शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

शेतकऱ्यांनी मेथी फेकली रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 22:28 IST

पाटोदा : शेतात उत्पादित केलेल्या कोणत्याच पिकास दर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. सध्या बाजारात विक्र ीसाठी नेलेल्या, ...

ठळक मुद्देबाजारभावाचा परिणाम : फुकटही कुणी घेईना; शेतकरी सापडले आर्थिक संकटात

पाटोदा : शेतात उत्पादित केलेल्या कोणत्याच पिकास दर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. सध्या बाजारात विक्र ीसाठी नेलेल्या, शेपू, पालक, मेथीच्या भाजीला कुणी फुकटही घेत नसल्याने शेतकऱ्यांनी मेथीच्या जुड्या रस्त्याच्या कडेला टाकून जनावरांना चारा म्हणून खाऊ घातल्या आहेत. मेथीपाठोपाठ कोथिंबिरीलाही दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.सध्या कांदा पिकास मिळत असलेला दर सोडला तर अन्य कोणत्याच पिकास भाव मिळत नसल्याने शेतकरीवर्गाने मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली, मात्र ज्या शेतकºयांकडे कांदा लागवडीसाठी कांदा रोपे शिल्लक नाही व रोपे उपलब्ध होण्याची शक्यता नाही अशा शेतकºयांनी मोठ्या आशेने भाजीपाला पिकाचे उत्पन्न घेतले, मात्र भाजीपाला पिकासही मातीमोल दर मिळत असल्याने शेतकºयांची अवस्था आगीतून निघून फुफाट्यात गेल्यासारखी झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून येवला तालुक्यातील शेतकºयांनी दुष्काळाशी सामना करून शेतीत आधुनिक प्रयोग करीत उत्पादन घेत आहे, मात्र गेल्या काही वर्षांपासून उत्पादित केलेल्या कोणत्याच पिकाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटांचा सामना करीत आहेत. मागील वर्षी पिकविलेला पोळ, रांगडा व उन्हाळ कांदा मातीमोल दरात विकला. त्यासाठी शेतकºयांनी एकरी सत्तर ते ऐंशी हजार रु पये खर्च केला, मात्र हातात काहीच पडले नाही. त्यामुळे शेतकºयांना लाखो रु पयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागला. अनेक शेतकºयांनी कांदा उकिरड्यावर तसेच जनावरांना खाऊ घातला. शेकडो क्विंटल कांदा हा खराब झाला, त्याचाही आर्थिक फटका शेतकºयांना बसला. यावर्षी झालेल्या परतीच्या पावसाने पोळ कांदा पूर्णत: खराब झाला आहे. एकरी फक्त दहा ते बारा क्विंटल उत्पन्न निघाले. अशाही परिस्थितीत शेतकरी वर्गाने या पिकात नाही तर दुसºया पिकात आपल्याला काही फायदा होईल या आशेवर आपल्या शेतामध्ये शेपू, पालक, मेथी यांसारख्या भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली, मात्र त्यांनाही कवडीमोल दरामुळे केलेला खर्चही न निघाल्याने अनेक शेतकºयांनी शेळ्या-मेंढ्या व जनावरांना खाद्य म्हणून हा भाजीपाला खाऊ घातलाल, तर कोथिंबिरीच्या मोठ्या जुडीला पन्नास ते साठ रु पये शेकडा दर मिळत आहे. तर मेथीची भाजी विकत तर सोडा कुणी फुकटही घेण्यास तयार नाही अशी वाईट अवस्था झाली असल्याने शेतकरीवर्ग पुन्हा संकटात सापडला आहे.कर्ज कसे फेडायचे?परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून वातावरणात मोठा बदल झाला असल्याने सर्वच पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकरी वर्गाने हजारो रु पये खर्च करून पिके घेतली, मात्र उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य दर मिळत नाही. पीक उभे करण्यासाठी हजारो रु पये खर्च करूनही उत्पन्नाची व खर्चाची मिळवणी होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. फवारणीचा खर्च कर्ज काढून करावा लागला असून, आता कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत.परतीच्या अवकाळी पावसाने खरीप हंगामाचे होत्याचे नव्हते केले. उधार उसनवार करून रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठी बियाणे टाकली. मात्र दाट धुके व दवामुळे दोन वेळेस रोप खराब झाल्याने कांदा लागवडीचा नाद सोडून दिला व शेतात भाजीपाला पिकाची लागवड केली. मात्र, सध्या भाजीपाला पिकास मातीमोल भाव मिळत असल्याने केलेल्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने तोटा होत आहे. त्यामुळे आता कोणती पिके घ्यावीत, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.- माधव शेळके, शेतकरी, ठाणगाव

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती