शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:24 IST

रेल्वे प्रकल्प भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असून, याप्रकरणी इगतपुरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

ठळक मुद्दे इगतपुरी तहसीलदारांना निवेदन : जमिनमालकांचा आक्रमक पवित्रा

नांदूरवैद्य : रेल्वे प्रकल्प भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असून, याप्रकरणी इगतपुरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.इगतपुरी ते मनमाड असणाºया रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याने या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतकºयांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव, पाडळी देशमुख, मुकणे तसेच नाशिक तालुक्यातील वंजारवाडी व लोहशिंगवे येथे नुकत्याच रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये बैठका पार पडल्या आहे.येथील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला असून, आज इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव येथील शेतकºयांनी प्रकल्पाला आपला विरोध कायम दर्शवत आज शुक्रवारी (दि. १४) रोजी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले. इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव येथील शेतकºयांनी रेल्वे प्रकल्पाला आपला विरोध कायम ठेवत प्रकल्प रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याआधीच शासनाने लष्कराच्या गोळीबार प्रशिक्षणासाठी हजारो हेक्टर जमिनी संपादित केल्या असून, आता उर्वरित जमिनीदेखील शासन रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करत असल्यामुळे या परिसरातील शेतकºयांवर उपासमारीची वेळ येईल यामुळे येथील शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.सध्या ज्या उर्वरित जमिनी शिल्लक आहेत त्यावरच अनेकांचा उदरनिर्वाह चालत असून, जर शासनाने हाती असलेली जमीनही रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करत असल्याने आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे कुºहेगाव येथील सर्व शेतकºयांनी निवेदनात म्हटले आहे.यावेळी अंबादास धोंगडे, जगन धोंगडे, भाऊसाहेब सुरेश धोंगडे, संपत धोंगडे, विशाल गव्हाणे, गणेश धोंगडे, ज्ञानेश्वर धोंगडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत येथील शेतकºयांनीदेखील आक्रमकता दाखवत विरोध केला. यावेळी आक्रमक भूमिका घेत सांगितले की, शासन प्रकल्पासाठी जमीन घेणारच आहे तर आधी शेतकºयांशी चर्चा करून योग्य तो मोबदला देण्यात यावा तसेच रेल्वे प्रकल्पास जमिनी देऊन भूमिहीन झालेल्यांना कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेत नोकरी देण्यात यावी. अन्यथा हा प्रकल्प बंद पाडण्यात येईल, अशी आक्रमक भूमिका कुºहेगाव येथील शेतकºयांनी घेतली आहे.

बेलगाव कुºहे व नांदूरवैद्य येथील हजारो हेक्टर जमिनी याआधीच लष्कराच्या ताब्यात गेल्यामुळे येथील अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. त्यातच त्यांच्या मुलांना आजपर्यंत नोकरीत सामावून घेतले नसून आता या प्रकल्पाला आमचा पूर्ण व प्रखर विरोध असून, कुटुंबातील एका सदस्यास रेल्वेत नोकरी देण्यात यावी अन्यथा हा लोहमार्ग बंद करण्यात येईल.- संगीता घोंगडे, सरपंच, कुºहेगाव

टॅग्स :StrikeसंपTahasildarतहसीलदार