शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कपाशी लागवडीस शेतकऱ्यांची नापसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:10 IST

राजापूर परिसर : पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या ...

राजापूर परिसर : पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. रोहिणी नक्षत्रात थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसावर तांबट असलेल्या जमिनीत शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, परंतु या पेरणी केलेल्या पिकांना पावसाची नितांत गरज असून शेतकरी वर्ग सध्या मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडला आहे. दरम्यान, यंदा कपाशी पिकाकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. कपाशीला बोंड अळीने उत्पादन व खर्च यात ताळमेळ बसत नसल्याने कपाशी पिकाकडे पाठ फिरविल्याचे दिसते. त्याऐवजी मका पिकाला पसंती दर्शविली आहे.

शेतकऱ्यांनी महागड्या बी-बियाणांची पेरणी केली गेली आहे. राजापूरचा काही भाग हा तसाच पेरणीविना बाकी असल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यापूर्वी पेरणी केलेली पिके कोळपणीला आलेली आहेत. शेतकऱ्यांनीही मका पिकाला पसंती दिली आहे तर कपाशीकडे पाठ फिरविली आहे. बऱ्याच ठिकाणी काळ्या रानात शेतकऱ्यांनी पेरणी केली; मात्र ओलीअभावी या काळ्या रानातील पेरणी दुबार होणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ज्यांनी नशिबावर हवाला ठेवून पेरणी केली त्यांची पिके आता पंधरा दिवसांची झाली असून आता होणाऱ्या पेरण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत पडणार आहे. शेततळे असलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केली आहे. मृग नक्षत्र संपत आले तरी पाऊस झाला नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

इन्फो

नगदी पिकाकडे लक्ष केंद्रित

कपाशी पिकामुळे शेतात फक्त एकच पीक होते व त्याच शेतात मका लागवड केली तर शेत लवकर रिकामे होऊन तेथे रब्बीच्या हंगामातील पीक घेता येते. राजापूर व परिसरात मागे पाच ते दहा वर्षांपूर्वी शेतकरी कपाशी पिकाकडे वळले होते. पण मागील दोन वर्षांपासून कपाशीवर बोंड अळी रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे व कपाशीचे उत्पादन घटत असल्याने शेतकऱ्यांनी कपाशी लागवड क्षेत्रात घट केली आहे. यंदा कोरोनामुळे आर्थिक गणित कोलमडल्यानेही शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे लक्ष वळवले आहे.

कोट.... यंदा खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी वर्गाने मका पिकाला पसंती दिली आहे. शेतकरी मका बियाणे खरेदी करताना दिसत आहेत. सध्या मका पिकाला खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा उपलब्ध होतो व उत्पन्न चांगले येते. कपाशी पिकाला औषधावर खर्च जास्त होतो व चारा होत नाही. खर्च जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे यावर्षी मका पिकाचे क्षेत्र वाढणार आहे.

- अशपाक सय्यद, कृषी दुकानदार, राजापूर

कोट.... राजापूर व परिसरातील शेतकऱ्यांचे कपाशी पीक हे अत्यंत महत्त्वाचे समजले जात होते. पण मागे सलग दोन वर्षांपासून बोंड अळीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली आहे. राजापूर येथे काही पेरण्या झाल्या आहेत तर अजून निम्म्याहून अधिक पेरण्या बाकी आहेत. आधीच्या पेरण्यांची कोळपणी सुरू झाली आहे.

- समाधान आव्हाड, शेतकरी, राजापूर

फोटो- २१ राजापूर क्रॉप

राजापूर येथे मका पिकाची सुरू असलेली कोळपणी.

===Photopath===

210621\561321nsk_10_21062021_13.jpg

===Caption===

फोटो- २१ राजापूर क्रॉप राजापूर येथे मका पिकाची सुरू असलेली कोळपणी.