शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

शेतकऱ्यांची झोळी रिकामीच

By admin | Updated: March 5, 2017 00:56 IST

येवला : येथील अंदरसूल उपबाजारात स्थापने पासूनच्या ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच जानेवारी आणि फेब्रुवारी २०१७ या दोन महिन्यात तब्बल १५ लाख १५ हजार ३४९ क्विंटल कांद्याची आवक झाली.

येवला : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व अंदरसूल उपबाजारात स्थापने पासूनच्या ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच जानेवारी आणि फेब्रुवारी २०१७ या दोन महिन्यात तब्बल १५ लाख १५ हजार ३४९ क्विंटल कांद्याची आवक झाली. या दोन महिन्यात कांद्याला सरासरी केवळ ४६० ते ५६० रु पये प्रती क्विंटल भाव मिळाला असला तरी सुमारे ७८ कोटी रु पयांचा व्यवहार झाला. कांदा आणि भाजीपाला कवडीमोल भावाने शहरवासीयांना मिळाला असला तरी, शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा पडली असल्याचा सूर सर्वत्र व्यक्त होत आहे.गेल्या २ ते ३ वर्षापासून दुष्काळाला सामोरे जात असलेला येवला तालुका गेल्या वर्षातील पर्जन्यमानाने सरासरी हजेरी लावल्याने शेतकरी काहीसा सुखावला होता. पिकांनाही पोषक वातावरण मिळाले, रोगराई पासून पिके वाचली. बाजरी, सोयाबीन,मका परवडत नसल्याने ,खरीप आणि रब्बीत नगदीपिक म्हणून शेतकरी कांद्याकडे वळाले. एकरी खर्च ५० ते ५५ हजार झाला. यंदा कांद्याचे विक्र मी उत्पन्न झाले. कांद्याला किमान १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळण्याची अशा असतांना कांद्याचा उत्पादन खर्चदेखील फिटला नाही. येवला बाजार समितीची स्थापना १९५७ मध्ये झाली. त्यानंतर तब्बल ६० वर्षांनी कागदोपत्री विक्र मी उत्पादनाने सुमारे ७८ कोटींचा व्यवहार दिसत असला तरी, शेतकऱ्याच्या पदरात निराशेशिवाय काहीच पडले नाही. शेतकऱ्याचा कांदा मार्केटला येण्याची वेळ असताना नोटबंदीचा निर्णय झाला. अनंत अडचणींना सामोरे जात असतांना शेतकऱ्याने संयम दाखवला.सध्या येवला व अंदरसूल उपबाजार आवार कांद्याने फुलून गेला आहे. कांद्याचे लिलाव रात्री ७ वाजेपर्यंत चालत आहेत.(वार्ताहर)बाजार समितीचे सचिव डी. सी. खैरनार, कैलास व्यापारे, बंडू आहेर, संजय ठोक, रवींद्र बोडके, अनिल कांगणे, सिद्धेश्वर जाधव, यांच्यासह कर्मचारी मेहनत घेत आहेत.