शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:24 IST

रेल्वे प्रकल्प भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असून, याप्रकरणी इगतपुरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

ठळक मुद्दे इगतपुरी तहसीलदारांना निवेदन : जमिनमालकांचा आक्रमक पवित्रा

नांदूरवैद्य : रेल्वे प्रकल्प भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असून, याप्रकरणी इगतपुरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.इगतपुरी ते मनमाड असणाºया रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याने या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतकºयांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव, पाडळी देशमुख, मुकणे तसेच नाशिक तालुक्यातील वंजारवाडी व लोहशिंगवे येथे नुकत्याच रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये बैठका पार पडल्या आहे.येथील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला असून, आज इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव येथील शेतकºयांनी प्रकल्पाला आपला विरोध कायम दर्शवत आज शुक्रवारी (दि. १४) रोजी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले. इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव येथील शेतकºयांनी रेल्वे प्रकल्पाला आपला विरोध कायम ठेवत प्रकल्प रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याआधीच शासनाने लष्कराच्या गोळीबार प्रशिक्षणासाठी हजारो हेक्टर जमिनी संपादित केल्या असून, आता उर्वरित जमिनीदेखील शासन रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करत असल्यामुळे या परिसरातील शेतकºयांवर उपासमारीची वेळ येईल यामुळे येथील शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.सध्या ज्या उर्वरित जमिनी शिल्लक आहेत त्यावरच अनेकांचा उदरनिर्वाह चालत असून, जर शासनाने हाती असलेली जमीनही रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करत असल्याने आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे कुºहेगाव येथील सर्व शेतकºयांनी निवेदनात म्हटले आहे.यावेळी अंबादास धोंगडे, जगन धोंगडे, भाऊसाहेब सुरेश धोंगडे, संपत धोंगडे, विशाल गव्हाणे, गणेश धोंगडे, ज्ञानेश्वर धोंगडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत येथील शेतकºयांनीदेखील आक्रमकता दाखवत विरोध केला. यावेळी आक्रमक भूमिका घेत सांगितले की, शासन प्रकल्पासाठी जमीन घेणारच आहे तर आधी शेतकºयांशी चर्चा करून योग्य तो मोबदला देण्यात यावा तसेच रेल्वे प्रकल्पास जमिनी देऊन भूमिहीन झालेल्यांना कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेत नोकरी देण्यात यावी. अन्यथा हा प्रकल्प बंद पाडण्यात येईल, अशी आक्रमक भूमिका कुºहेगाव येथील शेतकºयांनी घेतली आहे.

बेलगाव कुºहे व नांदूरवैद्य येथील हजारो हेक्टर जमिनी याआधीच लष्कराच्या ताब्यात गेल्यामुळे येथील अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. त्यातच त्यांच्या मुलांना आजपर्यंत नोकरीत सामावून घेतले नसून आता या प्रकल्पाला आमचा पूर्ण व प्रखर विरोध असून, कुटुंबातील एका सदस्यास रेल्वेत नोकरी देण्यात यावी अन्यथा हा लोहमार्ग बंद करण्यात येईल.- संगीता घोंगडे, सरपंच, कुºहेगाव

टॅग्स :StrikeसंपTahasildarतहसीलदार