शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

शेतकऱ्यांची झोळी रिकामीच

By admin | Updated: March 5, 2017 00:56 IST

येवला : येथील अंदरसूल उपबाजारात स्थापने पासूनच्या ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच जानेवारी आणि फेब्रुवारी २०१७ या दोन महिन्यात तब्बल १५ लाख १५ हजार ३४९ क्विंटल कांद्याची आवक झाली.

येवला : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व अंदरसूल उपबाजारात स्थापने पासूनच्या ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच जानेवारी आणि फेब्रुवारी २०१७ या दोन महिन्यात तब्बल १५ लाख १५ हजार ३४९ क्विंटल कांद्याची आवक झाली. या दोन महिन्यात कांद्याला सरासरी केवळ ४६० ते ५६० रु पये प्रती क्विंटल भाव मिळाला असला तरी सुमारे ७८ कोटी रु पयांचा व्यवहार झाला. कांदा आणि भाजीपाला कवडीमोल भावाने शहरवासीयांना मिळाला असला तरी, शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा पडली असल्याचा सूर सर्वत्र व्यक्त होत आहे.गेल्या २ ते ३ वर्षापासून दुष्काळाला सामोरे जात असलेला येवला तालुका गेल्या वर्षातील पर्जन्यमानाने सरासरी हजेरी लावल्याने शेतकरी काहीसा सुखावला होता. पिकांनाही पोषक वातावरण मिळाले, रोगराई पासून पिके वाचली. बाजरी, सोयाबीन,मका परवडत नसल्याने ,खरीप आणि रब्बीत नगदीपिक म्हणून शेतकरी कांद्याकडे वळाले. एकरी खर्च ५० ते ५५ हजार झाला. यंदा कांद्याचे विक्र मी उत्पन्न झाले. कांद्याला किमान १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळण्याची अशा असतांना कांद्याचा उत्पादन खर्चदेखील फिटला नाही. येवला बाजार समितीची स्थापना १९५७ मध्ये झाली. त्यानंतर तब्बल ६० वर्षांनी कागदोपत्री विक्र मी उत्पादनाने सुमारे ७८ कोटींचा व्यवहार दिसत असला तरी, शेतकऱ्याच्या पदरात निराशेशिवाय काहीच पडले नाही. शेतकऱ्याचा कांदा मार्केटला येण्याची वेळ असताना नोटबंदीचा निर्णय झाला. अनंत अडचणींना सामोरे जात असतांना शेतकऱ्याने संयम दाखवला.सध्या येवला व अंदरसूल उपबाजार आवार कांद्याने फुलून गेला आहे. कांद्याचे लिलाव रात्री ७ वाजेपर्यंत चालत आहेत.(वार्ताहर)बाजार समितीचे सचिव डी. सी. खैरनार, कैलास व्यापारे, बंडू आहेर, संजय ठोक, रवींद्र बोडके, अनिल कांगणे, सिद्धेश्वर जाधव, यांच्यासह कर्मचारी मेहनत घेत आहेत.