शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुक्यात धुक्यामुळे द्राक्षांना तडे जाण्याची भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 19:05 IST

पांडाणे : दिंडोरी तालुक्यात प्रामुख्यांने नगदी पिक म्हणून घेतल्या जाणाऱ्या द्राक्षांना धुक्यामुळे तडे जाण्याची भीती व्यक्त होत असून रब्बी पिकांनाही ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस व दवबिंदूंमुळे मावा व करपा आदी रोगांनी विळखा घातल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देनिराशा : रब्बीच्याही नुकसानीची शक्यता

तालुक्यात चार-पाच दिवसांपासून ढगाळ हवामान असल्यामुळे त्याचा पिकांना फटका बसत आहे. अवकाळी पाऊस , त्यानंतर काश्मिरसारखे गडद धुके यामुळे द्राक्ष उत्पादक निराशेच्या गर्तेत सापडला आहे. पावसामुळे घडकुज , मिलीबग, डावणी , भुरी यासारखे रोगांचा प्रार्दूभाव होण्याची भिती शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. तसेच रब्बीचा हंगाम सुरु झाल्यानंतर पाऊस चांगला होता , वातावरणही चांगले असताना मागील रविवारपासून ते गुरुवारपर्यत तीन दिवस पाऊस, दोन दिवस ढगाळ वातावरण आणि आता गडद धुके पसरत असल्याने शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसेल असे जाणकार शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.चार दिवसांपासून तपमानाचा पारा घसरत चालल्याने द्राक्ष उत्पादक कमालीचे धास्तावले आहेत. जास्त थंडीमुळे निर्यातक्षम द्राक्षाची फुगवण मिळणे अवघड होते तसेच अती थंडीमुळे औषध फवारणीचा खर्च देखील दुप्पट होतो. यासोबतच धुके आणि ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गहू, मका आणि भाजीपाला या पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळी संपूर्ण दिंडोरी तालुका धुक्यात हरवल्याचे चित्र दिसून आले. या धुक्यामुळे आणि थंडीमुळे पाणी उतरलेल्या द्राक्षांच्या मण्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती