शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाइपलाइनला शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:48 IST

अंदरसूल : जोपर्यंत व्हॅल्युएशनप्रमाणे संपूर्ण शेतकऱ्यांना त्यांच्या स्थावर मालमत्तेचा योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इंडियन आॅइल कंपनीच्या पाइपलाइनचे काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा अंदरसूल परिसरातील शेतकऱ्यांनी येवला तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : पूर्वसूचना न देता काम सुरू केल्याचा आरोप

अंदरसूल : जोपर्यंत व्हॅल्युएशनप्रमाणे संपूर्ण शेतकऱ्यांना त्यांच्या स्थावर मालमत्तेचा योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इंडियन आॅइल कंपनीच्या पाइपलाइनचे काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा अंदरसूल परिसरातील शेतकऱ्यांनी येवला तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.गुजरातच्या कोयली रिफायनरीतून अहमदनगर सोलापूर येथे पेट्रोलियम पदार्थ वाहून नेण्यासाठी इंडियन आॅइल कंपनीतर्फे भूमिगत पाइपलाइन टाकली जात असून, यासाठी शेतकºयांच्या शेतजमिनी भूसंपादन केल्या जात आहे. ७५० किमीच्या पाइपलाइन प्रकल्पासाठी सण १९६२ च्या जमीन वापर हक्काबाबत कलम ६ (१) व ४ (२)अन्वये भूसंपादन करण्यासाठी दि. १८ सप्टेंबर २०१७ रोजी नोटीस काढून मनमाड येथील अधिकाºयांच्या कार्यालयातर्फे हरकत अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर येवला येथील तहसील कार्यालयात शेतकºयांना बोलावून मनमानी पद्धतीने अर्ज निकाली काढण्यात येऊन जमिनीचा व शेतमाल नुकसानीचा योग्य दर देऊ असे आश्वासन अधिकाºयांनी दिले होते; मात्र इंडियन आॅइल कर्मचाºयांनी पूर्वसूचना न देता काम सुरू केले. शेतकºयांनी सुपीक जमीन निकामी होणार असल्याने त्या जमिनीचा मोबदला किती, त्या क्षेत्रात असणाºया पिकांचा मोबदला किती व कधी देणार? याविषयी विचारणा केली; मात्र संबंधित अधिकाºयांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी येवला तहसीलदारांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला.जमिनीचा व असलेल्या पिकाचा दर सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे शेतकºयांनी याबाबत आक्षेप घेतला आहे. भूसंपादन करताना कृषी अधिकारी, तलाठी सुद्धा सोबत नाही, मालमत्तेचा दर किती व कसा आहे हे कोणत्याच शेतकºयांना माहीत नसताना कर्मचारी चुकीची आकडेवारी सांगून शेतकºयांना लुबाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. अशा कर्मचाºयांची त्वरित दखल घेऊन शेतकºयांना योग्य तो मोबदला मिळण्यासाठी संबंधित अधिकाºयांना सूचित करावे यासाठी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले यांच्यासह अंदरसूल येथील शेतकरी, पुंडलिक जानराव, अनिल वलटे, महादू पुंड, तुळशीराम मेहतर, सदाशिव सोनवणे, रवींद्र बनकर, अरु ण जगताप, राजेंद्र सोनवणे, बोकटेचे उपसरपंच प्रताप दाभाडे आदींनी तहसीलदार रोहिदास वारूळे यांना निवेदन दिले. एकत्र कुटुंबात कलह होण्याची शक्यता१८ मीटर रु ंद व दीड मीटर खोली केल्यास शेतजमिनीतील मुरूम वरती येऊन सुपीक जमीन तीन ते पाच वर्ष नापीक होणार आहे. त्यामुळे या जमिनीत पिकांचे उत्पादन शून्य होणार आहे. त्यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. याशिवाय एकत्र कुटुंबात जमीन वाटपाच्यावेळी या क्षेत्रातून कुटुंबात कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय या क्षेत्रात शेतकºयांना घर बांधणे, फळबागा, शेततळे, विहिरी, बोअरवेल घेण्यास शासनाकडून निर्बंध करण्यात आले आहेत.