शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकऱ्यांनी टमाट्याच्या शेतात सोडली जनावरे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 15:50 IST

नाशिक जिल्ह्यातील नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या टमाट्याची बाजारपेठ सध्या मंदीच्या सावटात आहे. सध्या उच्चप्रतीच्या टमाट्याला प्रति के्रट (२० किलो) ४० ते ६० रुपये भाव मिळत आहे. म्हणजेच दोन रुपये किलो या भावाने शेतकºयांना टमाट्याची विक्री करावी लागत असून, गेल्या आठवड्यात तर १५ ते २० रुपये प्रति कॅरेट

ठळक मुद्देमंदीचे सावट : भाव घसरल्याने नैराश्य पोटी उचलले पाऊल

नाशिक : पिंपळगाव बसवंत पाठोपाठ टमाट्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या गिरणारे गावच्या टमाटा मार्केटमध्ये गेल्या महिना भरापासून बाजारभाव कमालीचे घसरले असून, उत्पादन खर्च निघत नसल्याचे पाहून शेतकºयांनी जनावरेच टमाट्याच्या शेतात सोडून देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान व बांगलादेशाच्या सीमेवर असलेल्या तणावामुळे टमाट्याची निर्यात बंद झाल्यामुळेच भाव घसरू लागल्याची माहिती टमाट्या व्यापारी नसीम अहमद यांनी दिली आहे.नाशिक जिल्ह्यातील नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या टमाट्याची बाजारपेठ सध्या मंदीच्या सावटात आहे. सध्या उच्चप्रतीच्या टमाट्याला प्रति के्रट (२० किलो) ४० ते ६० रुपये भाव मिळत आहे. म्हणजेच दोन रुपये किलो या भावाने शेतक-यांना टमाट्याची विक्री करावी लागत असून, गेल्या आठवड्यात तर १५ ते २० रुपये प्रति कॅरेट भाव होता. त्यामुळे शेतकरी कमालीचा नाराज झाला असून, टमाटा उत्पादनासाठी एकरी ७० ते ८० हजार रुपये भांडवली खर्च करून उसनवारीच्या माध्यमातून शेतक-यांनी टमाट्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. यंदा पाऊस जरी कमी पडला असला तरी टमाट्याचे उत्पादन मुबलक प्रमाणात आले आहे. गिरणारेच्या टमाटा मार्केटमध्ये दिंडोरी, त्रंबक, पेठ, नाशिक, सिन्नर, संगमनेर या भागातील टमाटा विक्रीसाठी येत असतो. पिंपळगाव बसवंतच्या पाठोपाठ गिरणारे मार्केट महत्त्वाचे मानले जाते. परंतु यंदा टमाट्याच्या कोसळलेल्या बाजारभावाचा फटका शेतक-यांच्या मोठ्या प्रमाणावर बसला आहे. शेतीची मशागत, लागवड, मजुरी, बी-बियाणे, खाते, कीटकनाशके आदी खर्चही पुरता टमाट्याच्या पिकातून मिळत नसल्यामुळे आगामी काळात टमाट्याचे पीक घ्यावे की नाही अशी भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. या भागातील टमाट्या पाकिस्तान व बांगला देशात निर्यात केला जात असल्याने टमाट्याला यापूर्वी चांगला भाव मिळत होता, परंतु अलीकडे दोन्ही देशांतील दहशतवादी कृत्यांमुळे सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झाल्याने आयात-निर्यात बंद केल्याचा फटका टमाट्याला बसला आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक