शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 19:16 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरीही अजून वरून राजाचे समाधानकारक आगमन झाले नसल्याने गावापासून पुर्वकडील वडपाटी भागातील शेतकऱ्यांच्या अजून पेरण्या झाल्या नसल्याने शेतकरी वर्ग धास्तावले आहे.

ठळक मुद्देराजापूर : पुर्वकडील भागात अद्याप पेरण्याच नाही झाल्या

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरीही अजून वरून राजाचे समाधानकारक आगमन झाले नसल्याने गावापासून पुर्वकडील वडपाटी भागातील शेतकऱ्यांच्या अजून पेरण्या झाल्या नसल्याने शेतकरी वर्ग धास्तावले आहे.गेल्या बराच दिवसापासून पावसाने ओढ लावल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात असून कधी वरूनराजा हजेरी लावेल या चिंतेने शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले आहे. येथे मागील वषी दुष्काळी परिस्थिती भयानक असताना यावर्षी अजूनही पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबून पडल्या आहेत.राजापूर येथे सध्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांना चारा या चिंतेने जनता हैराण झाली आहे. त्यामुळे खरिप हंगामातील पेरण्या करण्यासाठी पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. मागे काही दिवसापूर्वी थोड्याफार झालेल्या पावसावर काही भागातील शेतकऱ्यांनी मका, मुग, बाजरी, भुईमूग, कपाशी आदींच्या पेरण्या केल्या, मात्र आता ती उगवत असताना पाऊसाची नितांत गरज आहे. पण वरून राजा रूसलेलाच आहे.राजापूर गावात निम्या पेरण्या झाल्या आहे. पण सध्या त्या पेरण्या करूनही उपयोग होतो कि नाही अशा प्रश्न शेतकरी वर्गासमोर उभा आहे.त्यामुळे शेतात पिके सुकून जाते कि काय या संकटात शेतकरी सापडले आहे.त्यामुळे बळीराजासह शेतमजूर वर्ग यांच्या नजरा वरूनराजाच्या आगमनाकडे लागून आहेत. मात्र खरिप हंगामासाठी पावसाची नितांत आवश्यकता असल्याने या पावसाच्या आगमनकडे बळीराजाच्या नजरा लागून आहे. गेल्या वर्षी जुन महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर सुरू आहेत. या गावाला कितीही पाऊस झाला तरी दरवर्षी उन्हाळ्यातील चार महिने हे या गावाला टॅकरवर तहान भागावी लागते. पण मागच्या वषीॅ शेतकरी वर्गाने केलेला खर्चही वसूल झालेला नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. .दीड महिना उलटूनही राजापूर येथे चांगला पाऊस झाला नसल्याने राजापूर व परिसरात सध्या काही भागात पेरण्या झाल्या आहेत. तर अजूनही वडपाटी कडील शेतकºयांच्या पेरण्या झाल्या नाही. मागील वषी केलेला खर्चही वसूल झालेला नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेले असल्याने शेतकºयांची चिंता वाढत आहे.- दत्तात्रय सानप, शेतकरी, राजापूर.