शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राज्यसभेच्या तीन सदस्यांमुळे उजळले कळवणचे भाग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 17:32 IST

मदतीचा हात : स्वामी, त्रिपाठी, दलवार्इंनी दिला खासदार निधी

ठळक मुद्देविकासकामांसाठी राज्य सरकारकडून निधीच मिळत नसल्याने नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर

कळवण : ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आल्यानंतर विकासकामांसाठी शासन यंत्रणेचे उंबरठे झिजवावे लागण्याची वेळ नवनिर्मित नगरपंचायतीवर आली असताना कळवण शहरातील विकासकामांच्या मदतीला मात्र राज्यसभेचे तीन सदस्य धावून आले आहेत. खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी, डी.पी. त्रिपाठी व हुसेन दलवाई यांनी शहरांतर्गत विकासकामांसाठी एक कोटी ३० लाख रु पयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने शहरातील रस्त्यांचे भाग्य उजळून निघाले आहे.कळवण ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाल्याने जादा निधी उपलब्ध होईल, विकासाची कामे वेगाने होतील अशी अपेक्षा नागरिक व नवनियुक्त लोकप्रतिनिधींची होती; पण नगरपंचायतीची निर्मिती होऊन तब्बल तीन वर्षे झाली तरी विकासकामांसाठी राज्य सरकारकडून निधीच मिळत नसल्याने नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर असून, परिणामी वॉर्डातील विकासकामे ठप्प झाली आहेत. नव्याने निर्माण झालेल्या नगर पंचायतींना शहर विकासाच्या कामाचा अनुशेष भरून काढता यावा म्हणून शासनातर्फे विशेष विकास निधी उपलब्ध करून दिला जातो. परंतु कळवण नगरपंचायतीला या निधीपासूनदेखील वंचित ठेवण्यात आले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामांसाठी निधी मिळावा यासाठी उपनगराध्यक्ष कौतिक पगार यांनी राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी, हुसेन दलवाई आणि डी.पी. त्रिपाठी यांची वेळोवेळी भेट घेऊन शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी साकडे घातले होते. कळवण शहरातील अंतर्गत रस्त्यांचे सर्वेक्षण करून रस्ते दुरु स्ती करण्याबाबतचा अहवाल शासकीय यंत्रणेकडून तीनही खासदारांना सादर झाल्यानंतर त्यांनी खासदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आणि त्याची पूर्तताही केली. कळवण नगरपंचायत हद्दीतील रस्ते विकासासाठी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ५० लाख रु पये, डी. पी. त्रिपाठी यांनी ५० लाख रु पये तर हुसेन दलवाई यांनी ३० लाख रु पये निधी दिला असून, त्यातून शहरातील रस्त्यांची कामे करतानाच अन्य कामेही केली जात असल्याची माहिती उपनगराध्यक्ष कौतिक पगार यांनी दिली.

 

टॅग्स :Nashikनाशिक