शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

हरित क्षेत्र विकासाला शेतकऱ्यांचा विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 01:26 IST

स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद शिवारात नियोजित हरित क्षेत्र विकास योजना राबवण्यासाठी महासभेवर ठेवलेला प्रस्ताव रद्द करण्यात यावा, असा ठराव मखमलाबाद येथील शेतकºयांच्या बैठकीत करण्यात येऊन ग्रामस्थांनी विरोध कायम दर्शविला आहे.

पंचवटी : स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद शिवारात नियोजित हरित क्षेत्र विकास योजना राबवण्यासाठी महासभेवर ठेवलेला प्रस्ताव रद्द करण्यात यावा, असा ठराव मखमलाबाद येथील शेतकºयांच्या बैठकीत करण्यात येऊन ग्रामस्थांनी विरोध कायम दर्शविला आहे. ठराव रद्द करण्यासंदर्भात महापौर रंजना भानसी यांच्याकडे मागणी करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. दरम्यान, प्रस्ताव रद्द झाल्यानंतर करण्यात येणाºया सर्वेक्षणानंतरच शेतकºयाचे हित लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही बैठकीत ठरविण्यात आले.स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथील नियोजित हरित क्षेत्र विकास सर्वेक्षणास शेतकºयांनी विरोध दर्शवून काम हाणून पाडले होते. या विषयावर चर्चा करण्यासाठी रविवारी शेतकºयांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत स्मार्ट सिटी अंतर्गत साडेसातशे एकर क्षेत्रावर राबविण्यात येणाºया प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात येऊन प्रकल्प राबविल्यास त्याचा शेतकºयांना काय फायदा तसेच तोटा होईल, याबाबत मते-मतांतरे मांडण्यात आली. अंतिम प्रस्ताव प्रशासन सादर करेल त्यानंतरच या प्रकल्पाला मान्यता द्यावी किंवा नाही याबाबत शेतकरी निर्णय घेणार आहेत, असा सूर हनुमानवाडीतील धनदाई लॉन्स येथे रविवारी (दि.२०) झालेल्या शेतकºयांच्या बैठकीत निघाला.जमिनी दिलेल्या शेतकºयांना ५० टक्के जमिनी परत मिळणार असल्या तरी कर भरावा लागणार आहे. नाशिक शहराचा विकास झालेला नव्हता त्यावेळी अशा प्रकारच्या योजना राबविण्यास हरकत नव्हती मात्र आता नाशिकचा विकास झाला आहे. शहराच्या मध्यवस्तीत प्रकल्प राबविला जाणार असला तरी तो अयोग्य आहे.७०० एकरांमध्ये स्मार्टनगरचे नियोजनस्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या वतीने मखलबाद-नाशिक शिवारात एकूण सातशे एकरमध्ये नियोजनबद्ध स्मार्टनगर वसविण्यात येणार आहे. त्यासाठी नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविली जाणार आहे. या प्रस्तावाला मुळातच परिसरातील शेतकºयांचा विरोध आहे.स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या वतीने मखमलाबाद नाशिक शिवारात स्मार्टनगर बसविण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी टीपी स्कीम राबविली जाणार असून, त्यास शेतकºयांचा विरोध आहे. मात्र यासंदर्भात शेतकºयांमध्ये असलेल्या मतप्रवाहाचीदेखील चर्चा आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSmart Cityस्मार्ट सिटी