शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

करंजगावी बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 15:45 IST

चांदोरी : रात्रीच्यावेळी शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी जात असलेल्या शेतक-यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना निफाड तालुक्यातील करंजगाव येथे शुक्रवारी (दि.१८) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून, परिसरातील शेतकरी वेळीच धाऊन आल्यामुळे सदर शेतकऱ्याचे प्राण वाचले. मात्र या घटनेमुळे परिसरातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

निफाड तालुक्यातील करंजगाव येथे रमेश राजोळे हे शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी रात्रीच्यावेळी जात होते. यावेळी अंधारात झाडाझुडपात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने त्यांना जबड्यात धरल्यानंतर त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी परिसरात शेतीपिकांना पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतल्यामुळे बिबट्याने जबड्यातून राजोळे यांना सोडून पुन्हा झाडाझुडपात धूम ठोकली. राजोळे यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा बिबट्याने त्याची दहशत कायम ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वनविभाकडून शेतकऱ्यांना अपेक्षागोदावरी नदीकाठच्या गावांना मुबलक पाणी उपलब्ध असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती केली जाते. मात्र, सध्या सुरु असलेल्या भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, रात्रीच्यावेळी मिळणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना रात्री पाणी देणे सोयीचे ठरत आहे. मात्र, रात्रीच्यावेळी बिबट्याचे दर्शन घडण्याचे प्रमाण वाढल्यामुळे यापुढील काळात वनविभागाकडून या भागात पिंजरा लावण्यात यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या