शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

यंदा खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 00:25 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सर्वच शेतकरीवर्ग खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. पण कोरोनामुळे सर्व ठिकाणी शेतकामांच्या बाबतीत कामांची गती मंदावली असल्याने यंदा खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठळक मुद्देकोरोनाने कामांची गती मंदावली; शेतकऱ्यांत चिंता

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सर्वच शेतकरीवर्ग खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. पण कोरोनामुळे सर्व ठिकाणी शेतकामांच्या बाबतीत कामांची गती मंदावली असल्याने यंदा खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कोरोनामुळे शेतीव्यवसाय अडचणीत आल्यामुळे या हंगामातही बळीराजावर काळजीचे ढग आहेत. दोन हंगामापासून शेती कशी करावी या विवंचनेत शेतकरीवर्ग सापडला आहे. कारण कोरोनामुळे सर्वच ठिकाणी लॉकडाऊनची स्थिती, वाहतुकीचा अडथळा, बाजार समिती बंद, स्थानिक परिसरातील आठवडे बाजार बंद अशा अनेक संकटांमुळे आपल्या शेतातील मोठ्या कष्टाने व असंख्य स्वरूपाचे भांडवल खर्च करून पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे उत्पन्न कमी व उत्पादन खर्च जास्त हे समीकरण निर्माण झाल्याने आता येणारा खरीप हंगाम कसा घ्यावा याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

प्रत्येक हंगामात पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. जवळचे भांडवल संपल्यामुळे, शेतीसाठी घेतलेले कर्ज अजून फिटले नसताना आता खरीप हंगामासाठी भांडवल कसे उभे करायचे या आर्थिक संकटात सध्या दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्ग सापडला आहे.मागील हंगामापासून अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल, अस्मानी - सुलतानी संकटे यामुळे शेतकरीवर्ग बेजार असताना त्यात भर पडली ती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना रब्बी हंगामाचा शेवट कसा तरी केला; पण आता रुग्णसंख्येच्या वाढीमुळे खरीप हंगामाच्या कामासाठी सध्या मजूर टंचाई मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्याने खरीप हंगामातील कामांची गती मंदावली असल्याचे चित्र तालुक्यातील सर्वच भागात पहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील उत्पादनांवर यांचा विपरीत परिणाम तर होणार नाही ना याची भीती शेतकरीवर्गाला वाटू लागली आहे.खतांच्या वाढत्या किमतीचा फटकासध्या सर्वत्र खरीप हंगामाची सुरुवात होत असताना रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे. अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरीवर्गाला खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शासनाने जोरदार झटका दिल्याने आता खरीप हंगाम कसा घ्यावा या विवंचनेत तालुक्यातील बळीराजा सापडला आहे.मागील खरीप हंगामात सोयाबीन पिकाने विक्रमी पातळी गाठली. साधारणपणे मागील वर्षी सोयाबीन सर्वसाधारण क्षेत्र होते ४५७१.०० व एकूण पेरणी क्षेत्र झाले ६६२३.८५ तर पेरणीची टक्केवारी होती १४४.९१ टक्के. तसेच बाकीच्या पिकांची आकडेवारी याप्रमाणे आहे.पीक हेक्टरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारीतृणधान्य १०२८५.६० ९६४१.५५ ९३-७४कडधान्य ४३७५.८० २१९९.७५, ६१-८९अन्नधान्य १४६६१.८० ११८४१.३० ८०-७७गळीतधान्य ८०४५-०० १०६३०-६३ १३२.१४एकूण खरीप क्षेत्र २२७०६.४० २२४७१.९३ ९८.९७या तुलनेत यंदाची उत्पादन पीक टक्केवारी कोरोनामुळे पार होते की नाही यांची भीती शेतकरीवर्गाला वाटू लागली आहे.

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार