शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

पावसाअभावी पाथरे परिसरातील शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 19:42 IST

पाथरे : पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने झाले तरी सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पाथरे परिसरात समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी, ग्रामस्थ चिंतेत आहेत.

ठळक मुद्देम्हणावा तितका पाऊस न पडल्याने परिसरात चिंता व्यक्त

पाथरे : पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने झाले तरी सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पाथरे परिसरात समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी, ग्रामस्थ चिंतेत आहेत.पाथरे परिसरात सुरु वातीस पाऊस बरा पडला होता. त्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरण्या केल्या होत्या. परंतु आता पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मागील दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने चालू खरीप हंगाम धोक्यात आला आहे. सध्या या भागातील पिके ही करपली आहे. दररोज ढग येत आहेत. परंतू पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यातच सध्या थंड वारा सुटत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. वारेगाव, पाथरे बद्रुक, पाथरे खुर्द परिसरात साधारण १३०० एकर जमीन आहे. या भागात संपूर्ण पेरण्या झाल्या आहेत. शेतकºयांनी सोयाबीन, बाजरी, मका या पिकांची पेरणी केली आहे. काही ठिकणी ऊस, डाळिंबाच्या बागा, आहेत परंतु पुरेसा पाऊस नसल्याने ही पिके पाण्यावाचून करपू लागली आहे. पेरणीसाठी शेतकºयांनी हजारो रुपये खर्च केला आहे. आता मात्र पीक आणि पैसेही वाया जाणार यात शंका नाही. आता शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यासाठी त्यांना पुन्हा बी- बियाणे खरेदी करावी लागणार आहेत. अगोदरच उसनवारी, कर्ज, पदरमोड करून शेतकर्यांनी पेरणी केली होती. आता पुन्हा हा खर्च पेलणार नसल्याचे दिसते. त्यातच पावसाचे प्रमाण कमी होत आहे. शेतकºयांनी मका, बाजरी पीकांचा विमा काढला आहे. परंतु सोयाबीन पीक परिसरात मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा विमा मिळत नाही. पर्यायाने भरपाई मिळत नसल्याची खंत शेतकºयांनी व्यक्त केली. गेल्या आठवड्यापासून आभाळ भरून येत आहे. आभाळ घोंगावत आहे, पाऊस पडत नसल्याने शेतकर्यांना पेरणी वाया जाण्याची भीती सतावत आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकºयांबरोबर शेत मजुरांचीही अवस्था बिकट झाली आहे. शेतीची कामे मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी कमी होत आहे. असेच कायम राहिले तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. परिसरातील जांब नदी, गवळण नदी व नदीवरील बंधार्यांचे खोलीकरण व रु ंदीकरण कामे झाली आहे. परंतु पाऊसच नसल्याने यात पाणी साठा उपलब्द होऊ शकलेला नाही. हवामान खात्याने समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु म्हणावा तितका पाऊस न पडल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे.