शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पालखेड च्या आवर्तनासाठी येवल्यातील शेतकरी आक्र मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 17:22 IST

जळगाव नेऊर : येवला तालुका सतत दुष्काळी असूनही शासनाच्या चुकीच्या माहितीमुळे जायकवाडीला पाणी देता यावे, याकरीता येथील हक्काच्या पाण्यावर ...

ठळक मुद्दे कृती समितीची स्थापना:जायकवाडी साठी थेंबभर ही पाणी न जाऊ देण्याचा निर्धार

जळगाव नेऊर :येवला तालुका सतत दुष्काळी असूनही शासनाच्या चुकीच्या माहितीमुळे जायकवाडीला पाणी देता यावे, याकरीता येथील हक्काच्या पाण्यावर डल्ला मारु न ते पाणी कारखानदारांना वापरण्यासाठी येवला तालुक्याचे नाव दुष्काळी तालुक्यांच्या यादीतुन वगळण्यात आले आहे. शासनाचा हा डाव येथील शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवत सोनवणे यांनी केले.येवल्यात पालखेड चे पाणी पेटले असून जायकवाडी ला पाणी सोडण्याचे संकट आपल्या मुळावर येऊन येवला तालुक्यातील शेती उध्वस्त करण्याचा घाट घातला जात आहे.सरकारची यामागे सुडाची भावना असली जनता आता आपला लढा स्वत: च लढण्यास सज्ज झाली असून त्या साठी पालखेड डावा कालवा कृती समतिी स्थापन करण्यात आली आहे.जलहक्क संघर्ष समतिीचे संयोजक भागवत राव सोनवणे हे पालखेड कालवा कृती समितीचे निमंत्रक असून पालखेड परिसरातीलसर्व शेतकरी बांधव या कृती समितीचे सदस्य राहणार आहेत.एरंडगाव येथील पालखेड वसाहतीच्या आवारात कृती समितीचीपहिली बैठक संपन्न झाली .पालखेड कालवा कृती समतिीच्या आजच्या स्थापनेच्या दिवशी लाभ क्षेत्रातील शेकडो शेतकर्यांनी एरंडगाव येथे जमून सरकारचा निषेध करून हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणा दिल्या.पालखेड चे रब्बी साठी चे पाणी सिंचन आवर्तन न्याय पद्धतीने मिळण्यासाठी टोकाचा संघर्ष करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आज रविवार दि. २१ रोजी सकाळीएरंडगाव येथील पालखेड डावा कालवा कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाली. यावेळी रब्बी हंगामासाठी लवकरात लवकर दोन आवर्तने पूर्ण क्षमतेने मिळण्यासाठी लढा उभारणे, पालखेड धरण समुहातील पाणी जायकवाडीसाठी जाऊ नये यासाठी न्यायालयीन लढाई लढणे,आदींविषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, शेतकरी संघटनेचे अनिस पटेल, एकनाथ गायकवाड, शेरु भाई मोमीन, आदींनी मार्गदर्शन केले.यावेळी सोनवणे म्हणाले की, येवला तालुका दुष्काळाच्या यादीत न येण्याचे महत्वाचे कारण, शासन दरबारी असलेल्या पर्जन्य मापकाच्या नोंदीपासून शासनाकडे चुकीची माहिती पुरविण्यात आली आहे. पर्जन्यमापक यंत्र येवले शहरातील तहसिल कार्यालय आवारासह जिल्हा परिषदेच्या मुखेड, पाटोदा, अंदरसूल, नगरसून या चार गटात बसविण्यात आले आहे. मात्र, त्यावरील नोंदी न घेता येवले शहरातील तहसिल कार्यालय आवारातील पर्जन्यमापकावरील नोंदी घेतल्या गेल्याने ही चुकीची माहिती शासनाकडे पुरविण्यात आली आहे. या नोंदीवरु न तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची माहिती पुरविण्यात आली आहे. वस्तुत: ही माहिती येवला शहरात असलेल्या महसूल मंडळाच्या पर्जन्यमापकावरु न घेतली आहे. त्यामुळे केवळ शहरासह नजीकच्या गावचा पाऊस गृहित धरु न येवल्याला दुष्काळाच्या यादीतुन वगळले आहे. वास्तविक नगरसूल, अंदरसूल या महसूल मंडळातील सर्व जलाशय कोरडे असून नदीपात्रही कोरडे आहे. सरासरीच्या निम्माही पाऊस या परिसरात झालेला नाही. पर्जन्य मानाच्या निकषानुसार नगरसूल व अंदरसूल मंडळातील प्रत्येक गाव दुष्काळी आहे. या परिसरात भिषण पाणी टंचाई, चारा टंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत पालखेड डाव्या कालव्याचे दोन आवर्तने ही आपल्या हक्काची असून ती मिळालीच पाहिजे. या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर चक्काजाम करण्याबरोबरच आपण न्यायालयातही धाव घेणार असल्याचे भागवतराव सोनवणे यांनी सांगितले. यााप्रसंगी प्रभाकर रंधे, रतन मढवई, सुनील साताळकर, भगवान ठोंबरे, माजी सरपंच नवनाथ लभडे, विठ्ठलं वाळके, सीताराम गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, वसंत झांबरे, महेबूब शेख, रावसाहेब आहेर, अनिल गायकवाड, प्रकाश साताळकर, बाळासाहेब साताळकर, रावसाहेब झांबरे, सुधाकर ठोंबरे, श्याम गुंड, शिवाजी खापरे, निवृत्ती मढवई आदींसह