शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कांदा, द्राक्ष आगारात आर्थिक उलाढाल ठप्प येवला तालुक्यातील शेतकरी आला मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 20:25 IST

जळगाव नेऊर : कांद्याच्या भावात सद्यामोठी चढउतार होत असुन फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत असतांना मार्च महिन्यात मात्र शेतकऱ्यांना आठशे ते हजार रुपये दर मिळत आाहे. यातून शेतकऱ्यांचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने येवला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी सुस्त झाला आहे,

ठळक मुद्देबाजारभावातील होणाऱ्या घसरणीमुळे शेतकरी धास्तावले

जळगाव नेऊर : कांद्याच्या भावात सद्यामोठी चढउतार होत असुन फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत असतांना मार्च महिन्यात मात्र शेतकऱ्यांना आठशे ते हजार रुपये दर मिळत आाहे. यातून शेतकऱ्यांचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने येवला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी सुस्त झाला आहे,यंदा बियाणे, रोप लागवडीपासून थेट काढणी अवस्थेपर्यंत कांदा उत्पादक शेतकरी चिंतेतच आहे. त्यातच उन्हाळ कांदा रोपांची झालेली फसवणूक अवकाळी पाऊस, बदलते हवामान, फवारणी, खते, निंदणी तुलनेत कांदा उत्पादन खर्च जास्तीचा झाला आहे. मात्र उत्पादीत मालाला अपेक्षित भाव नाही. बाजारभावातील होणाऱ्या घसरणीमुळे शेतकरी धास्तावले आहेत.यावर्षी शेतकऱ्यांनी मात्र इतर पिकांची होणारी परवड, नुकसान ऐवजी कांदा लागवडीचा शेतकऱ्यांनी पर्याय निवडला. अर्थात जुगाराच्या माध्यमातून नशिब आजमावले आहे. दरवर्षी जिल्ह्यात कांद्याची लागवड वाढत आहे. उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पादन काढणे गरजेचे आहे. मात्र हल्ली उत्पादन खर्च हा वाढत आहे. पूर्वी १५ ते २० रुपये किलो कांदा गेला तरी शेतकऱ्यांना परवडत होते. आता हा दर परवडत नाही. उत्पादन खर्च वाढल्याने एका दृष्टचक्रात कांदा पीक सापडले आहे.कांदा बियाणेत फसवणूकयंदा उन्हाळ कांदा बियाणांचा मोठा तुटवडा होता. त्याचा गैरफायदा बनावट कंपन्यांनी घेतला. तब्बल ५ हजारांवर अधिक भावाने शेतकऱ्यांनी बियाणे घेतली. ही बियाणे खरेदी केली उन्हाळ कांद्याचे, अन् निघाले लालचे, यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हा माल साठवणूक करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर बहुतांश शेतकऱ्यांना नाईलाजाने कांदा विक्री करावा लागत आहे. काही ठिकाणी बियाणे उगवले नाही. जे उगवले त्या कांद्याला डोंगळे आल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना कधी वादळी पाऊस तर कधी शासनाच्या धरसोड वृत्तीमुळे, द्राक्ष उत्पादक शेतकरी हैराण झालेला असुन दर्जेदार माल उत्पादित करून सुद्धा आज मात्र शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या दर्जेदार द्राक्षबागेला मातीमोल दर मिळत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यांचा दुसरा हंगामही कोरोनाच्या सावटाखाली सापडल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी मात्र मेटाकुटीस आला आहे, खते ,औषधांची वाढलेले दर ,मजुरीचे वाढलेले दर पाहता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरात काहीच नफा शिल्लक राहत नसल्याने शेतकरी ऐन हंगामात संकटात सापडला आहे ,मागील वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा व्यापाऱ्यांअभावी ,तर कधी वाहतूक बंदमुळे अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेवर मनुके तयार झाले, मागील वर्ष कोरोना संकटात गेलेले असतानाच दुसरे वर्ष ही कोरोना संसर्ग साथीच्या सावटाखाली चालल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहेमी दीड एकरावर द्राक्षाची लागवड केली असून द्राक्ष बागेचे दोन प्लॉट केले आहे. तीस गुंठे प्लॉट जानेवारीच्या गारपीटीत सापडल्याने द्राक्ष बागेला पूर्णपणे तडे गेल्याने द्राक्ष फेकून द्यावे लागली व आता तीस गुंठ्यात ११० क्विंटल द्राक्षे बाग अवघ्या बारा रुपये दराने विकावी लागली म्हणजे यावर्षी द्राक्ष बागेतून खर्चदेखील वसूल झालेला नाही.- सुशांत पानसरे, शेतकरी.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी