शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पालखेड च्या आवर्तनासाठी येवल्यातील शेतकरी आक्र मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 17:22 IST

जळगाव नेऊर : येवला तालुका सतत दुष्काळी असूनही शासनाच्या चुकीच्या माहितीमुळे जायकवाडीला पाणी देता यावे, याकरीता येथील हक्काच्या पाण्यावर ...

ठळक मुद्दे कृती समितीची स्थापना:जायकवाडी साठी थेंबभर ही पाणी न जाऊ देण्याचा निर्धार

जळगाव नेऊर :येवला तालुका सतत दुष्काळी असूनही शासनाच्या चुकीच्या माहितीमुळे जायकवाडीला पाणी देता यावे, याकरीता येथील हक्काच्या पाण्यावर डल्ला मारु न ते पाणी कारखानदारांना वापरण्यासाठी येवला तालुक्याचे नाव दुष्काळी तालुक्यांच्या यादीतुन वगळण्यात आले आहे. शासनाचा हा डाव येथील शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवत सोनवणे यांनी केले.येवल्यात पालखेड चे पाणी पेटले असून जायकवाडी ला पाणी सोडण्याचे संकट आपल्या मुळावर येऊन येवला तालुक्यातील शेती उध्वस्त करण्याचा घाट घातला जात आहे.सरकारची यामागे सुडाची भावना असली जनता आता आपला लढा स्वत: च लढण्यास सज्ज झाली असून त्या साठी पालखेड डावा कालवा कृती समतिी स्थापन करण्यात आली आहे.जलहक्क संघर्ष समतिीचे संयोजक भागवत राव सोनवणे हे पालखेड कालवा कृती समितीचे निमंत्रक असून पालखेड परिसरातीलसर्व शेतकरी बांधव या कृती समितीचे सदस्य राहणार आहेत.एरंडगाव येथील पालखेड वसाहतीच्या आवारात कृती समितीचीपहिली बैठक संपन्न झाली .पालखेड कालवा कृती समतिीच्या आजच्या स्थापनेच्या दिवशी लाभ क्षेत्रातील शेकडो शेतकर्यांनी एरंडगाव येथे जमून सरकारचा निषेध करून हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणा दिल्या.पालखेड चे रब्बी साठी चे पाणी सिंचन आवर्तन न्याय पद्धतीने मिळण्यासाठी टोकाचा संघर्ष करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आज रविवार दि. २१ रोजी सकाळीएरंडगाव येथील पालखेड डावा कालवा कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाली. यावेळी रब्बी हंगामासाठी लवकरात लवकर दोन आवर्तने पूर्ण क्षमतेने मिळण्यासाठी लढा उभारणे, पालखेड धरण समुहातील पाणी जायकवाडीसाठी जाऊ नये यासाठी न्यायालयीन लढाई लढणे,आदींविषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, शेतकरी संघटनेचे अनिस पटेल, एकनाथ गायकवाड, शेरु भाई मोमीन, आदींनी मार्गदर्शन केले.यावेळी सोनवणे म्हणाले की, येवला तालुका दुष्काळाच्या यादीत न येण्याचे महत्वाचे कारण, शासन दरबारी असलेल्या पर्जन्य मापकाच्या नोंदीपासून शासनाकडे चुकीची माहिती पुरविण्यात आली आहे. पर्जन्यमापक यंत्र येवले शहरातील तहसिल कार्यालय आवारासह जिल्हा परिषदेच्या मुखेड, पाटोदा, अंदरसूल, नगरसून या चार गटात बसविण्यात आले आहे. मात्र, त्यावरील नोंदी न घेता येवले शहरातील तहसिल कार्यालय आवारातील पर्जन्यमापकावरील नोंदी घेतल्या गेल्याने ही चुकीची माहिती शासनाकडे पुरविण्यात आली आहे. या नोंदीवरु न तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची माहिती पुरविण्यात आली आहे. वस्तुत: ही माहिती येवला शहरात असलेल्या महसूल मंडळाच्या पर्जन्यमापकावरु न घेतली आहे. त्यामुळे केवळ शहरासह नजीकच्या गावचा पाऊस गृहित धरु न येवल्याला दुष्काळाच्या यादीतुन वगळले आहे. वास्तविक नगरसूल, अंदरसूल या महसूल मंडळातील सर्व जलाशय कोरडे असून नदीपात्रही कोरडे आहे. सरासरीच्या निम्माही पाऊस या परिसरात झालेला नाही. पर्जन्य मानाच्या निकषानुसार नगरसूल व अंदरसूल मंडळातील प्रत्येक गाव दुष्काळी आहे. या परिसरात भिषण पाणी टंचाई, चारा टंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत पालखेड डाव्या कालव्याचे दोन आवर्तने ही आपल्या हक्काची असून ती मिळालीच पाहिजे. या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर चक्काजाम करण्याबरोबरच आपण न्यायालयातही धाव घेणार असल्याचे भागवतराव सोनवणे यांनी सांगितले. यााप्रसंगी प्रभाकर रंधे, रतन मढवई, सुनील साताळकर, भगवान ठोंबरे, माजी सरपंच नवनाथ लभडे, विठ्ठलं वाळके, सीताराम गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, वसंत झांबरे, महेबूब शेख, रावसाहेब आहेर, अनिल गायकवाड, प्रकाश साताळकर, बाळासाहेब साताळकर, रावसाहेब झांबरे, सुधाकर ठोंबरे, श्याम गुंड, शिवाजी खापरे, निवृत्ती मढवई आदींसह