शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

खडकीमाळ येथील शेतकरी आवर्तनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 16:10 IST

मानोरी :येवला तालुक्यातील पश्चिम भागात दीड महिन्यापासून तीव्र दुष्काळ जाणवत असूनखडकीमाळ येथील शेतकरी पालखेड आवर्तनापासून वंचितअसल्याचीतक्रारशेतकऱ्यांनीकेलीआहे............. सध्या पालखेड डावा ...

ठळक मुद्दे पालखेड:रब्बीहंगामातील पिके करपून जाण्याची भिती

मानोरी :येवला तालुक्यातील पश्चिम भागात दीड महिन्यापासून तीव्र दुष्काळ जाणवत असूनखडकीमाळ येथील शेतकरी पालखेड आवर्तनापासून वंचितअसल्याचीतक्रारशेतकऱ्यांनीकेलीआहे............. सध्या पालखेड डावा कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांना तसेच पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू असुन मानोरी बुद्रुक ( खडकीमाळ ) येथील वितरिका नंबर २५अद्याप आवर्तनाच्या प्रतिक्षेवर आहे. तीन दिवसांपासून वितरिका नंबर२५ ला पाणी सोडले असून बुधवारी ( दि.१९) ला संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हे पाणी मानोरी ( खडकीमाळ ) येथील शिवारात पोहोचले होते. त्यानंतरकेवळ पाच तासांत चारीचे पाणी बंद झाल्याने शेतकरी हैराण झाले. या वितरिकेला पाणी सोडल्याने पाण्याचा प्रवाह केवळ ०.३० कुसेक्स वेगानेच सोडले असल्याचे शेतकº्यांनी सांगितले. गुरु वारी ( दि.२०) ला सकाळी सात वाजता ग्रामपंचायत सदस्य पोपट शेळके , सेवा संस्थेचे अध्यक्ष नंदाराम शेळके,देवराम शेळके,संतोष आहेर,राजेंद्र शेळके,दिलीप शेळके,राहुल शेळके,नितीन शेळके,भाऊसाहेब वावधाने, शिवा शेळके,गोरख शेळके,आनंदा शेळके,उत्तम शेळके,गोविंद शेळके श्रावण शेळके,शेखर जगताप आदी खडकीमाळ येथील शेतकºयांनी पालखेड डावा कालव्याच्या अधिकाºयांना वितरिका नंबर २५ चा घडलेला प्रकार लक्षात आणून दिला. या वेळी खडकीमाळ वितरिका नंबर २५ वगळता पाणी हेड पासून तर देशमाने पर्यंत पाणी सुरळीत चालू होते. यावेळी सकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान पालखेड अधिकाº्यांना शेतकºयांनी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता आमचे अधिकारी आ िणपोलीस यंत्रणा घेऊन आम्ही चारी नंबर २५ च्या हेड वरती येऊन पाणी सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.यानंतर संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास०.२३ इतक्या कमी कुसेक्स ने पाणी सुरू होते.पुढचे पाच ते सात महिने भयानक दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. या सात दुष्काळी महिन्यांचे भवितव्य खडकीमाळ शेतकºयांचे पालखेड डावा काळव्यावर अवलंबून आहे. त्यात पाणी येण्याच्या आशा आता धूसर झाल्या आहेत.रब्बीच्या हंगामातील पिके सुद्धा पाण्याअभावी करपून जाणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले. खडकीमाळ येथील संपूर्ण परिसर शेत शिवारात असल्याने विहिरीतील पाण्यातील केव्हाच तळ गाठलाआहे.पुढचे पिण्याचे पाण्याचे नियोजन कसे करावे अशी चिंता शेतकº्यांना पडली आहे.त्यानंतर पालखेड कालव्याचा कोणताही अधिकारी मानोरी ( खडकीमाळ ) च्या शेतकº्याकडे पोहचले नसल्याने शेतकº्यांनी पाण्याच्या या नियोजनामुळे दिवसभर चारीच्या हेड वरच ताटकळत ठेवले.पाणी प्रवाह सुरळीत करण्यासाठी शेतकºयांनी महेश पैठणकर ,छगन आहेर ,उपसभापती रु पचंद भागवत , भागवत सोनवणे आदींना वितरिका नंबर २५ ला पाणी सोडण्यासाठी दिवसभर संपर्कात होते.तीन दिवसांपासून वितरिका नंबर २५ ला पाणी सोडलेले असून बुधवारी संध्याकाळ पासून खडकीमाळ येथे ०.२३ कुसेक्स ने पाणी असल्याने कोणत्याही शेतकºयांना या आवर्तनाचा फायदा होत नसून तात्काळ पाण्याचा प्रवाह वाढवून देणेगरजेचे आहे.- संतोष आहेर... सध्या दुष्काळ परिस्थितीमुळे सर्वच शेतकº्यांना पाणी मिळावे अशी अपेक्षा आहे.तरी खडकीमाळ येथे पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे".- वैभव भागवत , अभियंता , पालखेड डावा कालवा.