शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 19:16 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरीही अजून वरून राजाचे समाधानकारक आगमन झाले नसल्याने गावापासून पुर्वकडील वडपाटी भागातील शेतकऱ्यांच्या अजून पेरण्या झाल्या नसल्याने शेतकरी वर्ग धास्तावले आहे.

ठळक मुद्देराजापूर : पुर्वकडील भागात अद्याप पेरण्याच नाही झाल्या

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरीही अजून वरून राजाचे समाधानकारक आगमन झाले नसल्याने गावापासून पुर्वकडील वडपाटी भागातील शेतकऱ्यांच्या अजून पेरण्या झाल्या नसल्याने शेतकरी वर्ग धास्तावले आहे.गेल्या बराच दिवसापासून पावसाने ओढ लावल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात असून कधी वरूनराजा हजेरी लावेल या चिंतेने शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले आहे. येथे मागील वषी दुष्काळी परिस्थिती भयानक असताना यावर्षी अजूनही पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबून पडल्या आहेत.राजापूर येथे सध्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांना चारा या चिंतेने जनता हैराण झाली आहे. त्यामुळे खरिप हंगामातील पेरण्या करण्यासाठी पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. मागे काही दिवसापूर्वी थोड्याफार झालेल्या पावसावर काही भागातील शेतकऱ्यांनी मका, मुग, बाजरी, भुईमूग, कपाशी आदींच्या पेरण्या केल्या, मात्र आता ती उगवत असताना पाऊसाची नितांत गरज आहे. पण वरून राजा रूसलेलाच आहे.राजापूर गावात निम्या पेरण्या झाल्या आहे. पण सध्या त्या पेरण्या करूनही उपयोग होतो कि नाही अशा प्रश्न शेतकरी वर्गासमोर उभा आहे.त्यामुळे शेतात पिके सुकून जाते कि काय या संकटात शेतकरी सापडले आहे.त्यामुळे बळीराजासह शेतमजूर वर्ग यांच्या नजरा वरूनराजाच्या आगमनाकडे लागून आहेत. मात्र खरिप हंगामासाठी पावसाची नितांत आवश्यकता असल्याने या पावसाच्या आगमनकडे बळीराजाच्या नजरा लागून आहे. गेल्या वर्षी जुन महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर सुरू आहेत. या गावाला कितीही पाऊस झाला तरी दरवर्षी उन्हाळ्यातील चार महिने हे या गावाला टॅकरवर तहान भागावी लागते. पण मागच्या वषीॅ शेतकरी वर्गाने केलेला खर्चही वसूल झालेला नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. .दीड महिना उलटूनही राजापूर येथे चांगला पाऊस झाला नसल्याने राजापूर व परिसरात सध्या काही भागात पेरण्या झाल्या आहेत. तर अजूनही वडपाटी कडील शेतकºयांच्या पेरण्या झाल्या नाही. मागील वषी केलेला खर्चही वसूल झालेला नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेले असल्याने शेतकºयांची चिंता वाढत आहे.- दत्तात्रय सानप, शेतकरी, राजापूर.