शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 02:10 IST

केंद्र सरकारने आणलेल्या नवीन तीनही कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या २५ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ३६ शेतकऱ्यांचे बळी गेले असतानाही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे केंद्रातील सरकारने हे कायदे शेतकऱ्यांच्या नव्हे तर उद्योगपतींसह परदेशी भांडवलदारांच्या फायद्यासाठी आणल्याचा आरोप करीत महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी (दि. २१) नाशिकहून राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली.

ठळक मुद्दे दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा : मोदी, शहांच्या पोस्टरचे दहन

नाशिक : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन तीनही कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या २५ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ३६ शेतकऱ्यांचे बळी गेले असतानाही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे केंद्रातील सरकारने हे कायदे शेतकऱ्यांच्या नव्हे तर उद्योगपतींसह परदेशी भांडवलदारांच्या फायद्यासाठी आणल्याचा आरोप करीत महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी (दि. २१) नाशिकहून राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली.

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात राज्यभरातील हजारो शेतकरी सोमवारी नाशिकमधील गोल्फ क्लब मैदानावर जमत इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह उद्योजक, भांडवलदारशाही विरोधातही घोषणाबाजी करीत मोदी व शाह यांच्या पोस्टरचे दहन करण्यात आले. यात सोलापूर, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर, महाड, मुंबई ठाणे यासह विविध जिल्ह्यांतून सुमारे ३ हजार शेतकरी व कामगारांनी सहभाग नोंदवला. या शेतकऱ्यांनी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे यांच्या नेतृत्वात आणि केरळचे खासदार के. के. रागेश यांच्या प्रमुख उपस्थित दिल्लीकडे प्रस्थान केले. यावेळी आमदार जयंत पाटील, माजी आमदार नरसय्या आडम, माजी आमदार जे, पी. गावीत, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डी. एल. कराड, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसान गुज्जर, सचिव अजित नवले, राजू देसले, सुनील मालुसरे आदी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

इन्फो-

पहिला मुक्काम चांदवडला

 

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधून निघालेल्या शेतकरी मोर्चाचा पहिला मुक्काम चांदवडला होणार असून मंगळवारी (दि. २२)सकाळी चांदवडवरून पुन्हा दिल्लीच्या दिशेने मोर्चाचे प्रस्थान होणार आहे. यात उमराणे, मालेगाव असा प्रवास करून मोर्चेकरी धुळ्यात दाखल होतील. या प्रवासात ठिकठिकाणी विविध पक्ष व संघटना दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या शेतकरी मोर्चातील वाहनांच्या ताफ्याचे स्वागत करणार असून दुसऱ्या दिवसाचा मुक्काम शिरपूर येथे होणार आहे. त्यानंतर बुधवारी (दि. २३) तिसऱ्या दिवशी मोर्चेकऱ्यांच्या वाहनांचा हा ताफा मध्य प्रदेश, राजस्थान असा प्रवास करीत दिल्लीकडे मार्गक्रमण करणार असून शिरपूरपर्यंत यात सुमारे ५०० कामगारही सहभागी होणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmer strikeशेतकरी संप