शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 00:35 IST

खेडलेझुंगे : द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू असून, पावसाच्या उघडिपीमुळे शेतकामांना वेग आला आहे.

खेडलेझुंगे : द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू असून, पावसाच्या उघडिपीमुळे शेतकामांना वेग आला आहे. मे-जून महिन्यामध्ये द्राक्षपंढरी समजल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यामध्ये शेजारील तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मजूर स्थलांतिरत होत असतो. परंतु कोरोनामुळे परिसरातून मजुरांचे स्थलांतर खूपच अत्यल्प आहे. तसेच सततच्या पावसामुळे शेतकामे मंदावलेली होती. त्यातच मजुरांचा तुटवडा यामुळे कामांचा वेग मंदावलेला होता. त्यातच शेतीमालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे. त्यातच कांदा निर्यातबंदी केल्याने बाजारपेठा बंद झालेल्या होत्या. त्यातच कोरोनामुळे शेताकामासाठीचे मजूर उपलब्ध होत नसल्याने या हंगामातील शेतीकामांना उशीर झालेला आहे. त्यातच निफाडच्या पूर्व भागात सतत पाऊस सुरू होता. यात पूर्व हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. मोठ्या प्रमाणावर शेतात पाणी साचून राहिल्याने मका, सोयाबीन पिके डोळ्यादेखत सडण्याची भीती निर्माण झालेली होती. त्यामुळे पावसाचा वाढता जोर बघून परिसरातील शेतकऱ्यांना कांदा, सोयाबीन, मका आदी पिकांचीही अपेक्षा सोडलेली होती. परंतु मागील चार-पाच दिवसांपासून पाऊस थांबलेला असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा अपेक्षा लागलेली आहे. सद्या शेतकऱ्यांना पिकांची स्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रकारच्या महागड्या औषधांच्या फवारण्या कराव्या लागत आहे.दिवसभर उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी जोरदार ढगफुटीसारखे पाऊस या सततच्या वातावरणातील बदलामुळे द्राक्ष बागायतदारांना कधी दिवसा तर कधी रात्रीची औषध फवारण्या कराव्या लागत आहेत. रात्री पाऊस झाल्यास भल्या पहाटे पडणाऱ्या धुक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर दवबिंदू वेलीवर साचतात. त्यामुळे भागातील द्राक्षबागांवर डावण्या, करपा, बुरशी या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. बुरशीजन्य रोगाबरोबरच कळी गळीचाही सामना करावा लागत आहे. कळीच्या स्थितीमध्ये करपा आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत प्रामुख्याने डावण्या रोगाला बळी पडत आहेत. करप्याने कोवळी फूट, कोवळे घड करपून जाऊ लागले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक