शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

भाजीपाल्याचे दर कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:16 IST

दिंडोरी/जानोरी : गेल्या काही दिवसांपासून पावसाने मारलेली दडी, भाजीपाल्याचे कोसळलेले दर आणि वीज बिल भरण्यासाठी महावितरणने लावलेल्या तगाद्यामुळे शेतकरी ...

दिंडोरी/जानोरी : गेल्या काही दिवसांपासून पावसाने मारलेली दडी, भाजीपाल्याचे कोसळलेले दर आणि वीज बिल भरण्यासाठी महावितरणने लावलेल्या तगाद्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकांना भाव नसताना महावितरण वीज कंपनीने शेतकऱ्यांच्या मोटर्सचे वीज कनेक्शन बंद केले आहे. बिले भरल्याशिवाय वीज कनेक्शन चालू होणार नाही, असे महावितरण कंपनीचे कर्मचारी सांगतात, त्यातच पावसानेही शेतकऱ्यांकडे डोळे वटारून बघितल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून अनेक प्रकारची पिके आपल्या शेतात पिकवली आहेत. परंतु सध्या कोणत्याच पिकांना दर नसल्याने शेतकरी चिंतित असून, महावितरण वीज कंपनीने शेतकऱ्यांचे मोटर वीज कनेक्शन बंद केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना आपले पीक वाचविण्यासाठी पिकांना पाणी भरावे लागते. तसेच पिकांना वाचविण्यासाठी औषधांची फवारणी करावी लागते. परंतु वीज महावितरण कंपनीने दोन दिवसांपासून शेतकऱ्यांची थ्री फेज कनेक्शन बंद केल्याने शेतकऱ्यांचे पिके खराब होण्याची शक्यता आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांचे टोमॅटोचे पीक सुरू असून, टोमॅटो पिकाला ६० ते ७० रुपये कॅरेटचा भाव असल्याने शेतकऱ्यांचा खर्चही वसूल होतो की नाही? अशी परिस्थिती असताना महावितरण कंपनीने वीज कनेक्शन बंद करून शेतकऱ्यांना एका मोठ्या संकटात टाकले आहे. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांची वीज कनेक्शन्स पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

---------------------

सध्या पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी द्यावे लागते. परंतु महावितरण राज्य कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करून शेतकऱ्यांच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. त्यातच केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांनाच या संकटांना सामोरे जावे लागत आहे.

- राजकुमार वाघ, शेतकरी, जानोरी

----------------

महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीने अचानक शेतकऱ्यांची वीज बंद केली आहे. पावसाने तीन दिवसांपासून उघडीप दिल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे असताना महावितरण कंपनीने वीज बंद केल्याने उभी पिके सुकून चालली आहेत. सरकारने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

- हर्षल आबाजी काठे, शेतकरी, जानोरी

-----------------------------

जानोरी येथील शेतकरी राजकुमार वाघ हे आपल्या शेतातील पिकांना नळीद्वारे पाणी देताना. (२५ जानोरी वॉटर)

250821\25nsk_14_25082021_13.jpg

२५ जानोरी वॉटर