शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

शेतकरी धुक्यामुळे हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:33 IST

येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात दोन दिवसांपासून दाट धुके पडत असल्याने व थंडगार हवेने शेतकरी हवालदिल झाले असून, पिके वाचविण्यासाठी महागडी कीटकनाशक व खते आणून कसरत करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे पिकांसह नागरिकांनाही साथीच्या आजारांनी ग्रासल्याने आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर हरबरा, उन्हाळ कांदे रोपे व भाजीपाला पिकांची धुक्यामुळे पार वाट लागणार असल्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देबदलत्या हमामानामुळे पिके वाचविण्यासाठी कसरत

नगरसूल : येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात दोन दिवसांपासून दाट धुके पडत असल्याने व थंडगार हवेने शेतकरी हवालदिल झाले असून, पिके वाचविण्यासाठी महागडी कीटकनाशक व खते आणून कसरत करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे पिकांसह नागरिकांनाही साथीच्या आजारांनी ग्रासल्याने आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर हरबरा, उन्हाळ कांदे रोपे व भाजीपाला पिकांची धुक्यामुळे पार वाट लागणार असल्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.परतीच्या पावसाने विहिरीत बर्यापैकी पाणी आले. पण पाणी देण्यासाठी विजेचा प्रश्न, कापूस वेचणीला मजुरांची टंचाई, रात्रीच्या वेळी वीज देण्यात येत असल्याने अंधारात पिकांना पाणी द्यावे कसे अशा अनेक अडचणींना सामोरे जात शेतकर्यांनी गहू, हरबरा या मुख्य पिकासोबत भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर केली. हिवाळ्याचे जवळपास तीन महिने होत आले तरी थंडी नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. त्यातच दोन दिवसांपासून दाट धुके पडत असल्याने सर्वच पिकांना त्याचा फटका बसणार आहे. हिरवी मिरची, वांगे, कांदे, टमाटे, गहू, हरबरा पिकांना कसे वाचवावे याच्या चिंंतेत शेतकरी पडला आहे.संकटांची मालिका सुरूचअतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची शासन मदत अद्यापही पदरात पडली नसताना आता नवीन अस्मानी संकटाची भर पडली असल्याचे येथील शेतकरी नानासाहेब आहेर यांनी सांगितले. तर उशिरा पेरणी झालेला गहू व हरबरा कांदे रोपे या पिकांना धक्याचा थेट परिणाम दिसणार असल्याचे गारखेडा येथील शेतकरी नानासाहेब आहेर यांनी सांगितले. एकूण संकटांची ही मालिका संपण्याचं नावं घ्यायला तयार नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला जाणार की काय याची धास्ती शेतकर्यांनी घेतली आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीagricultureशेती