शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

येवला तालुक्यात यंदा उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 00:45 IST

जळगाव नेऊर : गेल्या एक महिन्यापासून शेतकऱ्यांच्या लाल कांद्यातून खर्च देखील वसूल होत नसल्याने थोड्याच दिवसात मोठ्या प्रमाणात येणारा उन्हाळी कांदाही करपा, बोगस बियाणे, उन्हाची तीव्रता यांच्या संकटात सापडला असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटणार आहे.

ठळक मुद्देउशिरा आवर्तन, बोगस बियाणे, उन्हाच्या तीव्रतेने फटका

जळगाव नेऊर : गेल्या एक महिन्यापासून शेतकऱ्यांच्या लाल कांद्यातून खर्च देखील वसूल होत नसल्याने थोड्याच दिवसात मोठ्या प्रमाणात येणारा उन्हाळी कांदाही करपा, बोगस बियाणे, उन्हाची तीव्रता यांच्या संकटात सापडला असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटणार आहे. कारण करपा, बोगस बियाणे, एक महिन्यापासून अतितीव्र उष्णता व येवला तालुक्यात अनेक भागात पालखेड डावा कालव्याचे आवर्तन उशिरा झाल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची होरपळ झाल्याने शेकडो हेक्टरवरील कांदा संकटात सापडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादनात घट येणार आहे.पंधरा दिवसातून येणारे ढगाळ वातावरण, वादळी वाऱ्यासह पाऊस, करपा रोग याचा परिणाम उन्हाळी कांद्यावर झाला असून मोठ्या प्रमाणात औषधांच्या फवारण्या कराव्या लागत आहेत. उन्हाळी कांद्याने परिपक्व होण्याअगोदर माना टाकल्याने त्याचा परिणाम कांदा उत्पादनावर होत असून मोठ्या प्रमाणात केलेल्या खर्चातून म्हणावे असे उत्पादन निघणार नसल्याने खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच अपरिपक्व कांदा, गारपीटीत सापडलेला कांदा जास्त दिवस टिकत नसल्याने त्याचा परिणाम कांदा साठवणुकीवर होणार असल्याने शेतकऱ्यांना आहे त्या भावात कांदा विकावा लागणार आहे.यावर्षी घरगुती बियाण्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा शेतकऱ्यांनाआला, चालू हंगाम वाया जातो की काय या भीतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीमिळेल त्या भावाने बियाण्याची खरेदी केली. यामुळे अनेक शेतकऱ्यांची कांदा बियाण्यातफसवणूक झाली आहे.लावले उन्हाळ निघाले लाल,डोंगळे, जोडकांदा, सफेद कांदाया पद्धतीने नित्कृष्ट दर्जाचा कांदा निघत असल्याने शेतकऱ्यांना तो कांदा आहे त्या भावात विक्री करावा लागत असल्याने शेतकरी आणखीनच संकटात सापडला आहेतर काही शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा लागवडीसाठी घेतलेले बियाणे लाल कांद्याचेनिघाल्याने देखील अनेकांचे नुकसान झाले.या संकटाबरोबरच एक महिन्यापासून थंडीचे प्रमाण कमी होऊन मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाल्याने त्याचा परिणाम कांदा परिपक्व होण्यावर झाला आहे. पाण्याची कमतरता भासत असून चार दिवसांआड पाणी द्यावे लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठल्याने अनेक शेतकऱ्यांची पाण्याअभावी कांदा होरपळ झाली असून त्याचा परिणाम उन्हाळी कांद्यावर होत आहे.फेब्रुवारी महिन्यातील कांदा लागवडी संकटातयावर्षी पावसाने शेतकऱ्यांच्या रोपवाटिका खराब झाल्याने शेतकरी मिळेल त्या ठिकाणी बियाणे घेऊन रोपे तयार करत होता. पर्यायाने शेतकऱ्यांच्या कांदा लागवडी उशिरा झाल्या. अनेक शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात कांदा लागवडी केल्या. परंतु त्या कांदा लागवडी अतिउष्ण तापमान, थंडीची कमतरता भासत असल्याने कांद्याचा आकार बारीक झाला असून परिपक्वतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.मी पाच एकरावर उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. घरचे बियाणे संपुष्टात आल्याने बाजारातून बियाणे खरेदी केले. त्यामध्ये ५० टक्के कांदे लाल निघाल्याने व पाहिजे तशी वाढ न झाल्याने कांदा आहे त्या भावात विकावा लागणार आहे तसेच गेल्या एक महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने कांदा वाढीवर परिणाम झाला असून उत्पादन कमी येणार आहे.- भाऊसाहेब शिरसाठ, कांदा उत्पादक शेतकरी 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती