शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

पालखेडच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे निवेदन

By admin | Updated: February 22, 2017 23:30 IST

येवला : आवर्तनातून चारीवरील पाणीवापर संस्थांना पाणी देण्याची मागणी

येवला : पालखेडच्या दुसऱ्या आवर्तनात चारी क्रमांक ३८ व ३९ वरील पाणीवापर संस्था व शेतकऱ्यांना पाण्याचा कोटा मिळाला नसल्याने सदरचा कोटा मिळावा, असे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने पालखेड कार्यालयाचे लिपिक डी.व्ही. शेवाळे यांच्याकडे देण्यात आले. दुसरे आवर्तन चालू झाल्यानंतर चारी क्र. ३८ ते ४५ पर्यंतच्या सर्व चाऱ्या या एकत्रित चालू होतात. पाटाचे पाणी डोंगळे टाकून उचलले जात असल्याने पाणी कमी प्रमाणात होते. त्यामुळे चारी क्रमांक ३८  व ३९ या बंद ठेवण्यात आल्या  होत्या. ज्यावेळी चारीला पाणी सोडण्यात आले, तेव्हा ते कमी प्रमाणात चालू होते. त्यात चारीच्या मुखाशी काही शेतकऱ्यांनी बांध फोडल्याने थोडे फार सुरू असणारे पाणी बंद झाले. यामुळे काही भागात चारी ओलीदेखील झाली नाही.  पाणी सोडल्यानंतर पालखेड विभागाचे कोणीही अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने पाण्याचे नियोजन व्यवस्थित होत नाही त्यामुळे पाणी चोरीला जात असल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. त्यामुळे सदर हक्काचे पाणी तत्काळ मिळावे अन्यथा उपोषणास बसण्याचा निर्णय संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.  निवेदन देते वेळी रंगनाथ भोरकडे, राजेंद्र वाणी, जयराम  मोरे, संदीप खैरनार, दादासाहेब तनपुरे, अशोक शिंदे, यशवंतराव शिंदे, संजय शिंदे, शंकरराव कदम, अमोल शिंदे, राजेंद्र काळे, ज्ञानेश्वर कटके, श्रावण बेंडके, दीपक गायकवाड, माधव देशपांडे, भय्यासाहेब शिंदे, काकासाहेब शिंदे, शरद शिंदे आदिंसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)