शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याचे दर कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:16 IST

दिंडोरी/जानोरी : गेल्या काही दिवसांपासून पावसाने मारलेली दडी, भाजीपाल्याचे कोसळलेले दर आणि वीज बिल भरण्यासाठी महावितरणने लावलेल्या तगाद्यामुळे शेतकरी ...

दिंडोरी/जानोरी : गेल्या काही दिवसांपासून पावसाने मारलेली दडी, भाजीपाल्याचे कोसळलेले दर आणि वीज बिल भरण्यासाठी महावितरणने लावलेल्या तगाद्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकांना भाव नसताना महावितरण वीज कंपनीने शेतकऱ्यांच्या मोटर्सचे वीज कनेक्शन बंद केले आहे. बिले भरल्याशिवाय वीज कनेक्शन चालू होणार नाही, असे महावितरण कंपनीचे कर्मचारी सांगतात, त्यातच पावसानेही शेतकऱ्यांकडे डोळे वटारून बघितल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून अनेक प्रकारची पिके आपल्या शेतात पिकवली आहेत. परंतु सध्या कोणत्याच पिकांना दर नसल्याने शेतकरी चिंतित असून, महावितरण वीज कंपनीने शेतकऱ्यांचे मोटर वीज कनेक्शन बंद केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना आपले पीक वाचविण्यासाठी पिकांना पाणी भरावे लागते. तसेच पिकांना वाचविण्यासाठी औषधांची फवारणी करावी लागते. परंतु वीज महावितरण कंपनीने दोन दिवसांपासून शेतकऱ्यांची थ्री फेज कनेक्शन बंद केल्याने शेतकऱ्यांचे पिके खराब होण्याची शक्यता आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांचे टोमॅटोचे पीक सुरू असून, टोमॅटो पिकाला ६० ते ७० रुपये कॅरेटचा भाव असल्याने शेतकऱ्यांचा खर्चही वसूल होतो की नाही? अशी परिस्थिती असताना महावितरण कंपनीने वीज कनेक्शन बंद करून शेतकऱ्यांना एका मोठ्या संकटात टाकले आहे. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांची वीज कनेक्शन्स पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

---------------------

सध्या पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी द्यावे लागते. परंतु महावितरण राज्य कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करून शेतकऱ्यांच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. त्यातच केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांनाच या संकटांना सामोरे जावे लागत आहे.

- राजकुमार वाघ, शेतकरी, जानोरी

----------------

महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीने अचानक शेतकऱ्यांची वीज बंद केली आहे. पावसाने तीन दिवसांपासून उघडीप दिल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे असताना महावितरण कंपनीने वीज बंद केल्याने उभी पिके सुकून चालली आहेत. सरकारने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

- हर्षल आबाजी काठे, शेतकरी, जानोरी

-----------------------------

जानोरी येथील शेतकरी राजकुमार वाघ हे आपल्या शेतातील पिकांना नळीद्वारे पाणी देताना. (२५ जानोरी वॉटर)

250821\25nsk_14_25082021_13.jpg

२५ जानोरी वॉटर