शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे लक्ष केंद्रित करावे, कृषी तंत्रज्ञान महोत्सवात प्रशांत नाईकवडी यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 17:38 IST

शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला जात असतानाच दुसरीकडे शेती व्यवसायाचा दर्जा खालावत चालला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जोपर्यंत शेतकरी शेतीकडे उद्योग म्हणून पाहणार नाही तोपर्यंत शेतीचा विकास साधला जाणार नाही. शेतीचा दर्जा आणि शेती उत्पादनातील गुणवत्ता उंचावण्याची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देशेती व्यवसायाचा दर्जा खालावत चालला असल्याचे चित्रशेतीचा दर्जा आणि शेती उत्पादनातील गुणवत्ता उंचावण्याची आवश्यकतायशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचा समारोप

नाशिक : शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला जात असतानाच दुसरीकडे शेती व्यवसायाचा दर्जा खालावत चालला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जोपर्यंत शेतकरी शेतीकडे उद्योग म्हणून पाहणार नाही तोपर्यंत शेतीचा विकास साधला जाणार नाही. शेतीचा दर्जा आणि शेती उत्पादनातील गुणवत्ता उंचावण्याची आवश्यकता असून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सेंद्रिय शेतीतज्ज्ञ डॉ. प्रशांत नाईकवडी यांनी केले.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रामार्फत आयोजित पाच दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचा समारोप शनिवारी(दि.9) झाला. यावेळी ह्यसेंद्रिय शेती : संधी, उत्पादन आणि प्रमाणीकरणह्ण विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन होते. डॉ. प्रशांत नाईकवडी म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा वापर करत आहेत. त्यामुळे भविष्यात या भागातील शेती नापीक होण्याची भीती आहे. सध्या अनेक तरुण शेतीकडे वळत आहेत. ही आनंदाची बाब असून देशात पुन्हा एकदा सेंद्रिय शेतीतून हरितक्रांती घडविण्यासाठी तरुणांनी पुढाकार द्यावा असे आवाहनही नाईकवडी यांनी केले. यावेळी कृषी यांत्रिकीकरणाच्या अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. तुळशीदास बस्तेवाड यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी यांत्रिकीकरणामुळे व्यवसायात मनुष्यबळाच्या समस्येवर मात करणो शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. कृषि विभागातील अधिकारी, शेतकरी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक रावसाहेब पाटील यांनी केले.डॉ. नितीन ठोके यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. राजाराम पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :agricultureशेतीtechnologyतंत्रज्ञानuniversityविद्यापीठ