शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

भाजीपाल्याचे दर कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:16 IST

दिंडोरी/जानोरी : गेल्या काही दिवसांपासून पावसाने मारलेली दडी, भाजीपाल्याचे कोसळलेले दर आणि वीज बिल भरण्यासाठी महावितरणने लावलेल्या तगाद्यामुळे शेतकरी ...

दिंडोरी/जानोरी : गेल्या काही दिवसांपासून पावसाने मारलेली दडी, भाजीपाल्याचे कोसळलेले दर आणि वीज बिल भरण्यासाठी महावितरणने लावलेल्या तगाद्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकांना भाव नसताना महावितरण वीज कंपनीने शेतकऱ्यांच्या मोटर्सचे वीज कनेक्शन बंद केले आहे. बिले भरल्याशिवाय वीज कनेक्शन चालू होणार नाही, असे महावितरण कंपनीचे कर्मचारी सांगतात, त्यातच पावसानेही शेतकऱ्यांकडे डोळे वटारून बघितल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून अनेक प्रकारची पिके आपल्या शेतात पिकवली आहेत. परंतु सध्या कोणत्याच पिकांना दर नसल्याने शेतकरी चिंतित असून, महावितरण वीज कंपनीने शेतकऱ्यांचे मोटर वीज कनेक्शन बंद केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना आपले पीक वाचविण्यासाठी पिकांना पाणी भरावे लागते. तसेच पिकांना वाचविण्यासाठी औषधांची फवारणी करावी लागते. परंतु वीज महावितरण कंपनीने दोन दिवसांपासून शेतकऱ्यांची थ्री फेज कनेक्शन बंद केल्याने शेतकऱ्यांचे पिके खराब होण्याची शक्यता आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांचे टोमॅटोचे पीक सुरू असून, टोमॅटो पिकाला ६० ते ७० रुपये कॅरेटचा भाव असल्याने शेतकऱ्यांचा खर्चही वसूल होतो की नाही? अशी परिस्थिती असताना महावितरण कंपनीने वीज कनेक्शन बंद करून शेतकऱ्यांना एका मोठ्या संकटात टाकले आहे. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांची वीज कनेक्शन्स पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

---------------------

सध्या पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी द्यावे लागते. परंतु महावितरण राज्य कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करून शेतकऱ्यांच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. त्यातच केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांनाच या संकटांना सामोरे जावे लागत आहे.

- राजकुमार वाघ, शेतकरी, जानोरी

----------------

महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीने अचानक शेतकऱ्यांची वीज बंद केली आहे. पावसाने तीन दिवसांपासून उघडीप दिल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे असताना महावितरण कंपनीने वीज बंद केल्याने उभी पिके सुकून चालली आहेत. सरकारने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

- हर्षल आबाजी काठे, शेतकरी, जानोरी

-----------------------------

जानोरी येथील शेतकरी राजकुमार वाघ हे आपल्या शेतातील पिकांना नळीद्वारे पाणी देताना. (२५ जानोरी वॉटर)

250821\25nsk_14_25082021_13.jpg

२५ जानोरी वॉटर