शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

बाजार समितीच्या वादामुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 01:14 IST

नांदगाव : नांदगाव बाजार समितीने शेतकरीहितार्थ घेतलेला निर्णय व व्यापारी असोसिएशनची नकाराची पहिली घंटा हे जुने दुखणे आहे. मग ते आडत्या व खरेदीदार यांच्यातील संबंधांचा निर्णय असो की समितीच्या वजनकाट्याचा संदर्भ, त्यात वाद-विवाद होणे हे पाचवीलाच पुजलेले असते. त्यामुळे लिलाव बंद, बाजार बंद असे प्रकार उद्भवतात. बाजार समितीने चेक पेमेंटच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन रोखीने पेमेंट द्यावे असा निर्णय घेतला आणि एक आठवड्यापासून लिलाव बंद झाले. यात कोणाचा किती फायदा व तोटा याची गणिते मांडताना शेतकरी या व्यवस्थेतला दुबळा घटक ठरत असतो यात शंका घेण्याचे कारण नाही.

ठळक मुद्दे सभासदांना कर्तव्याची जाणीव करून दिली असंघटित शेतकरी हाच व्यवस्थेतला दुबळा घटक

नांदगाव : नांदगाव बाजार समितीने शेतकरीहितार्थ घेतलेला निर्णय व व्यापारी असोसिएशनची नकाराची पहिली घंटा हे जुने दुखणे आहे. मग ते आडत्या व खरेदीदार यांच्यातील संबंधांचा निर्णय असो की समितीच्या वजनकाट्याचा संदर्भ, त्यात वाद-विवाद होणे हे पाचवीलाच पुजलेले असते. त्यामुळे लिलाव बंद, बाजार बंद असे प्रकार उद्भवतात. बाजार समितीने चेक पेमेंटच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन रोखीने पेमेंट द्यावे असा निर्णय घेतला आणि एक आठवड्यापासून लिलाव बंद झाले. यात कोणाचा किती फायदा व तोटा याची गणिते मांडताना शेतकरी या व्यवस्थेतला दुबळा घटक ठरत असतो यात शंका घेण्याचे कारण नाही.व्यापारीहिताचा निर्णय जोपासण्याचे काम व्यापारी असोसिएशन नेहमीच करत असते व त्यांनी तसे करावे असे सभासदांना वाटत असते. असोसिएशनने हे करत असताना सभासदांना कर्तव्याची जाणीव करून दिली व त्याप्रमाणे कृती केली तर शेतकरी वर्गाचे व व्यापारी वर्गाचे पिढ्यान्पिढ्यांचे भावनिक व आर्थिक नाते तुटणार नाही. काही मोजक्या व्यापारी सभासदांमुळे असोसिएशनला ‘बोल’ लागतो. याची चर्चा खासगीमध्ये व्यापारी करत असतात. मात्र वाईटपणा कोणी घ्यायचा यामुळे असोसिएशनची पंचाईत होते.नोटाबंदीच्या आधी रोखीने व्यवहार सुरू होते. नंतर विवाद निर्माण झाले. त्यावर तोडगा म्हणून आॅनलाइन किंवा चेकने रक्कम अदा करावयाची असे ठरले. आॅनलाइन पेमेंट करण्यासाठी बँकांनी आडमुठे धोरण स्वीकारल्याने व आॅनलाइन पेमेंटसाठी व्यापारी वर्गाकडून सहकार्य मिळत नाही म्हणून धनादेशाचा पर्याय पुढे आला. त्यातून धनादेश न वटणे, नांदगाव शहरात नसलेल्या बाहेरगावच्या बँकांचे धनादेश देणे व त्यामुळे महिना- दीड महिना पेमेंट खात्यावर जमा न होणे अशा अनेक भानगडी तयार झाल्याने शेतकºयांची अडवणूक होऊ लागली व नांदगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाने व्यापाºयानी रोखीने पेमेंट अदा करावे असा पर्याय काढला. मात्र या निर्णयाला काही व्यापाºयांनी विरोध केला.भांडवल नसताना खरेदी करून मोठी उधारी निर्माण करणाºयांनी येथील मार्केट बिघडवले, अशी दबक्या आवाजातली चर्चा आहे.बाजार समितीच्या निर्णयासोबत शेतकरीशेतकरी बाजार समितीच्या निर्णयाला साथ देण्यास तयार आहेत; पण ते किती काळ थांबतील, असाही प्रश्न आहे. बदलत्या काळाबरोबर संदर्भ बदलत आहेत. गेल्या आठवड्यातल्या घडामोडींवर व्यापारी व शेतकरी यांच्यातले पारंपरिक संबंध कोणते वळण घेत आहे याची चर्चा सुरु झाली आहे. आता सर्वांचीच नवीन पिढी आली आहे. भावनिक जवळीक दूर जात असून, तू तू मै मै कडे वाटचाल होत आहे. धनादेश न वटल्यास रोख पैसे देताना तीन टक्के रक्कम कापून घेतली जाते आणि रोख रक्कम हवी असेल तर ५० रु . कमी भाव पुकारण्याचे धोरण कोणीतरी ठरवणार असेल तर या सगळ्यात असंघटित शेतकरी हाच व्यवस्थेतला दुबळा घटक का ठरतो आहे, असा प्रश्न आत्ममग्न करणारा आहे.