शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

खरिपाची पिके वाया जाण्याची भीती

By admin | Updated: September 6, 2016 22:04 IST

पावसाची दडी : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील बळीराजा हवालदिल; जनावरांच्या चाऱ्यासाठीही कसरत

वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील वटार परिसरात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके वाया जाण्याची चिन्हे दिसत आहेत. सुरुवातीला चांगल्या प्रकारे पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; पण गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.खरिपातील मका, बाजरी ही पिके अत्यंत केविलवाणी अवस्थेत आहेत. सुरुवातीला चांगला पाऊस जरी झाला तरी आता पिके उम्रावर आहेत. पावसामुळे पिकांची वाढही खुंटली आहे. उत्पादनात पन्नास टक्क्यांची घट तर होणार आहेच; परंतु चार ते पाच दिवसात पुरेसा पाऊस झाला नाहीतर फक्त जनावरांसाठी चारा गोळा करावा लागणार आहे.आठ दिवसांपासून तपमानात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन उष्णतेचे प्रमाण वाढल्याने पावसाळा की उन्हाळा, असा प्रश्न पडला आहे.पाण्यासाठी मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. जंगलात जनावरांना चारा नाही, पाणी नाही स्थलांतर करण्याची वेळ आली आहे; पण स्थलांतर करून जायचं कुठं कारण कोठेच पाणी नाही. मेंढपाळ करणारे दुहेरीत संकटात सापडले असून, चाऱ्यासाठी वणवण भटकंती करूनही चारा व पाणी मिळत नाही.मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी बऱ्यापैकी सुरुवातीला पाऊस पडला; पण सर्व पाणी वाहून गेल्याने जमिनीत पाणी जिरलेच नाही त्यामुळे विहिरींनीही तळ गाठला. एकेकाळी पाण्यासाठी प्रसिद्ध समजल्या जाणाऱ्या वटार परिसरात पिण्याच्याही पाण्याची भ्रांत पडली आहे. भरवशाचे पीक समजले जाणारे कांदा पिकाला बाजार नसल्याने चाळीतच कांदा सडला आहे. थोड्याफार प्रमाणात शिल्लक राहिलेला कांदा मातीमोल भावात बळीराजाला विकावा लागत आहे. परिणामी गरीब शेतकरी अधिकच गरीब होत राहील.परिसरातील शेती व शेतकरी धोक्यात आला असून, शेतकरी व शेतमजुराला काम नाही. दोघांवरही उपासमारीची वेळ आली आहे. पावसाळी कांदा लागवड करणारा शेतकरी पाणी नसल्याने शांत बसला आहे. काही शेतकऱ्यांनी कोबी व टमाटा पिकाची लागवड केली. कोबी पिकावर करपा, पाकोळी, तुडतुडे आदि रोगांनी आक्रमण केल्याने हातातोंडाशी आलेला घास गेला. सततचा कमकुवत होत चाललेला पावसाळा बळीराजाला दिवसेंदिवस गरीबच बनवत चालला आहे.परिसरातन डाळींबबागांवर तेल्या रोगाने आक्रमण केल्याने डाळिंबबागा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. महागडी फवारणी करूनही डाळिंबाची रोगराई थांबत नसल्याने शेतकरी बागा उपटून टाकत आहेत. साततच्या दुष्काळाची झळ सोसणारा बळीराजाला या वर्षीतरी तरी खरिपाच्या पिकांची साथ मिळेल का याबाबत शंका वाटत आहे. (वार्ताहर)