शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

एकलहरे औष्णिक वीज केंद्रात बिघाड

By admin | Updated: June 21, 2016 00:18 IST

जिल्ह्यात अघोषित भारनियमन तीनही संच बंद झाल्याने मध्यरात्रीपासून विजेचा तुटवडा; महानिर्मितीचेही नुकसान

नाशिक : एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सीमध्ये सातत्य बिघाडल्याने वीजनिर्मिती संच बंद पडल्यामुळे सोमवारी जिल्ह्यासह शहरात अचानक अघोषित भारनियमन करण्याची वेळ आली. दरम्यान, महापारेषणच्या वीजवहन यंत्रणेतील बिघाडामुळे महानिर्मितीचे संच बंद पडल्याचा दावा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राने केला आहे. एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात २१० मेगाव्हॉटचे प्रत्येकी तीन संच आहेत. पाणीटंचाईमुळे त्यातील एक संच बंद असून, उर्वरित दोन संचांमधून वीजनिर्मितीचे कार्य सुरू आहे. रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास वीजनिर्मिती संचातील व्होल्टेज कमी झाला आणि फ्रिक्वेन्सीही निर्धारित मानांकाच्या खाली आल्याने २१० मेगाव्हॉटचे दोनही संच ट्रिप झाले. त्यामुळे केंद्रातील संपूर्ण वीजनिर्मिती बंद पडली. यामुळे महावितरणला जिल्हा भरात तातडीने भारनियमन करावे लागले. सुमारे पाच ते सहा तास संपूर्ण वीजनिर्मिती बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचा तुटवडा निर्माण होऊन शहर, जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला. अचानक भारनियमन करण्याची वेळ आल्यामुळे नाशिककरांचे दैनंदिन वेळापत्रक कोलमडून पडले. विशेष म्हणजे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असताना शहरातील वीज कर्मचाऱ्यांना कोणतेही सबळ कारण सांगता येत नव्हते. वीजपुरवठा खंडित होण्यामागे केवळ तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात येत असल्याने वीज केव्हा उपलब्ध होणार याची कोणतीही माहिती नागरिकांना मिळत नव्हती. वीज कर्मचारीदेखील या बिघाडाबाबत अनभिज्ञ दिसून आले.