शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

राज्यसभेच्या तीन सदस्यांमुळे उजळले कळवणचे भाग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 17:32 IST

मदतीचा हात : स्वामी, त्रिपाठी, दलवार्इंनी दिला खासदार निधी

ठळक मुद्देविकासकामांसाठी राज्य सरकारकडून निधीच मिळत नसल्याने नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर

कळवण : ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आल्यानंतर विकासकामांसाठी शासन यंत्रणेचे उंबरठे झिजवावे लागण्याची वेळ नवनिर्मित नगरपंचायतीवर आली असताना कळवण शहरातील विकासकामांच्या मदतीला मात्र राज्यसभेचे तीन सदस्य धावून आले आहेत. खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी, डी.पी. त्रिपाठी व हुसेन दलवाई यांनी शहरांतर्गत विकासकामांसाठी एक कोटी ३० लाख रु पयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने शहरातील रस्त्यांचे भाग्य उजळून निघाले आहे.कळवण ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाल्याने जादा निधी उपलब्ध होईल, विकासाची कामे वेगाने होतील अशी अपेक्षा नागरिक व नवनियुक्त लोकप्रतिनिधींची होती; पण नगरपंचायतीची निर्मिती होऊन तब्बल तीन वर्षे झाली तरी विकासकामांसाठी राज्य सरकारकडून निधीच मिळत नसल्याने नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर असून, परिणामी वॉर्डातील विकासकामे ठप्प झाली आहेत. नव्याने निर्माण झालेल्या नगर पंचायतींना शहर विकासाच्या कामाचा अनुशेष भरून काढता यावा म्हणून शासनातर्फे विशेष विकास निधी उपलब्ध करून दिला जातो. परंतु कळवण नगरपंचायतीला या निधीपासूनदेखील वंचित ठेवण्यात आले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामांसाठी निधी मिळावा यासाठी उपनगराध्यक्ष कौतिक पगार यांनी राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी, हुसेन दलवाई आणि डी.पी. त्रिपाठी यांची वेळोवेळी भेट घेऊन शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी साकडे घातले होते. कळवण शहरातील अंतर्गत रस्त्यांचे सर्वेक्षण करून रस्ते दुरु स्ती करण्याबाबतचा अहवाल शासकीय यंत्रणेकडून तीनही खासदारांना सादर झाल्यानंतर त्यांनी खासदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आणि त्याची पूर्तताही केली. कळवण नगरपंचायत हद्दीतील रस्ते विकासासाठी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ५० लाख रु पये, डी. पी. त्रिपाठी यांनी ५० लाख रु पये तर हुसेन दलवाई यांनी ३० लाख रु पये निधी दिला असून, त्यातून शहरातील रस्त्यांची कामे करतानाच अन्य कामेही केली जात असल्याची माहिती उपनगराध्यक्ष कौतिक पगार यांनी दिली.

 

टॅग्स :Nashikनाशिक