शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

शेतकऱ्यांनी मेथी फेकली रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 22:28 IST

पाटोदा : शेतात उत्पादित केलेल्या कोणत्याच पिकास दर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. सध्या बाजारात विक्र ीसाठी नेलेल्या, ...

ठळक मुद्देबाजारभावाचा परिणाम : फुकटही कुणी घेईना; शेतकरी सापडले आर्थिक संकटात

पाटोदा : शेतात उत्पादित केलेल्या कोणत्याच पिकास दर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. सध्या बाजारात विक्र ीसाठी नेलेल्या, शेपू, पालक, मेथीच्या भाजीला कुणी फुकटही घेत नसल्याने शेतकऱ्यांनी मेथीच्या जुड्या रस्त्याच्या कडेला टाकून जनावरांना चारा म्हणून खाऊ घातल्या आहेत. मेथीपाठोपाठ कोथिंबिरीलाही दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.सध्या कांदा पिकास मिळत असलेला दर सोडला तर अन्य कोणत्याच पिकास भाव मिळत नसल्याने शेतकरीवर्गाने मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली, मात्र ज्या शेतकºयांकडे कांदा लागवडीसाठी कांदा रोपे शिल्लक नाही व रोपे उपलब्ध होण्याची शक्यता नाही अशा शेतकºयांनी मोठ्या आशेने भाजीपाला पिकाचे उत्पन्न घेतले, मात्र भाजीपाला पिकासही मातीमोल दर मिळत असल्याने शेतकºयांची अवस्था आगीतून निघून फुफाट्यात गेल्यासारखी झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून येवला तालुक्यातील शेतकºयांनी दुष्काळाशी सामना करून शेतीत आधुनिक प्रयोग करीत उत्पादन घेत आहे, मात्र गेल्या काही वर्षांपासून उत्पादित केलेल्या कोणत्याच पिकाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटांचा सामना करीत आहेत. मागील वर्षी पिकविलेला पोळ, रांगडा व उन्हाळ कांदा मातीमोल दरात विकला. त्यासाठी शेतकºयांनी एकरी सत्तर ते ऐंशी हजार रु पये खर्च केला, मात्र हातात काहीच पडले नाही. त्यामुळे शेतकºयांना लाखो रु पयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागला. अनेक शेतकºयांनी कांदा उकिरड्यावर तसेच जनावरांना खाऊ घातला. शेकडो क्विंटल कांदा हा खराब झाला, त्याचाही आर्थिक फटका शेतकºयांना बसला. यावर्षी झालेल्या परतीच्या पावसाने पोळ कांदा पूर्णत: खराब झाला आहे. एकरी फक्त दहा ते बारा क्विंटल उत्पन्न निघाले. अशाही परिस्थितीत शेतकरी वर्गाने या पिकात नाही तर दुसºया पिकात आपल्याला काही फायदा होईल या आशेवर आपल्या शेतामध्ये शेपू, पालक, मेथी यांसारख्या भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली, मात्र त्यांनाही कवडीमोल दरामुळे केलेला खर्चही न निघाल्याने अनेक शेतकºयांनी शेळ्या-मेंढ्या व जनावरांना खाद्य म्हणून हा भाजीपाला खाऊ घातलाल, तर कोथिंबिरीच्या मोठ्या जुडीला पन्नास ते साठ रु पये शेकडा दर मिळत आहे. तर मेथीची भाजी विकत तर सोडा कुणी फुकटही घेण्यास तयार नाही अशी वाईट अवस्था झाली असल्याने शेतकरीवर्ग पुन्हा संकटात सापडला आहे.कर्ज कसे फेडायचे?परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून वातावरणात मोठा बदल झाला असल्याने सर्वच पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकरी वर्गाने हजारो रु पये खर्च करून पिके घेतली, मात्र उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य दर मिळत नाही. पीक उभे करण्यासाठी हजारो रु पये खर्च करूनही उत्पन्नाची व खर्चाची मिळवणी होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. फवारणीचा खर्च कर्ज काढून करावा लागला असून, आता कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत.परतीच्या अवकाळी पावसाने खरीप हंगामाचे होत्याचे नव्हते केले. उधार उसनवार करून रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठी बियाणे टाकली. मात्र दाट धुके व दवामुळे दोन वेळेस रोप खराब झाल्याने कांदा लागवडीचा नाद सोडून दिला व शेतात भाजीपाला पिकाची लागवड केली. मात्र, सध्या भाजीपाला पिकास मातीमोल भाव मिळत असल्याने केलेल्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने तोटा होत आहे. त्यामुळे आता कोणती पिके घ्यावीत, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.- माधव शेळके, शेतकरी, ठाणगाव

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती