शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

राजापूर परिसरात पावसाअभावी शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 18:37 IST

राजापूर : जिल्ह्यात पावसाने जोरदार सुरु वात केली असली तरी तालूक्यातील राजापूर येथे पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरीही अजून वरूणराजाचे आगमन न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. येथील शेतकऱ्यांकडून दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.

राजापूर गावापासून पुर्वेकडील भागात असलेल्या वडपाटीकडील भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. बºयाच दिवसापासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्ग संकटात असून कधी दमदार पावसाची हजेरी लागेल, या चिंतेने शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. राजापूर येथे मागील वषीॅ दुष्काळी परिस्थिती भयानक असताना यावषीॅ अजूनही पावसाने दडी मारल्याने पेरण्या पावसाअभावी खोळंबून पडल्या होत्या. राजापूर येथे सध्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांना चारा या चिंतेने जनता हैराण झाली आहे. त्यामुळे राहिलेल्या खरीप हंगामातील पेरण्या शनिवारी रात्री झालेल्या रिमझिम पावसावर सुरू आहेत. राजापूर येथे आतापर्यंत केवळ रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला असून जोरदार पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे विहिरी या कोरड्याठाक पडल्या असून शेतकरी चिंतातूर झाले आहेत. काही दिवसापूर्वी अल्पशा पावसावर काही भागातील शेतक-यांनी मका, मुग, बाजरी, भुईमूग, कपाशी या पिकाच्या पेरण्या केल्या होत्या. आता त्या पिकांसाठी पावसाची गरज आहे. परिसरातील गावांना चांगल्याप्रकारे पाऊस झाला असून राजापूर येथील शेतक-यांना जोरदार पाऊसाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगामासाठी समाधानकारक पावसाची नितांत आवश्यकता असल्याने बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागून आहेत. गेल्या वषीॅ जुन महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या चार महिन्यातील तहान या गावाला टॅँकरवरच भागवावी लागते. मागील वषीॅदेखील शेतकरी वर्गाने केलेला खर्चही पावसाअभावी वसूल न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे यावषीॅ शेतकरी वर्गाकडे बी- बियाणे घेण्यासाठी पैसे नसून चारा व पाणीटंचाईने जनता हैराण झाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी