शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

जत्रा चौफुलीवर जीवघेणी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:59 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा चौफुलीवर वाहनधारकांसह पादचाऱ्यांना दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असून, नित्याची वाहतूक कोंडी व होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांचा बळी गेला आहे.

आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा चौफुलीवर वाहनधारकांसह पादचाऱ्यांना दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असून, नित्याची वाहतूक कोंडी व होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांचा बळी गेला आहे. महामार्गावरील उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने सर्व्हिसरोडने महामार्ग ओलांडणाºया वाहनचालकांची जीवघेणी कसरत सुरू असल्याने या चौफुलीवर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे.मुंबई-आग्रा महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर हॉटेल प्रकाश ते के. के. वाघ महाविद्यालयापर्यंत सर्वांत लांबीचा उड्डाणपूल तयार करण्यात आला. परंतु पूल उतरल्यानंतर पंचवटीत के. के. वाघ महाविद्यालयाच्या पुढे प्रत्येक चौफुलीवर वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली होती. त्यामुळे उड्डाणपुलाचे हॉटेल जत्रापर्यंत विस्तारीकरण करण्यात यावे यासाठी अनेक संघटनांनी, स्थानिक नागरिकांनी आंदोलने करून पाठपुरावा केला त्यानंतर प्रशासनाने उड्डाणपूल मंजूर करून प्रत्यक्ष कामालादेखील सुरुवात झाली आहे. या कामासाठी मुख्य रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक वळविण्यात आली असून, समांतर रस्त्याचा अधिकाधिक वापर वाहनचालकांकडून केला जात असला तरी, उड्डाणपुलाच्या कामामुळे सकाळी संध्याकाळी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. शिवाय एकाच बाजूला चारही बाजूने वाहने येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन शिवाय छोटे-मोठे अपघातदेखील घडतात. या चौफुलीवर चारही बाजूने वाहतूक सुरू असते शिवाय वाहनांचा वेगदेखील प्रचंड असतो त्यामुळे रस्ता ओलांडताना लहान मुले, वयोवृद्ध नागरिक व महिलांची तारांबळ  उडते.या गोंधळात बºयाचदा अपघात घडत आहेत. या परिसरात शाळा, कॉलेजेस यांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा नेहमी राबता असतो. त्यामुळे या चौफुलीवरील समस्या सोडविण्यासाठी लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे.आठवडे बाजारची समस्या गंभीरजत्रा चौफुलीजवळ दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो, पण बहुतांश भाजीविक्रेते सर्व्हिसरोडच्या कडेला आपली दुकाने थाटतात. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने बहुतांश वाहतूक सर्व्हिसरोडने सुरू असते, त्यामुळे आठवडे बाजारमुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम सुरू असेपर्यंत विक्रेत्यांना सर्व्हिसरोड ऐवजी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.तात्पुरते दुभाजक टाकावेमहामार्गावरील बहुतांश वाहतूक प्रचंड वेगाने सर्व्हिसरोडने सुरू आहे. वाहने ओव्हरटेक करताना समोरून येणाºया दुचाकी व छोट्या वाहनांची तारांबळ उडते. अवजड वाहने थेट अंगावर येण्याची भीती निर्माण होते. शिवाय जत्रा चौफुली येथे तर वाहतूक कोंडीच होते. त्यामुळे सर्व्हिसरोडवर रासबिहारी ते जत्रा चौफुली या मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात दुभाजक टाकावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.जत्रा चौफुलीवर वाहतूक कोंडीची समस्या महामार्गाच्या विस्तारीकरनापासूनच पाठ सोडत नाही. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी सुटेल अशी अपेक्षा आहे, पण अजून जवळपास दीड ते दोन वर्षे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना गरजेच्या आहे. त्यामध्ये वाहतूक पोलिसांची नेमणूक, सर्व्हिसरोडवर दुभाजक टाकावे व सर्व्हिसरोडवर गुरुवारी बसणारा भाजीबाजार, सर्व्हिसरोडचे अतिक्रमण हटवावे जेणेकरून वातुकीला अडथळा होणार नाही.- विजय पेलमहाले, नागरिक

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा