शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 19:16 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरीही अजून वरून राजाचे समाधानकारक आगमन झाले नसल्याने गावापासून पुर्वकडील वडपाटी भागातील शेतकऱ्यांच्या अजून पेरण्या झाल्या नसल्याने शेतकरी वर्ग धास्तावले आहे.

ठळक मुद्देराजापूर : पुर्वकडील भागात अद्याप पेरण्याच नाही झाल्या

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरीही अजून वरून राजाचे समाधानकारक आगमन झाले नसल्याने गावापासून पुर्वकडील वडपाटी भागातील शेतकऱ्यांच्या अजून पेरण्या झाल्या नसल्याने शेतकरी वर्ग धास्तावले आहे.गेल्या बराच दिवसापासून पावसाने ओढ लावल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात असून कधी वरूनराजा हजेरी लावेल या चिंतेने शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले आहे. येथे मागील वषी दुष्काळी परिस्थिती भयानक असताना यावर्षी अजूनही पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबून पडल्या आहेत.राजापूर येथे सध्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांना चारा या चिंतेने जनता हैराण झाली आहे. त्यामुळे खरिप हंगामातील पेरण्या करण्यासाठी पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. मागे काही दिवसापूर्वी थोड्याफार झालेल्या पावसावर काही भागातील शेतकऱ्यांनी मका, मुग, बाजरी, भुईमूग, कपाशी आदींच्या पेरण्या केल्या, मात्र आता ती उगवत असताना पाऊसाची नितांत गरज आहे. पण वरून राजा रूसलेलाच आहे.राजापूर गावात निम्या पेरण्या झाल्या आहे. पण सध्या त्या पेरण्या करूनही उपयोग होतो कि नाही अशा प्रश्न शेतकरी वर्गासमोर उभा आहे.त्यामुळे शेतात पिके सुकून जाते कि काय या संकटात शेतकरी सापडले आहे.त्यामुळे बळीराजासह शेतमजूर वर्ग यांच्या नजरा वरूनराजाच्या आगमनाकडे लागून आहेत. मात्र खरिप हंगामासाठी पावसाची नितांत आवश्यकता असल्याने या पावसाच्या आगमनकडे बळीराजाच्या नजरा लागून आहे. गेल्या वर्षी जुन महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर सुरू आहेत. या गावाला कितीही पाऊस झाला तरी दरवर्षी उन्हाळ्यातील चार महिने हे या गावाला टॅकरवर तहान भागावी लागते. पण मागच्या वषीॅ शेतकरी वर्गाने केलेला खर्चही वसूल झालेला नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. .दीड महिना उलटूनही राजापूर येथे चांगला पाऊस झाला नसल्याने राजापूर व परिसरात सध्या काही भागात पेरण्या झाल्या आहेत. तर अजूनही वडपाटी कडील शेतकºयांच्या पेरण्या झाल्या नाही. मागील वषी केलेला खर्चही वसूल झालेला नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेले असल्याने शेतकºयांची चिंता वाढत आहे.- दत्तात्रय सानप, शेतकरी, राजापूर.