शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन बॅकिंग व्यवहारामुळे शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 18:37 IST

विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे यापुढे रोख न देता एनइएफटी, आरटीजीएस किंवा धनादेशाद्वारे देण्यात येणार असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे.

ठळक मुद्देडिजिटल इंडिया : वाहनाचे भाडे खिशातून द्यावे लागणार

खामखेडा : विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे यापुढे रोख न देता एनइएफटी, आरटीजीएस किंवा धनादेशाद्वारे देण्यात येणार असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे.केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया बॅँकिंग व्यवहार धोरणास चालना देण्यासाठी शासनाने १ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांना शेतमालाची विक्र ी केल्यानंतर विक्र ीचे पैसे रोख न देता ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आरटीजीएस, एनइएफटी किंवा चेकद्वारे देण्यात येणार आहे. त्यासाठी त्याला आता बॅँकेत खाते असणे आवश्यक आहे, कारण लिलावास माल आणताना सोबत आधारकार्ड व बॅँक पासबुक झेरॉक्स लागणार आहे. विक्र ी केलेल्या मालाचे पैसे रोख मिळणार नसल्याने वाहनाचे भाडे खिशातून द्यावे लागणार आहे.पन्नास टक्के शेतकºयांकडे आजही शेतमाल विक्र ीस नेण्यासाठी स्वत:चे वाहन नाही. तेव्हा त्यांना शेतमाल बाजार समितीत नेण्यासाठी भाड्याचे वाहन न्यावे लागते. शेतमाल विक्र ी झाल्यावर विक्र ी केलेल्या मालाचे पैसे हे व्यापारी वर्गाकडून रोख स्वरूपात दिले जात असे. त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टर, टेंपो किंवा इतर वाहनांचे भाडे देत असे. त्यामुळे वाहनभाड्याची चिंता राहत नसे; परंतु आता शासनाने यात बदल केल्याने शेतमाल विक्र ीस नेण्यासाठी लागणाºया वाहन भाड्याचे पैसे वाहनधारकास तर रोख द्यावे लागणार आहे. तेव्हा वाहन भाड्याने नेण्याआधी शेतकºयाला वाहनाचे भाड्याचे पैसे तयार ठेवावे लागणार आहे.यामागे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी शेतमाल विक्र ी करण्यासाठी वाहन भाड्याने घेऊन जातो आणि त्या वाहनांचे भाड्याचे पैसे शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर विक्र ी केलेल्या मालाचे पैसे रोख मिळत असे, त्यामुळे शेतकºयाला वाहन भाड्याची चिंता राहत नसे. तेव्हा शेतकरी त्या मिळालेल्या पैशातून वाहनांचे भाडे देत असे. तसेच पिकासाठी लागणारी खते, त्याच वाहनातून घरी आणत असे. आता शेतकºयाला शेतमाल बाजारात नेण्याआधी वाहनभाडे तयार ठेवावे लागणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीdigitalडिजिटलagricultureशेतीBanking Sectorबँकिंग क्षेत्र