शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पीकविम्यापासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:21 IST

येवला तालुक्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कांदा रोपे, द्राक्ष आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवातदेखील झाली आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून अद्यापही मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनी पीकविमा कंपन्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्देयेवला तालुक्यात नाराजी । संबंधित विभागाने लक्ष घालण्याची मागणी

मानोरी : येवला तालुक्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कांदा रोपे, द्राक्ष आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवातदेखील झाली आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून अद्यापही मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनी पीकविमा कंपन्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.ज्या शेतकºयांनी पीकविमा काढलेला नाही अशा शेतकºयांना तुटपुंजी का होईना शासनाकडून मदत मिळाली आहे. मात्र, ज्या शेतकºयांनी विमा काढलेला आहे अशा शेतकºयांना कंपन्यांकडून हातात एक रु पयादेखील मिळाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकºयांनी मका आणि सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. त्यात मक्यावर लष्करी अळीने आक्र मक केल्याने शेतकरी संकटात सापडले होते. विविध प्रकारच्या औषधांची फवारणी करून वाचवलेल्या पिकावर अवकाळी पावसाने घाला घातला. त्यामुळे शेतकºयांचा हजारो रु पयांचा खर्च पाण्यात गेला. शासनाकडून भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र विमा कंपनीकडून मात्र, विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकºयांनी संताप व्यक्त केला आहे.दरम्यान, पीकविमा कंपन्यांकडून शेतकरी हिताचासाठी कोनतेही पाऊल उचलले जात नसून, आगामी काळात पीकविमा काढावा की नाही, असा प्रश्नही शेतकरी एकमेकांना विचारताना दिसत आहेत. तर शासनाच्या संबंधित विभागाने पीकविमा काढणाºया कंपनींवर अंकुश ठेवण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले असून,लवकरच भरपाई देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.दोन वर्षांपासून रुपयाही पदरी नाहीयेवला तालुक्यात २०१८ मध्ये कोरडा दुष्काळ पडल्याने मका पीक पाण्याअभावी वाया गेले होते. तेव्हाही अनेक शेतकºयांनी पीकविमा काढला होता. तसेच २०१९ मध्ये अवकाळी पावसाने मका, सोयाबीनचे प्रचंड नुकसान केले. शेतकºयांनी विमा उतरवलेला असतानाही पीकविमा कंपन्यांकडून दोन वर्षांपासून शेतकºयांच्या पदरी एक रुपयाही पडला नाही.

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमा