शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी टमाट्याच्या शेतात सोडली जनावरे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 15:50 IST

नाशिक जिल्ह्यातील नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या टमाट्याची बाजारपेठ सध्या मंदीच्या सावटात आहे. सध्या उच्चप्रतीच्या टमाट्याला प्रति के्रट (२० किलो) ४० ते ६० रुपये भाव मिळत आहे. म्हणजेच दोन रुपये किलो या भावाने शेतकºयांना टमाट्याची विक्री करावी लागत असून, गेल्या आठवड्यात तर १५ ते २० रुपये प्रति कॅरेट

ठळक मुद्देमंदीचे सावट : भाव घसरल्याने नैराश्य पोटी उचलले पाऊल

नाशिक : पिंपळगाव बसवंत पाठोपाठ टमाट्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या गिरणारे गावच्या टमाटा मार्केटमध्ये गेल्या महिना भरापासून बाजारभाव कमालीचे घसरले असून, उत्पादन खर्च निघत नसल्याचे पाहून शेतकºयांनी जनावरेच टमाट्याच्या शेतात सोडून देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान व बांगलादेशाच्या सीमेवर असलेल्या तणावामुळे टमाट्याची निर्यात बंद झाल्यामुळेच भाव घसरू लागल्याची माहिती टमाट्या व्यापारी नसीम अहमद यांनी दिली आहे.नाशिक जिल्ह्यातील नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या टमाट्याची बाजारपेठ सध्या मंदीच्या सावटात आहे. सध्या उच्चप्रतीच्या टमाट्याला प्रति के्रट (२० किलो) ४० ते ६० रुपये भाव मिळत आहे. म्हणजेच दोन रुपये किलो या भावाने शेतक-यांना टमाट्याची विक्री करावी लागत असून, गेल्या आठवड्यात तर १५ ते २० रुपये प्रति कॅरेट भाव होता. त्यामुळे शेतकरी कमालीचा नाराज झाला असून, टमाटा उत्पादनासाठी एकरी ७० ते ८० हजार रुपये भांडवली खर्च करून उसनवारीच्या माध्यमातून शेतक-यांनी टमाट्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. यंदा पाऊस जरी कमी पडला असला तरी टमाट्याचे उत्पादन मुबलक प्रमाणात आले आहे. गिरणारेच्या टमाटा मार्केटमध्ये दिंडोरी, त्रंबक, पेठ, नाशिक, सिन्नर, संगमनेर या भागातील टमाटा विक्रीसाठी येत असतो. पिंपळगाव बसवंतच्या पाठोपाठ गिरणारे मार्केट महत्त्वाचे मानले जाते. परंतु यंदा टमाट्याच्या कोसळलेल्या बाजारभावाचा फटका शेतक-यांच्या मोठ्या प्रमाणावर बसला आहे. शेतीची मशागत, लागवड, मजुरी, बी-बियाणे, खाते, कीटकनाशके आदी खर्चही पुरता टमाट्याच्या पिकातून मिळत नसल्यामुळे आगामी काळात टमाट्याचे पीक घ्यावे की नाही अशी भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. या भागातील टमाट्या पाकिस्तान व बांगला देशात निर्यात केला जात असल्याने टमाट्याला यापूर्वी चांगला भाव मिळत होता, परंतु अलीकडे दोन्ही देशांतील दहशतवादी कृत्यांमुळे सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झाल्याने आयात-निर्यात बंद केल्याचा फटका टमाट्याला बसला आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक