शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर परिसरात पावसाअभावी शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 18:37 IST

राजापूर : जिल्ह्यात पावसाने जोरदार सुरु वात केली असली तरी तालूक्यातील राजापूर येथे पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरीही अजून वरूणराजाचे आगमन न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. येथील शेतकऱ्यांकडून दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.

राजापूर गावापासून पुर्वेकडील भागात असलेल्या वडपाटीकडील भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. बºयाच दिवसापासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्ग संकटात असून कधी दमदार पावसाची हजेरी लागेल, या चिंतेने शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. राजापूर येथे मागील वषीॅ दुष्काळी परिस्थिती भयानक असताना यावषीॅ अजूनही पावसाने दडी मारल्याने पेरण्या पावसाअभावी खोळंबून पडल्या होत्या. राजापूर येथे सध्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांना चारा या चिंतेने जनता हैराण झाली आहे. त्यामुळे राहिलेल्या खरीप हंगामातील पेरण्या शनिवारी रात्री झालेल्या रिमझिम पावसावर सुरू आहेत. राजापूर येथे आतापर्यंत केवळ रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला असून जोरदार पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे विहिरी या कोरड्याठाक पडल्या असून शेतकरी चिंतातूर झाले आहेत. काही दिवसापूर्वी अल्पशा पावसावर काही भागातील शेतक-यांनी मका, मुग, बाजरी, भुईमूग, कपाशी या पिकाच्या पेरण्या केल्या होत्या. आता त्या पिकांसाठी पावसाची गरज आहे. परिसरातील गावांना चांगल्याप्रकारे पाऊस झाला असून राजापूर येथील शेतक-यांना जोरदार पाऊसाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगामासाठी समाधानकारक पावसाची नितांत आवश्यकता असल्याने बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागून आहेत. गेल्या वषीॅ जुन महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या चार महिन्यातील तहान या गावाला टॅँकरवरच भागवावी लागते. मागील वषीॅदेखील शेतकरी वर्गाने केलेला खर्चही पावसाअभावी वसूल न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे यावषीॅ शेतकरी वर्गाकडे बी- बियाणे घेण्यासाठी पैसे नसून चारा व पाणीटंचाईने जनता हैराण झाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी