शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
5
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
6
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
7
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
8
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
9
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
10
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
11
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
12
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
13
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
14
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
15
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
16
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
17
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
18
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
19
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
20
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा

आमदारांच्या घरासमोर शेतकऱ्यांचा सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:27 IST

शेतकयांना कायद्याने संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी व शेतमालास उत्पादन खर्र्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, अशी देशभरातील शेतकºयांची मागणी आहे. यासंदर्भात केंद्रीय पातळीवर चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष संसदीय आधिवेशन बोलाविण्यात यावे यासाठी राज्यातील आमदारांनी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा या मागणीसाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने शुक्रवारी (दि. २५) सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर सत्याग्रह करून त्यांना निवेदने दिली.

नाशिक : शेतकयांना कायद्याने संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी व शेतमालास उत्पादन खर्र्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, अशी देशभरातील शेतकºयांची मागणी आहे. यासंदर्भात केंद्रीय पातळीवर चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष संसदीय आधिवेशन बोलाविण्यात यावे यासाठी राज्यातील आमदारांनी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा या मागणीसाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने शुक्रवारी (दि. २५) सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर सत्याग्रह करून त्यांना निवेदने दिली.नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने सत्ताधारी भाजपाचे शहरातील आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे व बाळासाहेब सानप यांच्यासह शिवसेनेचे योगेश घोलप यांच्या घरासमोर ढोल वाजवून सत्याग्रह आंदोलन केले. आमदारांनी शेतकºयांच्या समस्यांवर विधिमंडळात चर्चा करून समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करावी. तसेच शेतकºयांच्या समस्या  सोडविण्यासाठी मांडण्यात येणारी विधेयके सादर करण्यासाठी तसेच त्यावर सविस्तर चर्चा घडवून आणण्यासाठी केंद्र स्तरावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. दरम्यान, भाजपाच्या तिन्ही आमदारांनी आंदोलकांना सामोरे जाऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले.शिवसेनेचे आमदार योगेश घोलप शहरात नसल्याने त्यांच्या स्वीय सहायकांनी निवेदन स्वीकारले. शेतकरी आंदोलन समितीने नाशिक जिल्ह्णातील सर्व आमदारांच्या घरासमोर आंदोलन करून मागण्यांचे निवेदन दिल्यामुळे गेल्या वर्षी १ जून रोजी झालेल्या राज्यव्यापी शेतकरी संपाची तीव्रता पुन्हा एकदा जाणवू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.रविवारी पालकमंत्र्यांना निवेदन देणारशेतक ºयांच्या मागण्यांसंदर्भात बुधवारी जिल्ह्णातील आमदारांना निवेदन दिल्यानंतर रविवारी (दि.२७) जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना अशाच प्रकारे निवेदन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे व दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याही घरासमोर सत्याग्रह करून निवेदन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील काही भागाचे प्रतिनिधित्व करणारे तथा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रतिनिधी केंद्रीय संरक्षणमंत्री सुभाष भामरे यांनाही मागण्यांचे निवेदन देण्याचे आंदोलन समितीचे नियोजन असून, येत्या १ जूनला नाशिक शहरात गतवर्षाच्या किसान क्रांती मोर्चाच्या शेतकरी संपाची दाहकता जागवणारा मोर्चाही काढण्यात येणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMLAआमदार