शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

शेतकरी धुक्यामुळे हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:33 IST

येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात दोन दिवसांपासून दाट धुके पडत असल्याने व थंडगार हवेने शेतकरी हवालदिल झाले असून, पिके वाचविण्यासाठी महागडी कीटकनाशक व खते आणून कसरत करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे पिकांसह नागरिकांनाही साथीच्या आजारांनी ग्रासल्याने आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर हरबरा, उन्हाळ कांदे रोपे व भाजीपाला पिकांची धुक्यामुळे पार वाट लागणार असल्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देबदलत्या हमामानामुळे पिके वाचविण्यासाठी कसरत

नगरसूल : येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात दोन दिवसांपासून दाट धुके पडत असल्याने व थंडगार हवेने शेतकरी हवालदिल झाले असून, पिके वाचविण्यासाठी महागडी कीटकनाशक व खते आणून कसरत करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे पिकांसह नागरिकांनाही साथीच्या आजारांनी ग्रासल्याने आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर हरबरा, उन्हाळ कांदे रोपे व भाजीपाला पिकांची धुक्यामुळे पार वाट लागणार असल्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.परतीच्या पावसाने विहिरीत बर्यापैकी पाणी आले. पण पाणी देण्यासाठी विजेचा प्रश्न, कापूस वेचणीला मजुरांची टंचाई, रात्रीच्या वेळी वीज देण्यात येत असल्याने अंधारात पिकांना पाणी द्यावे कसे अशा अनेक अडचणींना सामोरे जात शेतकर्यांनी गहू, हरबरा या मुख्य पिकासोबत भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर केली. हिवाळ्याचे जवळपास तीन महिने होत आले तरी थंडी नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. त्यातच दोन दिवसांपासून दाट धुके पडत असल्याने सर्वच पिकांना त्याचा फटका बसणार आहे. हिरवी मिरची, वांगे, कांदे, टमाटे, गहू, हरबरा पिकांना कसे वाचवावे याच्या चिंंतेत शेतकरी पडला आहे.संकटांची मालिका सुरूचअतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची शासन मदत अद्यापही पदरात पडली नसताना आता नवीन अस्मानी संकटाची भर पडली असल्याचे येथील शेतकरी नानासाहेब आहेर यांनी सांगितले. तर उशिरा पेरणी झालेला गहू व हरबरा कांदे रोपे या पिकांना धक्याचा थेट परिणाम दिसणार असल्याचे गारखेडा येथील शेतकरी नानासाहेब आहेर यांनी सांगितले. एकूण संकटांची ही मालिका संपण्याचं नावं घ्यायला तयार नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला जाणार की काय याची धास्ती शेतकर्यांनी घेतली आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीagricultureशेती