शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी टमाट्याच्या शेतात सोडली जनावरे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 15:50 IST

नाशिक जिल्ह्यातील नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या टमाट्याची बाजारपेठ सध्या मंदीच्या सावटात आहे. सध्या उच्चप्रतीच्या टमाट्याला प्रति के्रट (२० किलो) ४० ते ६० रुपये भाव मिळत आहे. म्हणजेच दोन रुपये किलो या भावाने शेतकºयांना टमाट्याची विक्री करावी लागत असून, गेल्या आठवड्यात तर १५ ते २० रुपये प्रति कॅरेट

ठळक मुद्देमंदीचे सावट : भाव घसरल्याने नैराश्य पोटी उचलले पाऊल

नाशिक : पिंपळगाव बसवंत पाठोपाठ टमाट्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या गिरणारे गावच्या टमाटा मार्केटमध्ये गेल्या महिना भरापासून बाजारभाव कमालीचे घसरले असून, उत्पादन खर्च निघत नसल्याचे पाहून शेतकºयांनी जनावरेच टमाट्याच्या शेतात सोडून देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान व बांगलादेशाच्या सीमेवर असलेल्या तणावामुळे टमाट्याची निर्यात बंद झाल्यामुळेच भाव घसरू लागल्याची माहिती टमाट्या व्यापारी नसीम अहमद यांनी दिली आहे.नाशिक जिल्ह्यातील नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या टमाट्याची बाजारपेठ सध्या मंदीच्या सावटात आहे. सध्या उच्चप्रतीच्या टमाट्याला प्रति के्रट (२० किलो) ४० ते ६० रुपये भाव मिळत आहे. म्हणजेच दोन रुपये किलो या भावाने शेतक-यांना टमाट्याची विक्री करावी लागत असून, गेल्या आठवड्यात तर १५ ते २० रुपये प्रति कॅरेट भाव होता. त्यामुळे शेतकरी कमालीचा नाराज झाला असून, टमाटा उत्पादनासाठी एकरी ७० ते ८० हजार रुपये भांडवली खर्च करून उसनवारीच्या माध्यमातून शेतक-यांनी टमाट्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. यंदा पाऊस जरी कमी पडला असला तरी टमाट्याचे उत्पादन मुबलक प्रमाणात आले आहे. गिरणारेच्या टमाटा मार्केटमध्ये दिंडोरी, त्रंबक, पेठ, नाशिक, सिन्नर, संगमनेर या भागातील टमाटा विक्रीसाठी येत असतो. पिंपळगाव बसवंतच्या पाठोपाठ गिरणारे मार्केट महत्त्वाचे मानले जाते. परंतु यंदा टमाट्याच्या कोसळलेल्या बाजारभावाचा फटका शेतक-यांच्या मोठ्या प्रमाणावर बसला आहे. शेतीची मशागत, लागवड, मजुरी, बी-बियाणे, खाते, कीटकनाशके आदी खर्चही पुरता टमाट्याच्या पिकातून मिळत नसल्यामुळे आगामी काळात टमाट्याचे पीक घ्यावे की नाही अशी भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. या भागातील टमाट्या पाकिस्तान व बांगला देशात निर्यात केला जात असल्याने टमाट्याला यापूर्वी चांगला भाव मिळत होता, परंतु अलीकडे दोन्ही देशांतील दहशतवादी कृत्यांमुळे सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झाल्याने आयात-निर्यात बंद केल्याचा फटका टमाट्याला बसला आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक