शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

रेल्वे प्रकल्पास जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 22:52 IST

नांदूरवैद्य : प्रस्तावित रेल्वे प्रकल्पास शेतकºयांनी विरोध केला असून, सरकारच्या जमीन अधिग्रहण कायद्यानुसार ८० टक्के शेतकºयांचा जमीन देण्यासाठी विरोध असल्यास सरकारने जमिनी घेऊच नये, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ मुसळे यांनी केले.

ठळक मुद्देएल्गार : नांदूरवैद्य येथे शेतकºयांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरवैद्य : प्रस्तावित रेल्वे प्रकल्पास शेतकºयांनी विरोध केला असून, सरकारच्या जमीन अधिग्रहण कायद्यानुसार ८० टक्के शेतकºयांचा जमीन देण्यासाठी विरोध असल्यास सरकारने जमिनी घेऊच नये, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ मुसळे यांनी केले.इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, कुºहेगाव, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख, मुकणे आदींसह विविध गावची शेकडो हेक्टर जमीन केंद्र सरकारच्या रेल्वे विभागामार्फत मालधक्का, लोकल लाइन, मनमाड-इगतपुरी नवीन रेल्वे लाइन प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली असून, या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे मंगळवारी दुपारी बाधित शेतकºयांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वच शेतकºयांनी या प्रकल्पास विरोध करण्याची भूमिका घेतली.यावेळी घोटी बाजार समितीचे माजी सभापती राजाराम धोंगडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, पाडळी देशमुख सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळसाहेब आमले, गोंदे दुमालाचे सरपंच शरद सोनवणे, माजी सरपंच गणपत जाधव, कुºहेगाव सरपंच भाऊसाहेब धोंगडे, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पागेरे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विक्रम पासलकर, विजय नाठे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पाच्या पोटी सरकारने कितीही पैसा दिला तरी तो फक्त काही दिवसांचा सोबती असतो म्हणून आपली मायभूमी सहजासहजी बळी पडून सरकारला देऊ नये, असे आवाहन पंचायत समिती माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी केले, तर विक्रम पासलकर, गणेश मुसळे, बाळासाहेब आमले, गणपत दिवटे, वामन काजळे, राजू रोकडे आदींनी जोरदार विरोध करत शेतकºयांच्या पाठीशी ठाम उभे राहू, असे सांगितले. प्रास्ताविक संपत मुसळे यांनी केले. आभार दत्तू दिवटे यांनी मानले.या बैठकीस माजी सरपंच मोहन यंदे, संपत मुसळे, पुंडलिक मुसळे, हरिभाऊ गुळवे, दत्तू दिवटे, मोहन करंजकर, बाबू धोंगडे, सुखदेव दिवटे, पोलीसपाटील ज्ञानेश्वर धोंगडे, शिवाजी मुसळे, भाऊसाहेब मुसळे, केशव काजळे, बाळासाहेब यंदे, रवि काजळे, नामदेव धोंगडे, भिवाजी धोंगडे आदींसह शेकडो बाधित शेतकरी उपस्थित होते.शेतकºयांना माहितीने नसल्याने अडचणशेतावर माहिती घेण्यासाठी आलेल्या या कामगारांकडून वरिष्ठ पातळीवर कुठलीही माहिती विचारली असता दिली जात नाही. म्हणून पुढील रणनीती ठरविण्यासाठी आज शेतकरी एकत्र आले होते. येत्या गुरु वारी (दि. ६) शेतकºयांचे शिष्टमंडळ खासदार हेमंत गोडसे आणि जिल्हाधिकारी यांचीभेट घेणार आहे. या बैठकीत नांदूरवैद्यचे सरपंच अ‍ॅड. चंद्रसेन रोकडे यांनी कायदेशीर लढा देऊ, असे सांगितले तर गोंदे दुमाला सरपंच शरद सोनवणे यांनी प्रसंगी मोठा लढा देण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे म्हटले. कुºहेगावचे सरपंच भाऊसाहेब धोंगडे यांनी खासदार हेमंत गोडसे व जिल्हाधिकारी सुरज मांढरे, यांच्याकडे शेतकºयांचे शिष्टमंडळ घेऊन जाऊ, असे सांगत शेतकºयांनी संघटित व्हावे, असे सांगितले.