शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे लक्ष केंद्रित करावे, कृषी तंत्रज्ञान महोत्सवात प्रशांत नाईकवडी यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 17:38 IST

शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला जात असतानाच दुसरीकडे शेती व्यवसायाचा दर्जा खालावत चालला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जोपर्यंत शेतकरी शेतीकडे उद्योग म्हणून पाहणार नाही तोपर्यंत शेतीचा विकास साधला जाणार नाही. शेतीचा दर्जा आणि शेती उत्पादनातील गुणवत्ता उंचावण्याची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देशेती व्यवसायाचा दर्जा खालावत चालला असल्याचे चित्रशेतीचा दर्जा आणि शेती उत्पादनातील गुणवत्ता उंचावण्याची आवश्यकतायशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचा समारोप

नाशिक : शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला जात असतानाच दुसरीकडे शेती व्यवसायाचा दर्जा खालावत चालला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जोपर्यंत शेतकरी शेतीकडे उद्योग म्हणून पाहणार नाही तोपर्यंत शेतीचा विकास साधला जाणार नाही. शेतीचा दर्जा आणि शेती उत्पादनातील गुणवत्ता उंचावण्याची आवश्यकता असून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सेंद्रिय शेतीतज्ज्ञ डॉ. प्रशांत नाईकवडी यांनी केले.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रामार्फत आयोजित पाच दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचा समारोप शनिवारी(दि.9) झाला. यावेळी ह्यसेंद्रिय शेती : संधी, उत्पादन आणि प्रमाणीकरणह्ण विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन होते. डॉ. प्रशांत नाईकवडी म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा वापर करत आहेत. त्यामुळे भविष्यात या भागातील शेती नापीक होण्याची भीती आहे. सध्या अनेक तरुण शेतीकडे वळत आहेत. ही आनंदाची बाब असून देशात पुन्हा एकदा सेंद्रिय शेतीतून हरितक्रांती घडविण्यासाठी तरुणांनी पुढाकार द्यावा असे आवाहनही नाईकवडी यांनी केले. यावेळी कृषी यांत्रिकीकरणाच्या अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. तुळशीदास बस्तेवाड यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी यांत्रिकीकरणामुळे व्यवसायात मनुष्यबळाच्या समस्येवर मात करणो शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. कृषि विभागातील अधिकारी, शेतकरी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक रावसाहेब पाटील यांनी केले.डॉ. नितीन ठोके यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. राजाराम पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :agricultureशेतीtechnologyतंत्रज्ञानuniversityविद्यापीठ