शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

एकलहरे औष्णिक वीज केंद्रात बिघाड

By admin | Updated: June 21, 2016 00:18 IST

जिल्ह्यात अघोषित भारनियमन तीनही संच बंद झाल्याने मध्यरात्रीपासून विजेचा तुटवडा; महानिर्मितीचेही नुकसान

नाशिक : एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सीमध्ये सातत्य बिघाडल्याने वीजनिर्मिती संच बंद पडल्यामुळे सोमवारी जिल्ह्यासह शहरात अचानक अघोषित भारनियमन करण्याची वेळ आली. दरम्यान, महापारेषणच्या वीजवहन यंत्रणेतील बिघाडामुळे महानिर्मितीचे संच बंद पडल्याचा दावा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राने केला आहे. एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात २१० मेगाव्हॉटचे प्रत्येकी तीन संच आहेत. पाणीटंचाईमुळे त्यातील एक संच बंद असून, उर्वरित दोन संचांमधून वीजनिर्मितीचे कार्य सुरू आहे. रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास वीजनिर्मिती संचातील व्होल्टेज कमी झाला आणि फ्रिक्वेन्सीही निर्धारित मानांकाच्या खाली आल्याने २१० मेगाव्हॉटचे दोनही संच ट्रिप झाले. त्यामुळे केंद्रातील संपूर्ण वीजनिर्मिती बंद पडली. यामुळे महावितरणला जिल्हा भरात तातडीने भारनियमन करावे लागले. सुमारे पाच ते सहा तास संपूर्ण वीजनिर्मिती बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचा तुटवडा निर्माण होऊन शहर, जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला. अचानक भारनियमन करण्याची वेळ आल्यामुळे नाशिककरांचे दैनंदिन वेळापत्रक कोलमडून पडले. विशेष म्हणजे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असताना शहरातील वीज कर्मचाऱ्यांना कोणतेही सबळ कारण सांगता येत नव्हते. वीजपुरवठा खंडित होण्यामागे केवळ तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात येत असल्याने वीज केव्हा उपलब्ध होणार याची कोणतीही माहिती नागरिकांना मिळत नव्हती. वीज कर्मचारीदेखील या बिघाडाबाबत अनभिज्ञ दिसून आले.