९७या तुलनेत यंदाची उत्पादन पीक टक्केवारी कोरोनामुळे पार होते की नाही यांची भीती शेतकरीवर्गाला वाटू लागली आहे.

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार