शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

शेतकरी आठवडे बाजार : ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद अवघ्या दोन तासांतच संपतो भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:20 IST

नाशिक : गेल्या १ डिसेंबरपासून सुरू झालेला शेतकरी आठवडे बाजार संकल्पनेला ग्राहकांनी उचलून धरले असून, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आठवडे बाजारात भाजीपाला हातोहात विकला जात आहे.

ठळक मुद्दे‘शेतकरी आठवडे बाजार’ थेट ग्राहकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध

नाशिक : गेल्या १ डिसेंबरपासून सुरू झालेला शेतकरी आठवडे बाजार संकल्पनेला ग्राहकांनी उचलून धरले असून, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आठवडे बाजारात भाजीपाला हातोहात विकला जात आहे. अवघ्या दोन अडीच तासांतच बाजार आटोपत असल्याने बाजारात दिवसेंदिवस गर्दी होऊ लागली आहे.राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांच्या संयुक्त प्रयत्नाने शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरविण्यात आला आहे. दर शुक्रवारी भरणाºया या बाजारात ग्राहकांना थेट शेतातील माल उपलब्ध होत असल्याने ग्राहकांच्या या बाजारावर उड्या पडत आहे. शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विनामध्यस्थ थेट ग्राहकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध झाला आहे. या संकल्पनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभल्याने अवघ्या चौथ्या बाजारातच शेतकºयांचा आठवडे बाजार शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. शुक्रवारी बाजाराचा अवघा चौथा दिवस होता. मात्र दोन-अडीच तासांतच बाजारातील संपूर्ण भाजीपाला माल विकला जात असल्याचा अनुभव शेतकºयांनी सांगितला. स्वस्त, ताजा आणि सेंद्रिय भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांची शेतकºयांच्या आठवडे बाजाराला गर्दी वाढली आहे. येथे केवळ शेतकºयांनाच शेतमाल विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच ११ ते २० शेतकºयांनी गट तयार करून पणन मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. याशिवाय पांजरपोळ कोणतेच शुल्क आकारणार नाही. या नोंदणीत आता वाढ झाली असून, विक्रेते शेतकºयांची संख्याही वाढली आहे.भरेकºयांचा त्रासव्यापाºयांची मध्यस्थी नसल्याने थेट शेतकरी ग्राहकांपर्यंत पोहचला असल्याने शेतमालाला ग्राहकांकडून चांगली मागणी होऊ लागली आहे. आठवडे बाजारात केवळ गट नोंदणीकृत शेतकरीच भाजीपाला विक्री करू शकत असल्याने ग्राहकांना चांगला भाजीपाला मिळू लागला आहे. परंतु या बाजाराला मिळणारा प्रतिसाद पाहून बाजाराच्या बाहेरच्या बाजूला भरेकरी दुकाने मांडू लागल्याने या भरेकºयांना मज्जाव करण्याचे काम पणन तसेच पांजरापोळच्या कर्मचाºयांना करावा लागत आहे. रस्त्यावर बसणाºया भरेकºयांना हटविण्यासाठी अतिक्रमण विभागाला तैनात करण्यात आले होते. भरेकरी रस्त्यावरच कचरा करीत असल्याने स्थानिक रहिवाशांकडून त्यांना विरोध होत आहे.